शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

मविआ नेत्यांची सुरक्षा काढली, मिलिंद नार्वेकरांची मात्र वाढविली; जितेंद्र आव्हाडांची सुरक्षा ‘जैसे थे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 09:16 IST

Milind Narvekar : जितेंद्र आव्हाड हे गेल्या सरकारमध्ये मंत्री होते, पण एमसीएच्या निवडणुकीत त्यांना आशिष शेलार यांची साथ मिळाली होती. आव्हाड यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.

मुंबई : राज्य सरकारने मविआच्या पक्षांमधील माजी मंत्री व नेत्यांची अतिरिक्त सुरक्षा काढली आहे. त्यात बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, नाना पटोले, जयंत पाटील आदींचा समावेश आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र वाढविण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात आमदार असले तरी गडचिरोलीत घर असलेले आणि या नक्षलग्रस्त जिल्ह्यात सातत्याने जाणारे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची वाय प्लस सुरक्षा काढण्यात आली. त्यांनी आपली सुरक्षा कायम ठेवावी असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते. मिलिंद नार्वेकर यांना आधी एक्स सुरक्षा होती, आता ती वाय प्लस करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड हे गेल्या सरकारमध्ये मंत्री होते, पण एमसीएच्या निवडणुकीत त्यांना आशिष शेलार यांची साथ मिळाली होती. आव्हाड यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.

ज्या लोकप्रतिनिधींची वाढीव सुरक्षा काढण्यात आली त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून देय असलेली सामान्य सुरक्षा तेवढी दिली जाईल. यापूर्वी बहुतेकांना वाय प्लस सुरक्षा होती. आम्हाला सुरक्षेची गरज नाही असे सरकारला वाटले असेल म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असावा, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. माझी सुरक्षा काढलेली असताना माझ्या घरावर हल्ला झाला, तरीही अद्याप मला सुरक्षा पुरविलेली नाही, असा आरोप माजी मंत्री भास्कर जाधव यांनी केला.

कोणत्या नेत्यांची सुरक्षा काढली?छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, नाना पटोले, जयंत पाटील, सतेज पाटील, संजय राऊत, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, भास्कर जाधव, नवाब मलिक, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, सुनील केदार, खासदार डेलकर परिवार, वरुण सरदेसाई.सध्या माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी ज्यांचा वाद रंगत आहे ते बडनेराचे आमदार रवि राणा यांना वाय प्लस सुरक्षा पुरविण्यात आली आहे.

टॅग्स :Milind Narvekarमिलिंद नार्वेकरJitendra Awhadजितेंद्र आव्हाड