शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
6
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
7
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
8
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
9
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
10
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
11
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
12
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
13
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
14
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
15
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
16
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
17
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
18
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
19
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
20
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी

विश्वासघातकी राजकारणाचे जनक कोण? महाराष्ट्राने तुम्हाला हद्दपार केले; भाजपाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 18:18 IST

सत्य बोचरं असते, सत्य पचवणं कठीण असते. अमित शाहांनी सत्य मांडलं. १९७८ साली अस्थिर विश्वासघातकी आणि पाठीत खंजीर घुसवणाऱ्या राजकारणाची सुरुवात कुणी केली हा प्रश्न शरद पवारांच्या जिव्हारी लागला असं शेलारांनी म्हटलं. 

मुंबई - शरद पवारांचा कुठेतरी तोल जाऊ लागलाय याची चिंता वाटते. अमित शाह बोलले ते सत्य बोलले. भाजपाचं अधिवेशन आणि अमितभाईंचं भाषण शरद पवारांच्या जिव्हारी लागलं. तुम्ही तडीपारीची भाषा करता, हीच भाषा आणि अशाच वक्तव्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या मित्रपक्षाला महाराष्ट्राने हद्दपार केले. तुम्ही तडीपारीची भाषा आम्हाला नका सांगू. महाराष्ट्रातील मराठी माणसाने तुम्हाला हद्दपार केले त्याचे चिंतन करा असा घणाघात भाजपा नेते मंत्री आशिष शेलार यांनी शरद पवारांवर केला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत पवारांच्या आरोपांवर पलटवार केला. शेलार म्हणाले की, न्यायालयात ज्यांना निर्दोषत्व मिळालं त्या अमित भाईंबद्दल वारंवार अशाप्रकारे उल्लेख करणे हे न्यायिक प्रक्रियेला धरून तर नाहीच. लवासाबाबत कोर्टाने दिलेले निर्देश, त्यातील शंका आणि वलय ही चार बोटे कोणाकडे येतात हे लक्षात ठेवा. महाराष्ट्राने असाही नेता बघितला नव्हता हे म्हणण्याची आमच्यावर वेळ आणू नका. जनसंघ आणि भाजपाशी जवळीक तुमची होती हे आज तुम्हीच मान्य केले. कधी कधी सत्य समोर येते. जनसंघाच्या जीवावर तुम्ही सरकार बनवले हे तुम्ही मान्य केले. जरा आणखी खरे बोला. ते सरकार बनवण्यापूर्वी विश्वासघाताचं कुठलं बीजारोपण तुम्ही केले होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच कुठल्या नेत्याच्याविरोधात तुम्ही काय केले होते. विश्वासघातकी संस्कृतीचे जनक ४५ वर्षापूर्वी कोण होते ते सत्यही समोर आणा. स्वत: महाराष्ट्रातून हद्दपार झाले त्यांनी तडीपारीची भाषा करू नये. शरद पवारांनी तोल गेल्यासारखं वागू नये. लवासापासून बऱ्याच प्रकरणाचे संकेत कोणाकडे जातात हे बोलायची वेळ आणू नका. सत्तेसाठी आणि राजकारणासाठी वाट्टेल ते याचे जनक कोण त्याचेही उत्तर शरद पवारांनी द्यावे. जनसंघ आणि भाजपासोबत तुम्ही सरकार बनवले. सत्तेसाठी तुम्हाला बाकी काही लागत नाही हेदेखील सत्य आहे असंही आशिष शेलार यांनी सांगितले. 

दरम्यान, सत्य बोचरं असते, सत्य पचवणं कठीण असते. अमित शाहांनी सत्य मांडलं. १९७८ साली अस्थिर विश्वासघातकी आणि पाठीत खंजीर घुसवणाऱ्या राजकारणाची सुरुवात कुणी केली हा प्रश्न शरद पवारांच्या जिव्हारी लागला. सत्याचाच विजय होतो. विश्वासघातकी राजकारणाचं ट्रेनिंग उद्धव ठाकरे घेतायेत हे २०१९ ला महाराष्ट्राने पाहिले. महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आलीय ते फुटणार असे आधीच सांगीतले होते. स्वार्थासाठी, सत्तेसाठी एकत्र आले ते आता बाजूला होतायेत. महाराष्ट्राच्या भल्यासाठी मविआतील लोक एकत्र आले नव्हते. त्यांचा स्वार्थ आता संपला त्यामुळे ते दूर जातायेत असा टोलाही आशिष शेलार यांनी मविआ नेत्यांना लगावला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAmit Shahअमित शाहBJPभाजपाAshish Shelarआशीष शेलारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरे