शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

मनोज जरांगेंच्या 'त्या' मागणीला शरद पवारांचा पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 13:23 IST

जरांगेंच्या मागणीला पवारांचा पाठिंबा, लोकसभेत ३१ मराठा उमेदवार निवडून आले. धर्म धोक्यात आलेला नाही तर आरक्षण धोक्यात आले आहे.

नागपूर - मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या मनोज जरांगेंच्या मागणी प्रत्यक्षात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. मागच्या लोकसभेत ३१ उमेदवार हे मराठा समाजाचे निवडून गेलेत. पवार सर्वपक्षीय बैठकीला जात नाही. स्वत:चे मत मांडत नाही. याचा सरळ अर्थ असा की शरद पवारांचा मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला पाठिंबा आहे. जर असं नसतं तर शरद पवारांनी भूमिका मांडली असती असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, लोकसभेप्रमाणे विधानसभेत पुन्हा पुनरावृत्ती झाली मराठा समाजाचं बहुमत होईल. त्यानंतर सभागृहात ठराव करण्यात येणार आहे. ओबीसींची मागणी आहे जनगणना करण्याची ती आम्ही मान्य करतो. ती जनगणना होत नाही तोपर्यंत हे सभागृह ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देतेय असं मंजूर करण्यात येईल. त्यामुळे सर्व ओबीसी समाजाला आम्ही आवाहन करतोय. विधानसभेत ओबीसींचे १०० आमदार असले तरच हा ठराव रोखू शकतात ही सध्याची परिस्थिती आहे. आरक्षणाच्या जागा महत्त्वाच्या आहेत. एससी, एसटी आरक्षण असेल ते ओबीसीच्या मतांवर निवडून गेले तर ओबीसींच्या बाजूने मतदान करतील आणि ते जर मराठा समाजाच्या बाजूने गेले तर मराठा समाजाला मतदान करतील. त्यामुळे ओबीसींनी राखीव जागांवर प्रचंड ताकदीने मतदान केले पाहिजे असं त्यांनी सांगितले. एबीपी माझाच्या मुलाखतीत ते बोलत होते. 

तसेच भाजपा ओबीसीचा मित्र नाही. भाजपा ओबीसीचा दुश्मन आहे. धर्म धोक्यात आलेला नाही तर आरक्षण धोक्यात आले आहे. भाजपा ओबीसीच्या बाजूने आणि जरांगेंच्या विरोधात आहोत असं कुठेही विधान आलेले नाही. तेव्हा तेली, माळी, कोळी, सोनार, लोहार, कुंभार  यासह इतर ओबीसीतील घटकांनी एक ठरवलं पाहिजे. जोपर्यंत ओबीसी आरक्षणाला पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत त्या पक्षांना आम्ही मतदान करणार नाही ही भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे असंही आवाहन प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी समाजाला केले. 

दरम्यान, हे ३१ खासदार मनोज जरांगे पाटलांना भेटले. तुमच्यामुळे निवडून आलो असं सांगितले आहे. त्यामुळे हे कुणबी म्हणत असतील तर तुम्ही मतदान कोणाच्या बाजूने करणार आहात? ओबीसींनी कुणबी यांना निवडून आणले तर हा कुणबी मतदान कोणाला करणार? हा माझा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीमुळे ही दरी वाढलेली आहे. आम्ही मराठा समाजासोबत जाणार नाही असं कुणबी समाजानं आश्वासित केले पाहिजे असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSharad Pawarशरद पवारMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण