शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

"सामना अग्रलेखाला माझ्या दृष्टीने..."; शरद पवारांचा उद्धव ठाकरे, संजय राऊतांना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 10:49 IST

अलीकडेच सामना संपादकीयमधून शरद पवारांवर टीका करण्यात आली होती.

सातारा - राष्ट्रवादीत आम्ही काय केले ते त्यांना माहिती नाही. पक्षाचे सहकारी अनेक गोष्ट बोलतो, वेगवेगळी मतेही असतात पण ते बाहेर जाऊन प्रसिद्ध करत नाही. हा आमच्या घरातला प्रश्न आहे. आपला पक्ष पुढे कसा जाणार हे सगळ्यांना ठाऊक आहे. नवीन नेतृत्वाची फळी कशी तयार केली जाते हे पक्षातील सर्वांना माहिती आहे असं सांगत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी सामना अग्रलेखातून झालेल्या टीकेचा समाचार घेतला. 

शरद पवार म्हणाले की, १९९९ साली आम्ही पक्षाची स्थापना केली, त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे संयुक्त सरकार करायचे होते तेव्हा नव्या सरकारमध्ये पक्षातील असे अनेक सहकारी होते ज्यांच्या आयुष्यात सत्तेचा पहिलाच प्रवास होता. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, आर आर पाटील. देशमुख होते अशी अनेक नावे आहेत. माझी सुरुवात राज्यमंत्री म्हणून झाली त्यानंतर प्रमोशन झाले. पण मी जी नावे घेतली त्यांची नियुक्ती कॅबिनेट मंत्री म्हणून झाली. त्या प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तत्व दाखवतो असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत आम्ही नेतृत्व तयार करतो, त्यामुळे कुणी आमच्याबद्दल लिहिले, हा त्यांचा अधिकार आहे परंतु आमच्या दृष्टीने त्याला किंमत नाही. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आम्हाला ठाऊक आहे आम्ही काय करतो त्यात आम्हाला समाधान आहे असं सांगत पवारांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्याचसोबत राजकीय पक्षांच्या धोरणामध्ये सहकारी पक्षांसोबत १०० टक्के एकमत असेल नाही. काहीगोष्टी पुढे मागे होतात, कुरघोडी होतात पण त्याचा परिणाम महाविकास आघाडीवर होणार नाही असंही शरद पवारांनी स्पष्ट केले. 

सामना अग्रलेखात काय म्हटलं होतं?अलीकडेच सामना संपादकीयमधून शरद पवारांवर टीका करण्यात आली होती. त्यात म्हटलं होतं की,   शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले अशी टीका पवारांवर करण्यात आली होती.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस