शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
4
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
5
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
6
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
7
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
8
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
10
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
11
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
12
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
13
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
14
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
15
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
16
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
17
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
18
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
19
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
20
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील

नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा का दिला? शरद पवारांच्या उत्तराने अजितदादांची 'बोलती बंद'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 17:47 IST

नागालँडमध्ये भाजपा चालतो, मग महाराष्ट्रात काय अडचण आहे, असा अजित पवारांनी केला होता सवाल

Ajit Pawar vs Sharad Pawar: महाराष्ट्रात रविवारी मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. या दोन गटांच्या आज बैठका होत्या. या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष होते. अजित पवारांसोबत कोण आणि शरद पवारांसोबत कोण, असा सवाल संपूर्ण राज्यातील जनतेला पडला होता. या मुद्द्यावर आजच्या बैठकीत अजित पवारांना बहुसंख्य आमदारांचे समर्थन असल्याचे दिसून आले. तर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या शरद पवार गटाच्या बैठकीत मोजकेच आमदार उपस्थित राहिले. त्यानंतर आज अजित पवारांनी पक्षातील अंतर्गत गोष्टींबाबत रोखठोक मत मांडले. यावर प्रत्युत्तराचे भाषण करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागालँडमधील भाजपाला साथ देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. तसेच त्या निर्णयामागचे कारणही समजावून सांगितले.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे सरकार तयार झाले. नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा दिला. मग आम्ही भाजपासोबत गेलो त्यात काय चुकलं? असं या साऱ्यांचे म्हणणं आहे. मीच तेथील राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना भाजपाला पाठिंबा देण्यास परवानगी दिली हे खरं आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे सात आमदार निवडून आले होते. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की नागालँड किंवा मणिपूर सारखी राज्य ही भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहेत. तो संबंध भाग शेजारील देशांना चिकटून आहे. चीन आणि पाकिस्तान या देशांना चिकटून असलेली भारतातील जी राज्य आहेत, त्यांच्यासंबंधी बारकाईने विचार करून निर्णय घ्यावे लागतात. अशा वेळी या राज्यातील असंतोषाचा बाहेरील देश गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे अशा राज्यांमध्ये राजकीय स्थैर्य असणे महत्त्वाचे असते, म्हणून तेथे पाठिंबा देण्यात आला", असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

23 वर्षापूर्वी राष्ट्रवादीचा जन्म झाला. राष्ट्रवादीने अनेक नेते तयार केले. संपूर्ण देशाचं आजच्या बैठकीकडे लक्ष आहे. तुमच्या मदतीने, कष्टाने पक्षबांधणीत यशस्वी झालो. आम्ही सर्वजण सत्ताधारी पक्षात नाही, लोकांमध्ये आहोत. लोकशाही टिकवायची असेल तर संवाद महत्वाचा आहे. मात्र देशात संवाद राहिलेला नाही. कार्यकर्त्यांनी कष्टानं पक्ष उभा केला. विरोधकांना एकत्र करायचं काम सुरु आहे. देशाचे नेते म्हणून बोलताना सभ्यता बाळगावी लागते, असेही शरद पवार म्हणाले. 

शिवसेना आणि भाजपात फरक आहे. तेव्हा इंदिरा गांधी यांच्या विरोधात वातावरण होते. बाळासाहेबांनी तेव्हा पत्रक काढले, इंदिरा गांधी संकटात आहेत. त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. शिवसेनेने एकही उमेदवार दिला नाही. काँग्रेसने विधानपरिषदेत शिवसेनेच्या लोकांना जागा दिली. भाजपाचे हिंदुत्व हे विभाजनवादी, विद्वेशवादी, मनुवादी आणि विघातक आहे. तर शिवसेनेचे हिंदुत्व आहे ते लपवून ठेवत नाहीत. ते हिंदुत्व अठरापगड जातीच्या लोकांना घेऊन जाणारे आहे, असा दोन पक्षांतील हिंदुत्वाचा फरक पवारांनी सांगितला.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा