शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
6
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
7
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
8
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
9
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
10
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
11
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
12
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
13
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
14
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
15
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
16
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
17
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
18
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
19
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
20
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar Eknath Shinde: "एकनाथ शिंदेंची उगीच अशी बदनामी करणं योग्य नाही"; शरद पवारांचं रोखठोक मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 18:51 IST

शरद पवार नक्की कशाबद्दल बोलले, वाचा सविस्तर

Sharad Pawar Eknath Shinde: अनेक नाट्यमय घडामोडींनंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले. भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. त्यांच्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. या साऱ्या गोंधळानंतर अचानक एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली होती. त्या संदर्भातील काही फोटो व्हायरल झाले. भेटीचे वृत्त आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून त्याचे खंडन करण्यात आले. अशी कुठलीही भेट झाली नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आले. त्याच मुद्द्यावर आज शरद पवार यांनीही मत व्यक्त केले.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आमच्यात अशी कोणतीही भेट झाली नाही. जो फोटो मधल्या काळात व्हायरल झाला होता तो फोटो दोन वर्षांपूर्वीचा होता. त्या फोटोचा आणि सध्याच्या राजकारणाचा काहीच संबंध नाही. त्यामुळे या प्रकारच्या बातम्या पसरवणं हे चुकीचं आहे. उगीच एकनाथ शिंदेंची अशी बदनामी करणं योग्य नाही, असे अतिशय स्पष्ट आणि रोखठोक मत शरद पवार यांनी व्यक्त केले. 

दिवसभरातील कार्यक्रम आटोपल्यावर संध्याकाळच्या सुमारास एकनाथ शिंदे शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले अशी चर्चा होती. तिथे त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन शुभेच्छांचा स्वीकार केला, असेही वृत्त आले होते. तसेच या भेटीचे काही फोटोही व्हायरल झाल्याचे सांगितले जात होते. पण नंतर या साऱ्या अफवा असल्याचे स्पष्ट झाले. एकनाथ शिंदे २०१९ ते २०२२ या कालावधीत जेव्हा महाविकास आघाडीकडून मंत्री होते, त्यावेळी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. तो फोटो कोणीतरी व्हायरल केला होता असे अखेर उघडकीस आले.

शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यानंतर सुमारे आठवड्याभरानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य केले. नामांतराच्या प्रस्तावाबाबत काहीच माहिती नव्हते, असा दावा त्यांनी केला. नामांतराचा निर्णय घेणार हे मला माहिती नव्हते. नामांतराच्या निर्णयाबाबत योग्य पद्धतीने माहिती देण्यात आली नाही. औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर करताना सुसंवाद साधला गेला नाही. थेट मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर झाल्यावरच याबाबत समजले. नामांतराच्या मुद्द्यावर हवी तशी चर्चा झाली नाही. नामांतरापेक्षा इतर मूलभूत प्रश्नावर लक्ष देणे गरजेचे होते. नामांतराचा मुद्दा हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळSharad Pawarशरद पवारEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा