शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

शालेय पाठ्यपुस्तकाचा होणार यंदा पुनर्वापर; कोट्यवधीचा महसूल वाचवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 02:53 IST

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने परिपत्रक काढून जिल्हा परिषद व महापालिकेच्या शिक्षण विभागाला तसे निर्देश दिले आहेत.

नागपूर : समग्र शिक्षा अभियानातून दरवर्षी वर्ग पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके देण्यात येतात. एकदा पुस्तके दिल्यानंतर दुसऱ्या वर्षी त्याचा वापर होत नाही. त्यामुळे यावर्षीपासून शासनाने पाठ्यपुस्तकाचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या विद्यार्थ्यांची चांगल्या अवस्थेतील पाठ्यपुस्तके पुढील सत्रातील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. त्यामुळे शासनाचा पुस्तकाच्या निर्मितीवर होणाऱ्या खर्चाला लगाम बसणार आहे.

यासंदर्भात शासनाने शिक्षण विभागाला निर्देश दिले असून, पाठ्यपुस्तकातून पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी पुस्तकाचा पुनर्वापर करण्यात येत असल्याचा दाखला दिला जात आहे. मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यावर राज्य शासन दरवर्षी २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करते. काही विद्यार्थी पाठ्यपुस्तके सुस्थितीत ठेवतात. नागपूर जिल्ह्यातील १५३५ शाळांना जून २०२० मध्ये ५ लाख ७१ हजार पाठ्यपुस्तकाचे वितरण केले होते. अद्यापही शाळा उघडल्या नाहीत. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी तर पाठ्यपुस्तके उघडूनही बघितलेली नाहीत. अशा विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके पुढच्या सत्रात शाळा परत घेणार आहे. चांगल्या अवस्थेत असलेली पुस्तके नवीन सत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने परिपत्रक काढून जिल्हा परिषद व महापालिकेच्या शिक्षण विभागाला तसे निर्देश दिले आहेत. पालकांना व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून पाठ्यपुस्तके जमा करण्याचे आवाहन केले जाणार आहे.यादरम्यान पालक व विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्वही पटवून सांगितले जाईल. मात्र, पुस्तके जमा करण्यासाठी सक्ती करू नये, असेही परिषदेने शिक्षण विभागाला सुचविले आहे.ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी तर पाठ्यपुस्तके उघडूनही बघितलेली नाहीत. 

टॅग्स :Schoolशाळा