शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 09:48 IST

Sharad Pawar on Reservation Percentage: एकीकडे विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू असतानाच दुसरीकडे आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर विरुद्ध आदिवासी असा काहीसा संघर्ष दिसत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी भाष्य केले. 

Sharad Pawar Latest News: राज्यात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ज्वलंत बनला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यांच्या मागणीला ओबीसी समाजातून विरोध होत आहे. दुसरीकडे आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी धनगर समाजातून होत असून, आदिवासी समूदाय आणि आमदार आक्रमक झाले आहे. महाराष्ट्रात आरक्षण मुद्द्याने सरकारची चिंता वाढवली असून, शरद पवारांनीकेंद्र सरकारला आरक्षण मर्यादा वाढवण्याचा सल्ला दिला आहे.

सांगली येथे शरद पवारांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. आरक्षणाच्या विषयावर बोलताना त्यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज आहे, अशी भूमिका मांडली. सरकारने तशी दुरुस्ती केली, तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असे शरद पवार म्हणाले. 

आरक्षण मर्यादेत घटनादुरुस्ती करावी

आरक्षणाचा प्रश्न सोडवता येऊ शकतो का, तुम्हाला काय वाटते? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, "प्रश्न असा आहे की आता ५० टक्क्यांच्या वर जाता येत नाही. ५० टक्क्यांच्या वर आरक्षण हवं असेल, तर संसदेत कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे. काय हरकत आहे दुरुस्ती करायला?", असा सवाल त्यांनी केला. 

२५ टक्के वाढवलं, तर आरक्षणाचा वाद राहणार नाही -शरद पवार

"आता ५० टक्क्यांपर्यंत आरक्षण आहे, जाऊद्या ७५ टक्क्यांपर्यंत. एक काळ असा होता की, तामिळनाडू राज्यात आरक्षण जवळपास ७८ टक्क्यांपर्यंत होतं. तामिळनाडूत ७८ टक्के होऊ शकते, तर महाराष्ट्रात ७५ टक्के का होऊ शकत नाही? ५० आता आहे. ७५ टक्के करायचे असेल, तर २५ टक्के वाढवावं लागेल. २५ वाढवले, तर ज्यांना मिळालं नाही, त्यांचाही विचार करता येईल. जिथे कमी आहे, त्यांचाही विचार करता येईल. यात कुठलाही वाद राहणार नाही", असे शरद पवार म्हणाले. 

शरद पवार म्हणाले, केंद्राच्या बाजूने मतदान करू 

"माझे स्पष्ट मत आहे की, यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. संसदेमध्ये दुरुस्ती आणावी, आम्ही सगळे लोक जे आमचे सदस्य (खासदार) असतील; आम्ही त्यांच्या बाजूने मतदान करू, त्यांना साथ देऊ", अशी भूमिका शरद पवारांनी मांडली.       

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारreservationआरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण