शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं; 'असा' आहे संभाव्य फॉर्म्युला, सपा-शेकापला किती जागा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 13:13 IST

लोकसभेत महाराष्ट्रात काँग्रेसनं सर्वाधिक १३ जागा जिंकल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. 

मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीची कुठल्याही क्षणी घोषणा होऊ शकते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढाई पाहायला मिळणार आहे. त्यात दोन्ही आघाड्यांमधील जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप समोर आला नाही. महाविकास आघाडीत जवळपास ८० टक्के जागावाटप निश्चित झालं असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीत कोण किती जागा लढवणार याबाबत आकडे समोर आले आहेत. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते पत्रकार परिषद घेत जागावाटपाबाबत अधिकृत घोषणा करतील.

दिल्लीतील सूत्रांच्या हवाल्याने महाविकास आघाडीतील जागावाटप पूर्ण झालं असून विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवरून पेच आहेत. लवकरच ते सोडवले जातील असं सांगण्यात येते. महाविकास आघाडीत काँग्रेस ११९, शिवसेना ठाकरे गट ८६ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ७५ जागा, शेकाप ३, समाजवादी पक्ष २ आणि माकप २ जागा दिल्या जातील. जागावाटपाचा हा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. एबीपी माझानं दिल्लीतील काँग्रेसच्या उच्चपदस्थ वर्तुळातील सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी देण्यात आली आहे.

आतापर्यंत २२२ जागांवर एकमत झालं असून त्यात मुंबईतल्या १३ जागा ठाकरे गटाला, ८ जागा काँग्रेस, १ समाजवादी पार्टीला देण्याबाबत सहमती झाली आहे. अद्याप मुंबईतल्या ४ जागांवर तिन्ही प्रमुख पक्षात रस्सीखेच आहे. त्यात संभाव्य जागांमध्ये उमेदवारांची अदलाबदली होण्याची शक्यता आहे. भाजपाविरोधात एकत्रित निवडणुकीला सामोरे जायचे यावर तिन्ही पक्षांचं एकमत आहे. अनेक मुस्लीम बहुल जागांवर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. 

हरयाणातील निकालानंतर काँग्रेस सावध

हरयाणात काँग्रेसची सत्ता येणार असा सर्वच विरोधक दावा करत होते, मात्र प्रत्यक्षात भाजपाने याठिकाणी सलग तिसऱ्यांदा सत्तास्थापन केली. त्यानंतर मित्रपक्षांनी काँग्रेसच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उभे केले. हरयाणा निकालानंतर आता काँग्रेस नेतृत्वाने सावध भूमिका घेत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक घेत रणनीती आखली आहे. त्यात जागावाटपावरून वाद टाळा, मुख्यमंत्रि‍पदावरून पक्षात गटबाजी नको. मविआतील वादग्रस्त मुद्द्यावर चर्चा नको अशा सूचना नेत्यांना हायकमांडने दिल्या आहेत. लोकसभेत महाराष्ट्रात काँग्रेसनं सर्वाधिक १३ जागा जिंकल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४