शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

नगरविकासाला आर्थिक समस्येचा फास

By admin | Updated: March 14, 2015 05:06 IST

राज्यातील नगरपरिषदांची आर्थिक स्थिती हा सार्वत्रिक चिंतेचा विषय आहे़ राज्यात बोटावर मोजण्या एवढ्याच नगरपरिषदा आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत़

प्रमोद आहेर, शिर्डीराज्यातील नगरपरिषदांची आर्थिक स्थिती हा सार्वत्रिक चिंतेचा विषय आहे़ राज्यात बोटावर मोजण्या एवढ्याच नगरपरिषदा आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत़ अनेक नगरपरिषदांमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्नही बिकट आहे़ शासनाने २००५ नंतर जकात अनुदान बंद करून सुरू केलेले सहाय्यक अनुदानही पुरेसे नसल्याने त्याचा फेरआढावा गरजेचा आहे़वसुली ही राज्यातील नगरपरिषदांची मोठी समस्या आहे़ त्यात विदर्भ व मराठवाड्यामध्ये तर वसुली डोकेदुखी बनली आहे़ सर्वच नगरपरिषदांच्या पाणीपुरवठा योजनांचा विद्युत आकार हा औद्योगिक दराने आकारला जातो़ त्या ऐवजी तो विद्युत मोटारींच्या क्षमतेवर अवलंबून असावा, असे या क्षेत्रातील जाणकारांना वाटते़ पथदिव्यांची वीज थकबाकी हाही सार्वत्रिक प्रश्न आहे़ वित्त आयोगाच्या स्थानिक स्वराज्य संस्था निधीत नुकतीच अकरा टक्के झालेली घसघशीत वाढ ही समाधानाची बाब असली तरी नगरपरिषदांना केवळ या ‘टॉनिक’वर अवलंबून राहाता येणार नाही़सर्वांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम होण्यासाठी सक्षम प्रशासन हीच पूर्वावश्यकता आहे़ त्याचे भान ठेवून त्यांचे सबलीकरण व नगर प्रशासनाची ग्राम प्रशासनाप्रमाणे स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी लागेल़ यातच नागरीकरणाच्या यशाचे गुपित दडलेले आहे़