शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

सतीश शेट्टींच्या पाठपुराव्याला अखेर यश, आयआरबीवरील दोषारोप; वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह एकूण १८ जणांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 5:25 AM

मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’लगतची सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी ‘आयआरबी’ या टोल कंपनीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह १८ जणांविरोधात सीबीआयने पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्याने आठ वर्षांनी सतीश शेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’लगतची सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी ‘आयआरबी’ या टोल कंपनीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह १८ जणांविरोधात सीबीआयने पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्याने आठ वर्षांनी सतीश शेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.सीबीआयने दोषारोपपत्र दाखल केल्याने शेट्टी यांच्या खुनाच्या तपासालाही गती मिळावी, अशी मागणी होत आहे. सतीश शेट्टी यांचे बंधू संदीप शेट्टी यांनी सांगितले की, सतीश यांच्या खुनामागील उद्देश माहिती करून घेण्यासाठी सीबीआयने उच्च न्यायालयात जाऊन लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या जमीन अपहार प्रकरणातील गुन्ह्याचा तपास स्वत:कडे घेतला होता़या गुन्ह्यात पुरावा असून दोषारोपपत्र दाखल करण्याइतका पुरावा असल्याचे व त्याच्या तपासातून हत्येचा उद्देश पुढे येण्याची शक्यता असल्याचे त्या वेळी न्यायालयात सांगितले होते़उच्च न्यायालयाने ८ आॅगस्ट २०१४ रोजी आदेश देऊन या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे सोपविला होता़ पण त्यानंतर तीनच दिवसांत सीबीआयने खुनाच्या गुन्ह्याचा तपास बंद करण्यासाठी बी समरी फाइल केली़ त्यानंतर आपण सातत्याने पाठपुरावा करीत असल्याने आणि पुन्हा न्यायालयात जाऊ असे वाटल्याने सीबीआयने दोषारोपपत्र दाखल केले असावे असे दिसते.वीरेंद्र म्हैसकर आणि इतरांनी सरकारी अधिकाºयांना हाताशी धरून बनावट कागदपत्रांच्या आधारे लोणावळ्याजवळील पिंपळोली गावातील सरकारी मारकीची ७३.८८ हेक्टर जमीन हडपल्याची तक्रार सतीश शेट्टींनी केली होती.दोषारोपपत्रातील कलमे मवाळ?सीबीआयच्या दोषारोपपत्रातील कलमे मवाळ वाटत आहेत. त्यात ४२० व ५११ कलमे आहेत. कलम ५११ त्यांना वाचविण्यासाठी असल्याचे दिसते़ गुन्ह्याचा प्रयत्न केल्याचे हे कलम आहे़ दोषारोपपत्र वाचल्यानंतरच स्पष्टपणे बोलता येईल़- संदीप शेट्टी, सतीश शेट्टी यांचे भाऊम्हैसकर यांच्याविरुद्ध १५ आॅक्टोबर २००९ रोजी गुन्हाहीदाखल झाला होता. १० जानेवारीला सतीश शेट्टींची हत्या झाली. त्यानंतर या दोन्हीही प्रकरणांचा तपास न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयकडे सोपविण्यात आला.शेट्टी हत्येच्या तपासातही गैरप्रकार झाल्याचे आरोप संदीप शेट्टीयांनी केले होते. अगोदर एका वकिलाला अटक केली होती. पोलीस अधिकाºयांनी तपासात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्याचा आरोपही संदीप शेट्टी करत होते. पोलिसांवर दबाव असल्याने त्यांना याचा तपास करता आला नाही़ जनआक्रोश आणि संदीप शेट्टी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सतीश शेट्टी हत्येचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला़

टॅग्स :Courtन्यायालयCrimeगुन्हा