शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा का दिला? शरद पवारांच्या उत्तराने अजितदादांची 'बोलती बंद'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 17:47 IST

नागालँडमध्ये भाजपा चालतो, मग महाराष्ट्रात काय अडचण आहे, असा अजित पवारांनी केला होता सवाल

Ajit Pawar vs Sharad Pawar: महाराष्ट्रात रविवारी मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. या दोन गटांच्या आज बैठका होत्या. या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष होते. अजित पवारांसोबत कोण आणि शरद पवारांसोबत कोण, असा सवाल संपूर्ण राज्यातील जनतेला पडला होता. या मुद्द्यावर आजच्या बैठकीत अजित पवारांना बहुसंख्य आमदारांचे समर्थन असल्याचे दिसून आले. तर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या शरद पवार गटाच्या बैठकीत मोजकेच आमदार उपस्थित राहिले. त्यानंतर आज अजित पवारांनी पक्षातील अंतर्गत गोष्टींबाबत रोखठोक मत मांडले. यावर प्रत्युत्तराचे भाषण करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागालँडमधील भाजपाला साथ देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. तसेच त्या निर्णयामागचे कारणही समजावून सांगितले.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे सरकार तयार झाले. नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा दिला. मग आम्ही भाजपासोबत गेलो त्यात काय चुकलं? असं या साऱ्यांचे म्हणणं आहे. मीच तेथील राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना भाजपाला पाठिंबा देण्यास परवानगी दिली हे खरं आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे सात आमदार निवडून आले होते. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की नागालँड किंवा मणिपूर सारखी राज्य ही भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहेत. तो संबंध भाग शेजारील देशांना चिकटून आहे. चीन आणि पाकिस्तान या देशांना चिकटून असलेली भारतातील जी राज्य आहेत, त्यांच्यासंबंधी बारकाईने विचार करून निर्णय घ्यावे लागतात. अशा वेळी या राज्यातील असंतोषाचा बाहेरील देश गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे अशा राज्यांमध्ये राजकीय स्थैर्य असणे महत्त्वाचे असते, म्हणून तेथे पाठिंबा देण्यात आला", असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

23 वर्षापूर्वी राष्ट्रवादीचा जन्म झाला. राष्ट्रवादीने अनेक नेते तयार केले. संपूर्ण देशाचं आजच्या बैठकीकडे लक्ष आहे. तुमच्या मदतीने, कष्टाने पक्षबांधणीत यशस्वी झालो. आम्ही सर्वजण सत्ताधारी पक्षात नाही, लोकांमध्ये आहोत. लोकशाही टिकवायची असेल तर संवाद महत्वाचा आहे. मात्र देशात संवाद राहिलेला नाही. कार्यकर्त्यांनी कष्टानं पक्ष उभा केला. विरोधकांना एकत्र करायचं काम सुरु आहे. देशाचे नेते म्हणून बोलताना सभ्यता बाळगावी लागते, असेही शरद पवार म्हणाले. 

शिवसेना आणि भाजपात फरक आहे. तेव्हा इंदिरा गांधी यांच्या विरोधात वातावरण होते. बाळासाहेबांनी तेव्हा पत्रक काढले, इंदिरा गांधी संकटात आहेत. त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. शिवसेनेने एकही उमेदवार दिला नाही. काँग्रेसने विधानपरिषदेत शिवसेनेच्या लोकांना जागा दिली. भाजपाचे हिंदुत्व हे विभाजनवादी, विद्वेशवादी, मनुवादी आणि विघातक आहे. तर शिवसेनेचे हिंदुत्व आहे ते लपवून ठेवत नाहीत. ते हिंदुत्व अठरापगड जातीच्या लोकांना घेऊन जाणारे आहे, असा दोन पक्षांतील हिंदुत्वाचा फरक पवारांनी सांगितला.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा