शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : 'कोरोना'वरून राजकारण करणाऱ्यांना Quarantine केलं पाहिजे, संजय राऊतांचा टोला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 18:35 IST

Coronavirus : 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने या कोरोनाशी युद्ध लढतात. सगळ्यांना सोबत घेऊन हे देशामध्ये कधी घडताना दिसले नाही.'

ठळक मुद्दे 'देवेंद्रजी तुम्हीच मुख्यमंत्री व्हा', 'अशा संकटकाळी तुम्हीच मुख्यमंत्री पाहिजे''कोरोनावरून राजकारण करणाऱ्यांना क्वारंटाईन केलं पाहिजे''राजकीय मतभेद विसरून काम करण्याची गरज आहे'

मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनावरून राजकारण करणाऱ्यांना क्वारंटाईन केलं पाहिजे, असे सांगत विरोधकांना टोला लगावला. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या आयटीची सेलकडून 'देवेंद्रजी तुम्हीच मुख्यमंत्री व्हा', 'अशा संकटकाळी तुम्हीच मुख्यमंत्री पाहिजे', असे ट्रोलिंग, ट्रेंड सुरु आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, "संकटाच्या काळात विरोधी पक्षाने सरकारच्या खांद्याला खांदा लागून काम केलं पाहिजे. एवढा शहाणपणा आमच्या विरोधीपक्षाकडे नसेल तर त्यांना राजकारणामध्ये विशेषता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करण्याचा अधिकार नाही. आज महाराष्ट्राने एक संग राहून, राजकीय मतभेद विसरून काम करण्याची गरज आहे." 

याचबरोबर, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने या कोरोनाशी युद्ध लढतात. सगळ्यांना सोबत घेऊन हे देशामध्ये कधी घडताना दिसले नाही. आम्ही स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य करतो. या लढाईमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा कोरोनाविषयीची लढाई सुरु केली आहे. अख्खा देश त्यांच्या पाठिशी आहे. आम्ही असे म्हणत नाही आहे, या राज्यातल्या भाजपाप्रमाणे", असे सांगत भाजपावर निशाणा साधला. 

याशिवाय, "आज नरेंद्रांची गरज नसून अमूक अमूक यांची आहे. देशाला नरेंद्रांचीच गरज आहे. कारण आम्ही देश म्हणून एक आहोत संकटाच्या काळात. मला असे वाटत, जे काही महाराष्ट्रातील लोक आहेत, करतायेत नसते उद्योग, त्यांना नरेंद्र मोदी यांनी एखादे शिबिर लावून विरोधी पक्षाने संकटकाळत कसे काम करावे, याचे चिंतन त्यांना दिले पाहिजे. सध्या त्यांना क्वारंटाईन करायला पाहिजे, त्यांना क्वारंटाईनची गरज आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका केली. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमाद्वारे शुक्रवारी जनतेशी संवाद साधला. यावेळी 'कोरोनाच्याविरोधात जागतिक युद्ध सुरू असून संपूर्ण जगाला घरात थांबण्याची वेळ आली आहे. पुढचे 15 दिवस काळजी घेण्याची गरज आहे' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच जीवनावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहेत. खास करून मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड, नागपूर या मोठ्या शहरांत सर्व कार्यालये, दुकाने बंद होतील. राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थितील 25 टक्क्यांवर आणली आहे. यापूर्वी ती 50 टक्क्यांवर आणली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा