शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

“लोकसभेत धसका, आता विधानसभेला आग्रहाची विनंती आहे की...”; शरद पवारांचे PM मोदींना साकडे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 16:51 IST

Sharad Pawar News: जनता मोदींच्या कारभारावर खूश नाहीत. मोदी पुन्हा पुन्हा सांगत होते की माझी गॅरंटी आहे. पण ती गॅरंटी काही चालली नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar News: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार बाजी मारत महायुतीला चितपट केले. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुपटीने वाढला असून, आगामी विधानसभा निवडणुकीत हीच लय कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर लोकसभेचा वचपा विधानसभेला काढण्यासाठी महायुती उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. यातच शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना एक आग्रहाची विनंती केली आहे. 

पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकसभेत ४८ पैकी ३१ जागा आम्हाला मिळाल्या. सांगलीत विशाल पाटील यांनी आम्हाला पाठिंबा दिला. ४८ पैकी ३१ जागा ज्या विचाराच्या निवडून येतात, त्यातून लोकांचा कल काय आहे हे स्पष्ट होते. यातून धसका घेतला आहे. यातच लोकसभेत २८८ पैकी १५५ विधानसभा मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला आहे. त्या ठिकाणी आमचे उमेदवार पुढे आहेत. याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेने एक इशारा दिला आहे. यात आमचे बहुमतच आहे. अशी स्थिती विधानसभेत झाली, तर इथे सत्ता बदलणारच आहे. त्यासाठी अनुकूल अशी स्थिती आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

आता विधानसभेला आग्रहाची विनंती आहे की...

लोकसभेची हीच स्थिती विधानसभेलाही कायम राहायला काही हरकत नाही. लोक मोदींच्या कारभारावर खूश नाहीत. मोदी पुन्हा पुन्हा सांगत होते की माझी गॅरंटी आहे. पण ती गॅरंटी काही चालली नाही. प्रचाराचा पूर्ण भार हा मोदींवर होता. मोदींनी १८ सभा महाराष्ट्रात घेतल्या. त्यातल्या १४ ठिकाणी त्यांचा पराभव झालेला आहे. माझी आग्रहाची विनंती आहे की विधानसभा निवडणुकीत मोदींनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. 

दरम्यान, महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यांचा रोख उद्धव ठाकरेंकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा आहे, सामुहिक नेतृत्व हेच आमचे सूत्र आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीBJPभाजपाMahayutiमहायुती