शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

मनोज जरांगेंच्या 'त्या' मागणीला शरद पवारांचा पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 13:23 IST

जरांगेंच्या मागणीला पवारांचा पाठिंबा, लोकसभेत ३१ मराठा उमेदवार निवडून आले. धर्म धोक्यात आलेला नाही तर आरक्षण धोक्यात आले आहे.

नागपूर - मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या मनोज जरांगेंच्या मागणी प्रत्यक्षात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. मागच्या लोकसभेत ३१ उमेदवार हे मराठा समाजाचे निवडून गेलेत. पवार सर्वपक्षीय बैठकीला जात नाही. स्वत:चे मत मांडत नाही. याचा सरळ अर्थ असा की शरद पवारांचा मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला पाठिंबा आहे. जर असं नसतं तर शरद पवारांनी भूमिका मांडली असती असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, लोकसभेप्रमाणे विधानसभेत पुन्हा पुनरावृत्ती झाली मराठा समाजाचं बहुमत होईल. त्यानंतर सभागृहात ठराव करण्यात येणार आहे. ओबीसींची मागणी आहे जनगणना करण्याची ती आम्ही मान्य करतो. ती जनगणना होत नाही तोपर्यंत हे सभागृह ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देतेय असं मंजूर करण्यात येईल. त्यामुळे सर्व ओबीसी समाजाला आम्ही आवाहन करतोय. विधानसभेत ओबीसींचे १०० आमदार असले तरच हा ठराव रोखू शकतात ही सध्याची परिस्थिती आहे. आरक्षणाच्या जागा महत्त्वाच्या आहेत. एससी, एसटी आरक्षण असेल ते ओबीसीच्या मतांवर निवडून गेले तर ओबीसींच्या बाजूने मतदान करतील आणि ते जर मराठा समाजाच्या बाजूने गेले तर मराठा समाजाला मतदान करतील. त्यामुळे ओबीसींनी राखीव जागांवर प्रचंड ताकदीने मतदान केले पाहिजे असं त्यांनी सांगितले. एबीपी माझाच्या मुलाखतीत ते बोलत होते. 

तसेच भाजपा ओबीसीचा मित्र नाही. भाजपा ओबीसीचा दुश्मन आहे. धर्म धोक्यात आलेला नाही तर आरक्षण धोक्यात आले आहे. भाजपा ओबीसीच्या बाजूने आणि जरांगेंच्या विरोधात आहोत असं कुठेही विधान आलेले नाही. तेव्हा तेली, माळी, कोळी, सोनार, लोहार, कुंभार  यासह इतर ओबीसीतील घटकांनी एक ठरवलं पाहिजे. जोपर्यंत ओबीसी आरक्षणाला पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत त्या पक्षांना आम्ही मतदान करणार नाही ही भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे असंही आवाहन प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी समाजाला केले. 

दरम्यान, हे ३१ खासदार मनोज जरांगे पाटलांना भेटले. तुमच्यामुळे निवडून आलो असं सांगितले आहे. त्यामुळे हे कुणबी म्हणत असतील तर तुम्ही मतदान कोणाच्या बाजूने करणार आहात? ओबीसींनी कुणबी यांना निवडून आणले तर हा कुणबी मतदान कोणाला करणार? हा माझा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीमुळे ही दरी वाढलेली आहे. आम्ही मराठा समाजासोबत जाणार नाही असं कुणबी समाजानं आश्वासित केले पाहिजे असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSharad Pawarशरद पवारMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण