शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
4
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
5
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
6
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
7
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
8
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
9
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
10
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
11
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
12
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
13
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
14
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
15
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
16
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
17
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
18
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
19
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
20
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

'औरंगजेबाची कबर काढायला तुमची मुलं पाठवा, गरिबांची मुलं पाठवू नका', संजय राऊतांची अमित शाहांवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 20:34 IST

औरंगजेब कबरीच्या मुद्द्यावरुन खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आणि राज्य सरकारवर हल्ला चढवला. 

Sanjay Raut Amit Shah News: 'देशात एकता आणि अखंडता राखण्याचे, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम गृह मंत्रालयाचे आहे. ज्या शक्ती वारंवार औरंगजेबाचे नाव घेऊन देशात अस्थिरता निर्माण करतात. त्यांना रोखलं नाही, तर हा देश एक राहणार नाही', असे टीकास्त्र शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी डागले. राज्यसभेत बोलताना संजय राऊत म्हणाले, 'तुम्हाला औरंगजेबाची कबर काढायची तर फावडे घेऊन जा. तुमची मुलं पाठवा, गरिबाची मुलं पाठवू नका.'

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राज्यसभेत बोलताना राऊतांनी औरंगजेबच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले. ते म्हणाले. "गृह मंत्रालयावर आपण चर्चा करतोय आणि मी बघितलं की आपल्या बऱ्याच सदस्यांनी औरंगजेबावर चर्चा केली. काय दिवस आले आहेत, या वरिष्ठ सभागृहात औरंगजेबावर लोक चर्चा करत आहेत. आणि मला वाटतं की, याला जबाबदार आपले गृह मंत्रालय आहे." 

तर हा देश एक राहणार नाही, राऊतांचा इशारा

"देशाच्या गृह मंत्रालयाने जर वेळीच अशा ज्या शक्ती आहेत, ज्या वारंवार औरंगजेबाचे नाव घेऊन देशात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. त्यात काही लोक असे आहेत, जे महाराष्ट्रात मंत्री आहे. जे केंद्रात उच्चपदी आहेत. त्यांना जर आपण रोखलं नाही, तर हा देश एक राहणार नाही. देशात एकता आणि अखंडता ठेवण्याचे काम गृह मंत्रालयाचे आहे", असा इशारा राऊतांनी दिला.  

"मी बघतोय काही दिवसांपासून या राज्याला पोलिसी राज्य करून टाकलं आहे. त्यांचं काम काय आहे, तर विरोधकांना कमकुवत करणे. राजकीय पक्ष फोडणे, हे गृह मंत्रालयाचे काम आहे. प्रत्येक ठिकाणी. आमदार, खासदारांना खरेदी करण्यासाठी पोलिसांची मदत देणे. हे होत असेल, तर गृह मंत्रालयाचे जे मूळ काम आहे कायदा आणि सुव्यव्यस्ता राखण्याचे", असा टोलाही राऊतांनी शाह यांच्या मंत्रालयाला लगावला.  

आता महाराष्ट्रही पेटवला आहे -संजय राऊत

"कालपर्यंत मणिपूर जळत होता. पण, आता महाराष्ट्रही पेटवला आहे. 'नई लाशे बिछाने के लिए, आपने गड़े मुर्दे उखाड़े' ते पण औरंगजेबाच्या नावाने. तीनशे वर्षात नागपूरमध्ये कधी दंगल झाली नाही. नागपूरचा इतिहास आहे. नागपूरसारख्या शहरात दंगल होते आणि तेही मुख्यमंत्र्यांच्या शहरात", अशी टीका राऊतांनी केली.  

"मला हे सांगायचं आहे की, जर तुम्हाला औरंगजेबाची कबर तोडायची आहे, तर बिनधास्त तोडा. तुम्हाला कोणी रोखलंय? तुमचे सरकार आहे. केंद्रात आणि महाराष्ट्रात तुमचं सरकार आहे. गृह मंत्री तुमचे आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री तुमचे आहेत. फावडे घेऊन तिकडे जा आणि तोडा. पण, तुमच्या मुलांना पाठवा. आमच्या मुलांना पाठवू नका. तुमची मुले परदेशात शिक्षण घेत आहेत. परदेशात काम करताहेत. आणि गरीब मुलांना पाठवू नका", अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली. 

टॅग्स :Aurangzeb Tombऔरंगजेबाची कबरSanjay Rautसंजय राऊतAmit Shahअमित शाहnagpurनागपूर