शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगेंच्या 'त्या' मागणीला शरद पवारांचा पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 13:23 IST

जरांगेंच्या मागणीला पवारांचा पाठिंबा, लोकसभेत ३१ मराठा उमेदवार निवडून आले. धर्म धोक्यात आलेला नाही तर आरक्षण धोक्यात आले आहे.

नागपूर - मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या मनोज जरांगेंच्या मागणी प्रत्यक्षात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. मागच्या लोकसभेत ३१ उमेदवार हे मराठा समाजाचे निवडून गेलेत. पवार सर्वपक्षीय बैठकीला जात नाही. स्वत:चे मत मांडत नाही. याचा सरळ अर्थ असा की शरद पवारांचा मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला पाठिंबा आहे. जर असं नसतं तर शरद पवारांनी भूमिका मांडली असती असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, लोकसभेप्रमाणे विधानसभेत पुन्हा पुनरावृत्ती झाली मराठा समाजाचं बहुमत होईल. त्यानंतर सभागृहात ठराव करण्यात येणार आहे. ओबीसींची मागणी आहे जनगणना करण्याची ती आम्ही मान्य करतो. ती जनगणना होत नाही तोपर्यंत हे सभागृह ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देतेय असं मंजूर करण्यात येईल. त्यामुळे सर्व ओबीसी समाजाला आम्ही आवाहन करतोय. विधानसभेत ओबीसींचे १०० आमदार असले तरच हा ठराव रोखू शकतात ही सध्याची परिस्थिती आहे. आरक्षणाच्या जागा महत्त्वाच्या आहेत. एससी, एसटी आरक्षण असेल ते ओबीसीच्या मतांवर निवडून गेले तर ओबीसींच्या बाजूने मतदान करतील आणि ते जर मराठा समाजाच्या बाजूने गेले तर मराठा समाजाला मतदान करतील. त्यामुळे ओबीसींनी राखीव जागांवर प्रचंड ताकदीने मतदान केले पाहिजे असं त्यांनी सांगितले. एबीपी माझाच्या मुलाखतीत ते बोलत होते. 

तसेच भाजपा ओबीसीचा मित्र नाही. भाजपा ओबीसीचा दुश्मन आहे. धर्म धोक्यात आलेला नाही तर आरक्षण धोक्यात आले आहे. भाजपा ओबीसीच्या बाजूने आणि जरांगेंच्या विरोधात आहोत असं कुठेही विधान आलेले नाही. तेव्हा तेली, माळी, कोळी, सोनार, लोहार, कुंभार  यासह इतर ओबीसीतील घटकांनी एक ठरवलं पाहिजे. जोपर्यंत ओबीसी आरक्षणाला पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत त्या पक्षांना आम्ही मतदान करणार नाही ही भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे असंही आवाहन प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी समाजाला केले. 

दरम्यान, हे ३१ खासदार मनोज जरांगे पाटलांना भेटले. तुमच्यामुळे निवडून आलो असं सांगितले आहे. त्यामुळे हे कुणबी म्हणत असतील तर तुम्ही मतदान कोणाच्या बाजूने करणार आहात? ओबीसींनी कुणबी यांना निवडून आणले तर हा कुणबी मतदान कोणाला करणार? हा माझा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीमुळे ही दरी वाढलेली आहे. आम्ही मराठा समाजासोबत जाणार नाही असं कुणबी समाजानं आश्वासित केले पाहिजे असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSharad Pawarशरद पवारMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण