शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पवारांच्या 'या' दोन अटी अमान्य केल्याने सरकार स्थापण्याची भाजपची संधी हुकली ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 12:35 PM

राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यातील सरकारच्या मोबदल्यात कृषीमंत्रालय दिल्यास, बिहारमध्येही अशी मागणी होऊ शकते. बिहारमध्ये भाजप नितीश कुमार यांच्या जदयूमुळे सत्तेत आहे. नितीश यांच्याकडूनही रेल्वे मंत्रालयाची मागणी होऊ शकते. हे टाळण्यासाठी भाजप नेतृत्वाने राष्ट्रवादीला सोबत घेण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. 

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या दोन अटी अमान्य केल्याने महाराष्ट्रात भाजपची सत्तास्थापनेची संधी हुकल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापनेसाठी भाजपसोबत जाण्यास तयारी होता, मात्र त्यांच्या दोन अटी होत्या. त्यासाठी भाजप नेतृत्वाने नकार दिला असून सरकार स्थापन करणे शक्य झाले नसल्याचे वृत्त 'नवभारत टाईम्स' या हिंदी पोर्टलने दिले आहे. 

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आपल्या अटी सांगितल्या होत्या. यामध्ये केंद्रात सक्रिय असलेल्या आपल्या कन्या सुप्रिया सुळे यांना केंद्रीय कृषीमंत्रीपद द्यावे आणि राज्यातील नेतृत्व बदलावे अर्थात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी नको, अशी मागणी केली होती. मात्र या दोन्ही मागण्यांसाठी भाजपने नकार दिला. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यातील सरकारच्या मोबदल्यात कृषीमंत्रालय दिल्यास, बिहारमध्येही अशी मागणी होऊ शकते. बिहारमध्ये भाजप नितीश कुमार यांच्या जदयूमुळे सत्तेत आहे. नितीश यांच्याकडूनही रेल्वे मंत्रालयाची मागणी होऊ शकते. हे टाळण्यासाठी भाजप नेतृत्वाने राष्ट्रवादीला सोबत घेण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. 

राज्यात मागील पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांनी स्थिर सरकार चालवले होते. त्यामुळे नेतृत्व बदल करण्याच्या मूडमध्ये मोदी-शाह नव्हते. निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल, असं म्हटलं होतं. त्यामुळे फडणवीसांना बदलने शक्य नव्हते, असंही सुत्रांनी सांगितले.