शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

Coronavirus : 'कोरोना'वरून राजकारण करणाऱ्यांना Quarantine केलं पाहिजे, संजय राऊतांचा टोला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 18:35 IST

Coronavirus : 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने या कोरोनाशी युद्ध लढतात. सगळ्यांना सोबत घेऊन हे देशामध्ये कधी घडताना दिसले नाही.'

ठळक मुद्दे 'देवेंद्रजी तुम्हीच मुख्यमंत्री व्हा', 'अशा संकटकाळी तुम्हीच मुख्यमंत्री पाहिजे''कोरोनावरून राजकारण करणाऱ्यांना क्वारंटाईन केलं पाहिजे''राजकीय मतभेद विसरून काम करण्याची गरज आहे'

मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनावरून राजकारण करणाऱ्यांना क्वारंटाईन केलं पाहिजे, असे सांगत विरोधकांना टोला लगावला. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या आयटीची सेलकडून 'देवेंद्रजी तुम्हीच मुख्यमंत्री व्हा', 'अशा संकटकाळी तुम्हीच मुख्यमंत्री पाहिजे', असे ट्रोलिंग, ट्रेंड सुरु आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, "संकटाच्या काळात विरोधी पक्षाने सरकारच्या खांद्याला खांदा लागून काम केलं पाहिजे. एवढा शहाणपणा आमच्या विरोधीपक्षाकडे नसेल तर त्यांना राजकारणामध्ये विशेषता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करण्याचा अधिकार नाही. आज महाराष्ट्राने एक संग राहून, राजकीय मतभेद विसरून काम करण्याची गरज आहे." 

याचबरोबर, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने या कोरोनाशी युद्ध लढतात. सगळ्यांना सोबत घेऊन हे देशामध्ये कधी घडताना दिसले नाही. आम्ही स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य करतो. या लढाईमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा कोरोनाविषयीची लढाई सुरु केली आहे. अख्खा देश त्यांच्या पाठिशी आहे. आम्ही असे म्हणत नाही आहे, या राज्यातल्या भाजपाप्रमाणे", असे सांगत भाजपावर निशाणा साधला. 

याशिवाय, "आज नरेंद्रांची गरज नसून अमूक अमूक यांची आहे. देशाला नरेंद्रांचीच गरज आहे. कारण आम्ही देश म्हणून एक आहोत संकटाच्या काळात. मला असे वाटत, जे काही महाराष्ट्रातील लोक आहेत, करतायेत नसते उद्योग, त्यांना नरेंद्र मोदी यांनी एखादे शिबिर लावून विरोधी पक्षाने संकटकाळत कसे काम करावे, याचे चिंतन त्यांना दिले पाहिजे. सध्या त्यांना क्वारंटाईन करायला पाहिजे, त्यांना क्वारंटाईनची गरज आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका केली. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमाद्वारे शुक्रवारी जनतेशी संवाद साधला. यावेळी 'कोरोनाच्याविरोधात जागतिक युद्ध सुरू असून संपूर्ण जगाला घरात थांबण्याची वेळ आली आहे. पुढचे 15 दिवस काळजी घेण्याची गरज आहे' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच जीवनावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहेत. खास करून मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड, नागपूर या मोठ्या शहरांत सर्व कार्यालये, दुकाने बंद होतील. राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थितील 25 टक्क्यांवर आणली आहे. यापूर्वी ती 50 टक्क्यांवर आणली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा