शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

ऊस शेतकरी-कारखानदारांच्या हिताचा तोडगा; स्वाभिमानीची झाकली मूठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 22:08 IST

Sugarcane sugarmill: प्रतिवर्षी स्वाभिमानी संघटनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करूनच ऊसदराचा तिढा सोडवण्याची बैठक होई. त्यामुळे कधीच एका बैठकीत तोडगा निघत नसे. परंतु, जे कायद्याने देणे बंधनकारक आहे, त्याचीच मागणी संघटना करत असल्याने कारखानदारही तातडीने त्यास तयार झाले.

विश्वास पाटील,

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : यंदाच्या हंगामात गतवर्षीप्रमाणेच एकरकमी एफआरपी देण्यास साखर कारखानदारांनी पहिल्याच बैठकीत तयारी दर्शवल्यामुळे कोणतेही जाळपोळ, शेतकऱ्यांचे व कारखान्यांचे नुकसान न होता ऊसदराचा तिढा सुटल्याचे मानण्यात येत आहे. त्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची झाकली मूठ शाबूत राहिली. तोडणी-ओढणीचा दरांत जी १४ टक्के वाढ करण्यात आली आहे, त्याची टनास सरासरी ४० रुपयांची कपात शेतकऱ्यांच्या बिलातून होणार आहे. त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांवर न बसवता ही जबाबदारी कारखान्यांनी उचलावी यासाठी संघटना अडून बसली आहे. ऊसदराचा तिढा सुटल्याने साखर हंगाम वेग घेऊ शकेल. स्वाभिमानी संघटनेने फक्त नैतिकतेच्या धाकावर यंदाची लढाई यशस्वी केली आहे.

यंदा आंदोलन ताणवून धरणे हे संघटनेच्याही अडचणीचे होते. त्याची काही महत्त्वाची कारणे आहेत. संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे पुण्यात उपचार घेत आहेत. कोरोनाचे संकट असल्याने जयसिंगपूरची ऊस परिषद वीस वर्षांत पहिल्यांदाच उघडपणे घेण्यावर मर्यादा आल्या आहेत. शिवाय स्वाभिमानी संघटना आता सरकारचा घटक पक्ष आहे. लोकसभेच्या पराभवातून कार्यकर्ते अजून लढाऊ मानसिकतेत आलेले नाहीत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आंदोलन न करताही कायद्याने शेतकऱ्याला सरासरी किमान टनास २८०० ते ३ हजार रुपये मिळणारच आहेत. त्यामुळे आंदोलन कुणी आणि कशासाठी करायचे हा देखील महत्त्वाचा प्रश्न होता.

यंदा नैसर्गिक स्थितीही शेतकऱ्याच्या अंगावर येणारी आहे. पावसाने नोव्हेंबर उजाडला तरी पाठ सोडलेली नाही. मध्यंतरीच्या अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांचा ऊस भुईसपाट झाला आहे. हे पीक अशा स्थितीत जास्त काळ शेतात राहणे म्हणजे नुकसान वाढवण्यासारखेच आहे. वर्षाला किमान ३ हजार रुपये एफआरपी मिळण्याची हमी झाल्यामुळे प्रतिवर्षी उसाचे क्षेत्र वाढत आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात २० हजार हेक्टरने ऊस वाढला आहे. त्यामुळे गाळपाचे दिवसही वाढणार आहेत. यंदा हंगाम एक ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे सरकारचे नियोजन होते, परंतु पावसाने अडचणी निर्माण केल्या. त्यामुळे हंगाम किमान महिनाभर लांबणीवर पडला आहे. अशा स्थितीत ऊसदरप्रश्नी जास्त ताणवून धरणे संघटनेला व शेतकऱ्यांनाही परवडणारे नव्हते. त्यामुळे एकरकमी एफआरपी मिळते म्हटल्यावर संघटनाही तयार झाली व संघटनेची ताकद दाखवण्यासाठी म्हणून १४ टक्क्यांचा मुद्दा रेटून धरला असून तोसुद्धा शेतकऱ्यांच्या हिताचाच आहे. त्यासाठी लढाई होत असेल तर ती आवश्यकच आहे.

प्रतिवर्षी स्वाभिमानी संघटनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करूनच ऊसदराचा तिढा सोडवण्याची बैठक होई. त्यामुळे कधीच एका बैठकीत तोडगा निघत नसे. परंतु, जे कायद्याने देणे बंधनकारक आहे, त्याचीच मागणी संघटना करत असल्याने कारखानदारही तातडीने त्यास तयार झाले. गेल्या हंगामातही असाच तोडगा निघाला होता. परंतु कारखानदार पुढच्या टप्प्यातील ऊसबिलांचे तुकडे करतात. यंदाही तो धोका आहेच. कारण सध्याचा बाजारातील साखरेचा दर ३१०० रुपये क्विंटल आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना ३ हजार रुपये द्यायचे कोठून हा यक्षप्रश्न आहेच. राज्यासह देशातही अतिरिक्त साखर पडून आहे. त्यामुळे बाजारात साखरेला उठाव नाही. साखरेचा दर सुधारला नाही तर कारखान्यांच्या अडचणी वाढणार आहेत. आताच अनेक कारखान्यांनी कामगारांचे पगार दिलेले नाहीत. शिल्लक साखरेच्या व्याजाच्या बोजाने कारखानदारी कासावीस झाली आहे. त्यामुळे एकरकमी बिल देताना त्यांच्यापुढेही अडचणी आहेतच. परंतु, त्यांनी ती द्यायची मान्य करून संघर्ष टाळला आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना