शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

विश्वासघातकी राजकारणाचे जनक कोण? महाराष्ट्राने तुम्हाला हद्दपार केले; भाजपाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 18:18 IST

सत्य बोचरं असते, सत्य पचवणं कठीण असते. अमित शाहांनी सत्य मांडलं. १९७८ साली अस्थिर विश्वासघातकी आणि पाठीत खंजीर घुसवणाऱ्या राजकारणाची सुरुवात कुणी केली हा प्रश्न शरद पवारांच्या जिव्हारी लागला असं शेलारांनी म्हटलं. 

मुंबई - शरद पवारांचा कुठेतरी तोल जाऊ लागलाय याची चिंता वाटते. अमित शाह बोलले ते सत्य बोलले. भाजपाचं अधिवेशन आणि अमितभाईंचं भाषण शरद पवारांच्या जिव्हारी लागलं. तुम्ही तडीपारीची भाषा करता, हीच भाषा आणि अशाच वक्तव्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या मित्रपक्षाला महाराष्ट्राने हद्दपार केले. तुम्ही तडीपारीची भाषा आम्हाला नका सांगू. महाराष्ट्रातील मराठी माणसाने तुम्हाला हद्दपार केले त्याचे चिंतन करा असा घणाघात भाजपा नेते मंत्री आशिष शेलार यांनी शरद पवारांवर केला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत पवारांच्या आरोपांवर पलटवार केला. शेलार म्हणाले की, न्यायालयात ज्यांना निर्दोषत्व मिळालं त्या अमित भाईंबद्दल वारंवार अशाप्रकारे उल्लेख करणे हे न्यायिक प्रक्रियेला धरून तर नाहीच. लवासाबाबत कोर्टाने दिलेले निर्देश, त्यातील शंका आणि वलय ही चार बोटे कोणाकडे येतात हे लक्षात ठेवा. महाराष्ट्राने असाही नेता बघितला नव्हता हे म्हणण्याची आमच्यावर वेळ आणू नका. जनसंघ आणि भाजपाशी जवळीक तुमची होती हे आज तुम्हीच मान्य केले. कधी कधी सत्य समोर येते. जनसंघाच्या जीवावर तुम्ही सरकार बनवले हे तुम्ही मान्य केले. जरा आणखी खरे बोला. ते सरकार बनवण्यापूर्वी विश्वासघाताचं कुठलं बीजारोपण तुम्ही केले होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच कुठल्या नेत्याच्याविरोधात तुम्ही काय केले होते. विश्वासघातकी संस्कृतीचे जनक ४५ वर्षापूर्वी कोण होते ते सत्यही समोर आणा. स्वत: महाराष्ट्रातून हद्दपार झाले त्यांनी तडीपारीची भाषा करू नये. शरद पवारांनी तोल गेल्यासारखं वागू नये. लवासापासून बऱ्याच प्रकरणाचे संकेत कोणाकडे जातात हे बोलायची वेळ आणू नका. सत्तेसाठी आणि राजकारणासाठी वाट्टेल ते याचे जनक कोण त्याचेही उत्तर शरद पवारांनी द्यावे. जनसंघ आणि भाजपासोबत तुम्ही सरकार बनवले. सत्तेसाठी तुम्हाला बाकी काही लागत नाही हेदेखील सत्य आहे असंही आशिष शेलार यांनी सांगितले. 

दरम्यान, सत्य बोचरं असते, सत्य पचवणं कठीण असते. अमित शाहांनी सत्य मांडलं. १९७८ साली अस्थिर विश्वासघातकी आणि पाठीत खंजीर घुसवणाऱ्या राजकारणाची सुरुवात कुणी केली हा प्रश्न शरद पवारांच्या जिव्हारी लागला. सत्याचाच विजय होतो. विश्वासघातकी राजकारणाचं ट्रेनिंग उद्धव ठाकरे घेतायेत हे २०१९ ला महाराष्ट्राने पाहिले. महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आलीय ते फुटणार असे आधीच सांगीतले होते. स्वार्थासाठी, सत्तेसाठी एकत्र आले ते आता बाजूला होतायेत. महाराष्ट्राच्या भल्यासाठी मविआतील लोक एकत्र आले नव्हते. त्यांचा स्वार्थ आता संपला त्यामुळे ते दूर जातायेत असा टोलाही आशिष शेलार यांनी मविआ नेत्यांना लगावला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAmit Shahअमित शाहBJPभाजपाAshish Shelarआशीष शेलारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरे