शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

School Reopen: ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; “१ मे ते १३ जून विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी जाहीर तर...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 18:00 IST

Coronavirus in Maharashtra: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळ्याची आणि दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालयानामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती केली जाते.

ठळक मुद्देशनिवार १ मे पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात आली असून तिचा कालावधी १३ जून २०२१ पर्यंत आहेशैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घ्यावी.शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ला शाळा सुरू करण्याबाबत कोविड १९ची तत्कालीन परिस्थिती पाहून शासन निर्णय घेईल

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावर परिणाम झाला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शाळा, कॉलेज सुरु करण्यावर बंदी आहे. त्यामुळे शाळा कधी सुरु होणार असा प्रश्न सर्व पालकांना पडला आहे. यात संभ्रम दूर करण्यासाठी शिक्षण विभागाने सर्व शिक्षण संचालकांना पत्र पाठवून याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना १ मे पासून १३ जूनपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

या पत्रात म्हटलंय की, राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळ्याची आणि दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालयानामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती केली जाते. त्यानुसार शनिवार १ मे पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात आली असून तिचा कालावधी १३ जून २०२१ पर्यंत आहे. तर २०२१-२२ च्या शाळा सोमवारी १४ जून २०२१ पासून सुरू करण्यात याव्यात. तर विदर्भातील तापमान लक्षात घेता तेथील शाळा २८ जून पासून सुरू होतील.

त्याचसोबत शाळांतून उन्हाळ्याची आणि दिवाळीची दिर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव, नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी समायोजन करण्यात यावे. माध्यमिक शाळा संहिता नियमानुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घ्यावी. सध्या राज्यात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून सर्व महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील सरकारी आणि खासगी प्राथमिक माध्यमिक शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ला शाळा सुरू करण्याबाबत कोविड १९ची तत्कालीन परिस्थिती पाहून शासन निर्णय घेईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

राज्यातील गुरुवारी दिवसभरात ६६,१५९ रुग्ण, तर ७७१ मृत्यू

राज्यात दैनंदिन रुग्ण आणि मृत्यू वाढीचा आलेख कायम असून गुरुवारी दिवसभरात ६६ हजार १५९ रुग्णांचे निदान झाले असून ७७१ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. तर रुग्ण निदानाच्या तुलनेत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक आहे. दिवसभरात ६८ हजार ५३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ३७ लाख ९९ हजार २६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ६ लाख ७० हजार ३०१ रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.६९ टक्के असून मृत्यूदर १.५ टक्क्यांवर स्थिरावला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ६८ लाख १६ हजार ७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.९३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.. राज्यात एकूण ४५ लाख ३९ हजार ५५३ कोरोनाबाधित असून आतापर्यंत ६७ हजार ९८५ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEducationशिक्षण