शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
6
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
7
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
8
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
9
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
10
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
11
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
12
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
13
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
14
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
15
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
16
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
17
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
18
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
19
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले

कधीकाळी शरद पवारही सरसावले होते भाजपकडे !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 4:20 PM

विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादीमधून अनेक नेते वेगळे होत आहेत. या परिस्थितीत राष्ट्रवादीला निवडणुकीला सामोरे जायचे असून महाराष्ट्रातील बदलेल्या राजकीय आव्हानांना तोंड द्यायचे आहे.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षांतील नेत्यांमध्ये पक्षांतराची जणूकाही स्पर्धा सुरू झाली आहे. पक्षांतरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आघाडीवर आहे. सध्याच्या पक्षांतराच्या घडामोडींवरून २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची दाखवलेली तयारी याचे कारणं स्पष्ट होते. राष्ट्रवादी पक्ष रिकामा होऊ नये, यासाठीच पवारांनी भाजपला न मागता बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दाखवली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

२०१४ विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्र लढले होते. मात्र महाराष्ट्रातील जनतेने कुणाच्याही पारड्यात बहुमताचा आकडा टाकला नाही. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी पाठिंब्याची गरज होती. परंतु, निकालाच्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्यास तयार असल्याचे सूचित केले. किंबहुना भाजपने देखील सरकार स्थापनेचा दावा करत शपथविधीही उरकून घेतला होता. मात्र अखेरीस भाजपने विचारधारेचे कारण देत सेनेसोबत घरोबा करून सरकार चालवले.

२०१४ मध्ये भाजपला पाठिंबा देण्याचा पवार यांनी घेतलेला निर्णय शिवसेनेसाठी फारच क्लेशदायी ठरला. राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची शाश्वती असल्यामुळे भाजपने मंत्रीमंडळात कायमच शिवसेनेला दुय्यम स्थान दिले. तसेच सरकार वाचविण्यासाठी आदृश्य हात असल्याचे चित्र निर्माण केले. त्यामुळे शिवसेनेला अनेकदा नमते घ्यावे लागले. अनेकदा शिवसेनेकडून राजीनामास्त्र काढण्यात आले. परंतु, त्याचा भाजपवर परिणाम झाला नाही. परिणामी शिवसेनेने राज्यात सत्तेत सहभागी असूनही विरोधकांचीच भूमिका पार पाडली.

दरम्यान सत्तेला लाथ मारण्याची भूमिका शिवसेनेने घेतली होती. परंतु, पक्षात फूट पडेल या भितीने पक्ष नेतृत्वाने सत्ता सोडणे सोयीचे होणार नसल्याचे ओळखले होते. परंतु, शिवसेनेला जी भीती होती, तिच भीती शरद पवार यांनाही होती का, असा सवाल राष्ट्रवादीतून सध्या सुरू असलेल्या पक्षांतरामुळे उपस्थित होत आहे. २०१४ पासून राष्ट्रवादीतील २० नेत्यांनी पक्षांतर केले. तर आणखी १० नेते पक्षांतराच्या तयारीत आहेत. यापैकी अनेक नेते विद्यमान आमदार आहेत.

विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादीमधून अनेक नेते वेगळे होत आहेत. या परिस्थितीत राष्ट्रवादीला निवडणुकीला सामोरे जायचे असून महाराष्ट्रातील बदलेल्या राजकीय आव्हानांना तोंड द्यायचे आहे.