शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
2
भाजपा नेते गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
3
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
4
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
5
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
6
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
7
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
8
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
9
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
10
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
12
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
13
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
14
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
15
VIDEO: प्रभासच्या चाहत्यांचा थिएटरमध्ये धुडगूस; ‘द राजा साब’च्या स्क्रीनिंगदरम्यान आणल्या मगरी
16
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात 8 वेळा चर्चा', अमेरिकन मंत्र्याचा 'तो' दावा भारताने फेटाळला...
17
"Bombay is not Maharashtra City..."; भाजपा नेत्याच्या विधानानं नवा वाद; उद्धवसेनेने सुनावले
18
महिला सक्षमीकरणाचे नवे मॉडेल! सोमनाथ मंदिरामुळे शेकडो महिलांना मिळाली रोजगाराची सुवर्णसंधी
19
Gautami Kapoor : राम कपूरकडे नव्हतं काम, पत्नी गौतमीने सांभाळलं घर; सांगितला लग्नानंतरचा अत्यंत कठीण काळ
20
२८ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; १ फेब्रुवारीला बजेट; सामान्यांची 'अच्छे दिन'ची प्रतीक्षा संपणार?
Daily Top 2Weekly Top 5

समुद्र खवळला, सतर्कतेच्या सूचना; डोळ्यांत पाणी! मराठवाड्यात सर्वदूर पाऊस, ५३ पशू ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 14:17 IST

इसापूरचे १३, तर सिद्धेश्वरचे १२ दरवाजे उघडले; धाराशिवमध्ये १५ हजार हेक्टर पिके पाण्यात; पिके आधी पाण्यासाठी तहानली, नंतर पुरामुळे आडवी झाली... सोयाबीन, कपाशी, ज्वारीची शिवारं खरडून निघाली...

लोकमत न्यूज नेटवर्क, हिंगोली: मराठवाड्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, अनेक जिल्ह्यांत नदी, नाल्यांना पूर आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील इसापूर धरणाची पाणी पातळी वाढल्याने धरणाचे १३ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे पैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे कळमनुरी-शेंबाळ पिंपरी या विदर्भाला जोडणाऱ्या रस्त्यावर वाहतूक १६ ऑगस्टपासून बंद आहे. सिद्धेश्वर धरणही शंभर टक्के भरले आहे. रविवारी सकाळी या धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले.

लातूर, परभणी जिल्ह्यात धरणे भरली : लातूर जिल्ह्यातील धनेगाव पाणलोट क्षेत्रात दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातील जलसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

दोन दिवसांतील अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबीन पाण्यात

धाराशिव/परभणी : धाराशिव जिल्ह्यात १४ व १५ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक अहवालानुसार, १५ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात गेली असून, ५३ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील १०८ गावे पावसाने प्रभावित झाली. ६४ कच्च्या घरांची पडझड झाली. परभणी जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चार महसूल मंडलांत रविवारी अतिवृष्टी झाली. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील ८८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन व कापूस पिकांना फटका बसला आहे.

‘ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या’

मुंबई : राज्यात तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. राज्य सरकारने तातडीने पंचनामे न करता मदत जाहीर करावी, तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली. पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजविला. कोकणात धान, मराठवाडा, विदर्भात सोयाबीन, कपाशी, ज्वारी, धान अशा पिकांना फटका बसला. शेतकरी कधी नव्हे इतका अडचणीत आला आहे. त्यामुळे सरकारने जागे व्हावे आणि शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी. तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

पुढचे ३ दिवस तुमच्या जिल्ह्यात कोणता इशारा? सर्वदूर कहर! पूर्णा, जगबुडी, पंचगंगेला पूर

अकोला: अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये दोन दिवस संततधार पाऊस झाला. त्यामुळे हजारो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले. अकोला जिल्ह्यातील नऊ महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. पूर्णा, काटेपूर्णा, उमा, पठार, गौतमा या नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे नदी आणि नाल्याकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे.

जगबुडीने ओलांडली धोक्याची पातळी: कोल्हापूरमधील पंचगंगा नदीची पाणी पातळी दिवसभरात दोन फुटांनी वाढली असून, १६ बंधारे पाण्याखाली गेले. रत्नागिरीत पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे. रविवारी दुपारी खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली.

जळगाव जिल्ह्यात ८७ घरांमध्ये शिरले पुराचे पाणी

जळगाव: जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. पारोळा तालुक्यात ८७ घरे, ३० गोठे आणि ६० दुकानांत पाणी शिरल्याने नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवली असली तरी जायकवाडीकडे ४२ टीएमसीपेक्षा जास्त पाणी सोडण्यात आले.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊस