शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

Sharad Pawar Eknath Shinde: "एकनाथ शिंदेंची उगीच अशी बदनामी करणं योग्य नाही"; शरद पवारांचं रोखठोक मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 18:51 IST

शरद पवार नक्की कशाबद्दल बोलले, वाचा सविस्तर

Sharad Pawar Eknath Shinde: अनेक नाट्यमय घडामोडींनंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले. भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. त्यांच्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. या साऱ्या गोंधळानंतर अचानक एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली होती. त्या संदर्भातील काही फोटो व्हायरल झाले. भेटीचे वृत्त आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून त्याचे खंडन करण्यात आले. अशी कुठलीही भेट झाली नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आले. त्याच मुद्द्यावर आज शरद पवार यांनीही मत व्यक्त केले.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आमच्यात अशी कोणतीही भेट झाली नाही. जो फोटो मधल्या काळात व्हायरल झाला होता तो फोटो दोन वर्षांपूर्वीचा होता. त्या फोटोचा आणि सध्याच्या राजकारणाचा काहीच संबंध नाही. त्यामुळे या प्रकारच्या बातम्या पसरवणं हे चुकीचं आहे. उगीच एकनाथ शिंदेंची अशी बदनामी करणं योग्य नाही, असे अतिशय स्पष्ट आणि रोखठोक मत शरद पवार यांनी व्यक्त केले. 

दिवसभरातील कार्यक्रम आटोपल्यावर संध्याकाळच्या सुमारास एकनाथ शिंदे शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले अशी चर्चा होती. तिथे त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन शुभेच्छांचा स्वीकार केला, असेही वृत्त आले होते. तसेच या भेटीचे काही फोटोही व्हायरल झाल्याचे सांगितले जात होते. पण नंतर या साऱ्या अफवा असल्याचे स्पष्ट झाले. एकनाथ शिंदे २०१९ ते २०२२ या कालावधीत जेव्हा महाविकास आघाडीकडून मंत्री होते, त्यावेळी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. तो फोटो कोणीतरी व्हायरल केला होता असे अखेर उघडकीस आले.

शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यानंतर सुमारे आठवड्याभरानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य केले. नामांतराच्या प्रस्तावाबाबत काहीच माहिती नव्हते, असा दावा त्यांनी केला. नामांतराचा निर्णय घेणार हे मला माहिती नव्हते. नामांतराच्या निर्णयाबाबत योग्य पद्धतीने माहिती देण्यात आली नाही. औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर करताना सुसंवाद साधला गेला नाही. थेट मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर झाल्यावरच याबाबत समजले. नामांतराच्या मुद्द्यावर हवी तशी चर्चा झाली नाही. नामांतरापेक्षा इतर मूलभूत प्रश्नावर लक्ष देणे गरजेचे होते. नामांतराचा मुद्दा हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळSharad Pawarशरद पवारEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा