शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

'ईडीच्या भीतीने आमच्यासोबत असलेले काहीजण भाजपसोबत गेले'; शरद पवारांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 18:22 IST

'आम्ही वैचारिक भूमिका बदलली नाही. तुरुंगात जावं लागू नये, म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला आहे.'

पुणे : काही दिवसांपूर्वीच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली आणि अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) वेगळे झाले. तेव्हापासून दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर टीका करतना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही भाजपशी हातमिळवणी केलेल्या नेत्यांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. 

यावेळी शरद पवार म्हणाले की, 'ईडीच्या (सक्तवसुली संचालनालय) कारवाईच्या भितीने आमच्यातले काहीजण भाजपसोबत गेले आहेत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतच आहोत. आम्ही आमची वैचारिक भूमिका बदलली नाही. तुरुंगात जावं लागू नये, म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सत्याची कास सोडून असं वागणाऱ्या लोकांना सामान्य जनता वेगळ्या ठिकाणी पाठवल्याशिवाय राहणार नाही,' अशी टीका शरद पवारांनी केली. 

ते पुढे म्हणतात की, आज देशात महागाई, गुन्हेगारी वाढत आहे. शेतकऱ्यांना बाजारपेठेत योग्य भाव मिळत नाही. गेल्या सहा महिन्यांत गुजरात किंवा अन्य राज्यात किती प्रकल्प गेले. जो कारखाना राज्यात येणार होता, तो अन्य राज्यात गेला. चांगली कामे करण्याची संधी राज्य सरकारने गमावली आहे. तुम्ही गुजरातमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये कारखाने अवश्य काढा, परंतु जे कारखाने इथे येणार होते, ते तिकडे नेणं योग्य नाही. यामुळे महाराष्ट्रातल्या तरुणांचा रोजगार गेला,' असंही ते यावेळी म्हणाले.

'देशाचे महत्वाचे नेते सत्तेचा गैरवापर करत आहेत. ते नेहमी बातम्यांवर लक्ष ठेवून असतात. कुणी काही टीका टिप्पणी केली की, शासनाच्या महत्वाच्या व्यक्तींकडून त्या चॅनलला फोन करुन इशारा दिला जातो. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संसारात हात घालण्याचे काम केंद्राने केल. कांदा निर्यात शुल्क वाढवून सरकारने कांद्याचे भाव पाडले. कांद्यावर शुल्कवाढ केल्याने शेतकऱ्यांसाठी जगातले मार्केट बंद झाले,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPuneपुणे