शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

आता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना शरद पवारांनी 'हा' सल्ला द्यायला हवा : चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 12:42 IST

केंद्र सरकारकडून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचे अनेकदा प्रयत्न केले. केंद्र सरकारने आणखी काय करायला पाहिजे हे मला समजत नाही..

पुणे : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी विरोधी पक्ष सोडताना दिसत नाही.शरद पवार यांनी पण केंद्र सरकारवर कृषी कायदे व शेतकरी आंदोलन यावरून अनेकदा निशाणा साधला आहे. तसेच काही सल्ले देखील दिले आहेत.  पवार यांनी शेतकरी कायद्याबाबत रविवारी रात्री एक ट्विट केले. त्या ट्विटवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच पवारांनी खरं तर आता शेतकऱ्यांना घरी जाण्याचा सल्ला द्यावा अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, लोकसभा आणि राज्यसभेत हे कृषी कायदे ज्या दिवशी पारित करण्यात आले त्यावेळी कायद्याबाबत चर्चा व्हायला हवी होती असे जर शरद पवारांना अपेक्षित होते तर त्यादिवशी त्यांनी राज्यसभेत उपस्थित राहणे गरजेचे होते. मात्र ते अनुपस्थित राहिले. 

पाटील म्हणाले, केंद्र सरकारकडून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचे अनेकदा प्रयत्न केले. केंद्र सरकारने आणखी काय करायला पाहिजे हे मला समजत नाही. तसेच आता न्यायालयाने कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला दीड वर्षांसाठी स्थगिती दिली आहे. त्यामुळे या कालावधीत चर्चा घडणार असून शेतकरी वर्गाला विश्वासात सुद्धा घेतले जाणार आहे. पण तरी हा आडमुठेपणा सुरु आहे. त्याचमुळे आता शरद पवार यांनीच शेतकर्‍यांना आपापल्या घरी जाण्याचा सल्ला द्यायला हवा, कारण आता शेतकऱ्यांचे बर्‍यापैकी समाधान झाले आहे. 

देशातील शेतकऱ्यांना सुखी आणि सुरक्षित करणारा अर्थसंकल्पपंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्‍यांना सुखी आणि सुरक्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यातूनच शेतकर्‍यांना भरीव तरतूदी मिळतील अशी अपेक्षा आहे. तसेच मध्यम वर्गाची अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असणार आहे. अर्थसंकल्प कितीही मोठा असला तरी नेते केवळ अंदाज बांधू शकतात. 

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवारFarmer strikeशेतकरी संपCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण