शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

आता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना शरद पवारांनी 'हा' सल्ला द्यायला हवा : चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 12:42 IST

केंद्र सरकारकडून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचे अनेकदा प्रयत्न केले. केंद्र सरकारने आणखी काय करायला पाहिजे हे मला समजत नाही..

पुणे : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी विरोधी पक्ष सोडताना दिसत नाही.शरद पवार यांनी पण केंद्र सरकारवर कृषी कायदे व शेतकरी आंदोलन यावरून अनेकदा निशाणा साधला आहे. तसेच काही सल्ले देखील दिले आहेत.  पवार यांनी शेतकरी कायद्याबाबत रविवारी रात्री एक ट्विट केले. त्या ट्विटवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच पवारांनी खरं तर आता शेतकऱ्यांना घरी जाण्याचा सल्ला द्यावा अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, लोकसभा आणि राज्यसभेत हे कृषी कायदे ज्या दिवशी पारित करण्यात आले त्यावेळी कायद्याबाबत चर्चा व्हायला हवी होती असे जर शरद पवारांना अपेक्षित होते तर त्यादिवशी त्यांनी राज्यसभेत उपस्थित राहणे गरजेचे होते. मात्र ते अनुपस्थित राहिले. 

पाटील म्हणाले, केंद्र सरकारकडून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचे अनेकदा प्रयत्न केले. केंद्र सरकारने आणखी काय करायला पाहिजे हे मला समजत नाही. तसेच आता न्यायालयाने कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला दीड वर्षांसाठी स्थगिती दिली आहे. त्यामुळे या कालावधीत चर्चा घडणार असून शेतकरी वर्गाला विश्वासात सुद्धा घेतले जाणार आहे. पण तरी हा आडमुठेपणा सुरु आहे. त्याचमुळे आता शरद पवार यांनीच शेतकर्‍यांना आपापल्या घरी जाण्याचा सल्ला द्यायला हवा, कारण आता शेतकऱ्यांचे बर्‍यापैकी समाधान झाले आहे. 

देशातील शेतकऱ्यांना सुखी आणि सुरक्षित करणारा अर्थसंकल्पपंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्‍यांना सुखी आणि सुरक्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यातूनच शेतकर्‍यांना भरीव तरतूदी मिळतील अशी अपेक्षा आहे. तसेच मध्यम वर्गाची अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असणार आहे. अर्थसंकल्प कितीही मोठा असला तरी नेते केवळ अंदाज बांधू शकतात. 

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवारFarmer strikeशेतकरी संपCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण