शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांवरील अत्याचाराविरोधात ठाकरे सरकारनं आणलेलं 'शक्ती विधेयक' केंद्र सरकारनं नाकारलं, कारण...
2
बंगालमध्ये बाबरी मशीद उभारण्यासाठी किती मिळाली देणगी?; पैसे मोजण्यासाठी मागवली मशीन, Video पाहा
3
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
4
ट्रम्प यांनी दिलेला युद्धबंदीचा आदेश; अवघ्या ४५ दिवसांच मोडला! थायलंडचे कंबोडियावर हवाई हल्ले
5
Donald Trump: "मी ८ युद्धे थांबवली, पण रशिया-युक्रेन संघर्ष थांबवणं सोपं नाही..." ट्रम्प असं का म्हणाले?
6
Russia Attack Ukraine: ६५३ ड्रोन्स, ५१ मिसाईल; युक्रेन हादरले! रशियाचा मोठा हवाई हल्ला
7
Goa Fire :  कुटुंबाचा आधार गेला! पैसे कमावण्यासाठी गोव्यात आलेले दोन भाऊ; क्लबच्या आगीत झाला मृत्यू
8
फक्त ७.१०% च्या व्याजदरावर 'इकडे' मिळतंय होमलोन; ₹८० लाखांच्या कर्जासाठी किती हमी मंथली सॅलरी, EMI किती?
9
गोव्यातील भीषण आगीत अवघ्या १५ मिनिटांत कुटुंब उद्ध्वस्त; चौघांचा मृत्यू, एकमेव पत्नी बचावली
10
घरबसल्या श्रीमंत व्हाल! 'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा ₹४० लाखांपेक्षा अधिक टॅक्स फ्री रक्कम
11
संसार वाचवण्यासाठी 'ती' सहन करत राहिली, पण नराधम पतीने हद्दच ओलांडली! मारहाण केली अन्...
12
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
14
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
15
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
16
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
17
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
18
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
19
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
20
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

"महायुतीचे सरकार हे वास्तववादी भान हरवलेले सरकार, गेल्या ६४ वर्षात महाराष्ट्रात कधीही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 15:48 IST

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची खरमरीत टीका

Jitendra Awhad on Mahayuti Govt: लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दमदार यश मिळवले. त्यानंतर काल विधान परिषदेची निवडणूक पार पडली. त्यात महायुतीने बाजी मारली. राज्यात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी हा सामना सुरुच आहे. त्याचप्रमाणे दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही सुरुच आहेत. या दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. "महाराष्ट्रावरील कर्ज दुप्पटीने वाढत आहे असा अहवाल भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी (कॅग) दिला आहे. त्यामुळे राज्यातील महायुती सरकार हे वास्तववादी भान हरवलेलं सरकार आहे," अशी खरमरीत टीका कॅगच्या अहवालावर बोलताना आव्हाड यांनी केली.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, "महसुली जमा आणि खर्च यांच्यातील वाढत चाललेल्या तफावतीमुळे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. महसुली जमा आणि खर्च यांच्यातील वाढत चाललेल्या तफावतीमुळे तिजोरीवर भार वाढत असल्याचे निरीक्षण सुद्धा नोंदवलं आहे. २०२२-२३ या वर्षाच्या महाराष्ट्र राज्य वित्त लेखापरीक्षण अहवालाने राज्य सरकारला वास्तववादी अर्थसंकल्प तयार करण्याची शिफारस केली आहे. मुळात राज्यातील महायुतीचे हे ट्रिपल इंजिन सरकार वास्तववादी भान हरवलेलं सरकार आहे."

"राज्य सरकारकडून राज्यातील विविध संस्थांना ५०००० कोटीचा निधी दिला आहे. ५० हजार कोटी कुठे आणि कसे दिले. हे जर कॅगला कळत नसेल तर मग सर्वसामान्य मराठी माणसाला यामध्ये काय कळणार आहे. त्याच्या तिजोरीतील ५० हजार कोटी मंडळाने आणलेले नव्हते ते महाराष्ट्रातील गोरगरीब, कष्टकरी माणसाच्या खिशातून गेलेले आहे.  कॅगने  या संदर्भातील राज्य सरकारवर केलेले ताशेरे हे गंभीर आहे महाराष्ट्रात ६४ वर्षात आजपर्यंत असे ताशेरे कॅगने कधीही ओढलेले नाही आहे. कॅगने महायुती सरकारवर आज जसे गंभीर ताशेरे ओढले आहे तसे आजपर्यंत कधी कॅगने ओढलेले नाही आहे," असेही जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडMahayutiमहायुतीGovernmentसरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेस