शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

तुम्ही सरकारमध्ये जा; मी अध्यक्षपद सोडतो, असे शरद पवार म्हणाले होते, अजित पवारांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 07:48 IST

Ajit Pawar: भाजपसोबत जाण्याबाबतच्या निर्णयाची माहिती शरद पवार यांना दिली होती. शरद पवारांनी मला बोलावून सांगितले की, आता सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केला.

मुंबई - भाजपसोबत जाण्याबाबतच्या निर्णयाची माहिती शरद पवार यांना दिली होती. शरद पवारांनी मला बोलावून सांगितले की, आता सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) दोन दिवसीय चिंतन शिबिराचा समारोप करताना पवार यांनी राष्ट्रवादीत पडलेली फूट आणि सत्ता स्थापनेनंतरचा घटनाक्रम प्रथमच सविस्तरपणे उलगडला.आम्ही २ जुलैला घेतलेला निर्णय आवडला नव्हता, तर १५ दिवसांनी १७ जुलैला आम्हा सगळ्या मंत्र्यांना त्यांनी चव्हाण प्रतिष्ठानला कशाला बोलवले? तुम्ही आम्हाला गाफील ठेवायचे का? अशी उद्विग्नता अजित पवार यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, सर्व ठीक आहे! - प्रफुल्ल पटेल, मी, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, अनिल देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे असे आम्ही १० ते १२ जण ‘देवगिरी’वर बैठकीसाठी बसलो. - सरकारमध्ये जाण्याबाबत शरद पवारांना थेट सांगण्याआधी सुप्रियाला सांगितले. तेव्हा तिने  सांगितले की, ‘मला सात ते दहा दिवस द्या. मी साहेबांना राजी करते.’ आम्ही १० दिवस थांबलो. - तेव्हा जयंत पाटील, अनिल देशमुखही तिथे होते. त्यानंतर आम्ही थेट शरद पवारांकडे गेलो. त्यांनी सर्व ऐकले. ते म्हणाले, ‘ठीक आहे!’ असा दावा अजित पवारांनी केला.

उद्योगपतीकडे का बोलावले? १२ ऑगस्टला पुण्यातील एका उद्योगपतीकडे बोलवले. त्यांनी सांगितले इथे वरिष्ठ (शरद पवार), जयंत पाटील, तुम्ही आणि मी एकत्र जेवायचे. निरोप आल्यानंतर मी गेलो. पूर्ववत एकत्र येण्याचा निर्णय झाला. दीड महिना उलटला तरी निर्णय झाला नाही. जर निर्णय घ्यायचाच नव्हता तर कशासाठी हे सगळे केले. कुणासाठी केले, असा सवाल त्यांनी केला. 

धरसोड वृत्ती, गाफील ठेवणे बरोबर नाही!पुस्तक प्रकाशनानंतर शरद पवार यांनी राजीनामा दिला. पण, त्यानंतर आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाडांना शरद पवारांनी बोलवून घेतले आणि त्यांना सांगितले, “उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला काही लोक, महिला व युवक पाहिजेत. त्यांनी तिथे आंदोलन करून मागणी करायची की राजीनामा परत घ्या.” तेव्हा मला प्रश्न पडला की, राजीनामा द्यायचा नव्हता तर दिलाच का? त्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. आम्हाला सांगितले की, माझ्यानंतर सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा. सगळ्या गोष्टी ठरल्या. सगळ्यांनी तयारी दाखवली. ही धरसोड वृत्ती, गाफील ठेवणे बरोबर नाही. हे मला पटत नाही. तुम्ही एकदा काय ते ठरवा, हेही मी त्यांना सांगितल्याचे अजित पवार म्हणाले. 

...तर उपमुख्यमंत्रिपद चारदा मिळाले नसते : जितेंद्र आव्हाड- तुम्ही पवार नसता, तर बारामतीतून निवडून आला असता का? अहो, तुमची पुण्याई की तुम्ही त्यांच्याच घरात जन्माला आलात. आव्हाडांच्या घरात जन्माला आला असता तर तुम्हाला चार वेळा उपमुख्यमंत्रिपद मिळाले नसते.- बंडखोरी केल्यानंतरही तुम्हाला पक्षात घेतले नसते. शरद पवारांचा पुरोगामीत्वाचा चेहरा पुसून टाकायचा, त्यांचा राजकीय प्रवास धुळीला मिळवायचा, पण आपण सत्तेत राहायचे हे आम्हाला नामंजूर होते, असा गौप्यस्फोट करत शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड