शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

ज्ञानेश्वर माऊलींचे संजीवन समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद; देहूतील विठ्ठल मंदिर देखील बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 17:54 IST

माऊलींचे संजीवन समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याची इतिहासातील पहिलीच वेळ

ठळक मुद्देमाऊली व देहूताील मंदिरातील नित्य उपचार व महापूजा परंपरेप्रमाणे करण्यात येणार माऊली व देहूतील मंदिरातील नित्य उपचार व महापूजा परंपरेप्रमाणे सुरु राहणार येत्या शुक्रवारी (दि.२०) पापमोचनी भागवत एकादशी; दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन

आळंदी : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील प्रमुख देवस्थान असलेल्या तीर्थक्षेत्र आळंदीतील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान देवस्थानने ३१ मार्चपर्यंत संपूर्ण माऊलींचे संजीवन समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच देहूृतील विठ्ठल मंदिर देखील २३ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय संत तुकाराम महाराज देवस्थानने घेतला आहे. विशेष म्हणजे माऊलींचे मंदिर बंद ठेवण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. या काळात माऊली व देहूतील मंदिरातील नित्य उपचार व महापूजा परंपरेप्रमाणे करण्यात येणार आहे.         राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १३ मार्च २०२० पासून लागू करून अधिसूचना जारी केली आहे. तसेच पुणे जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे.या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.१७) ज्ञानेश्वर महाराज संस्थांन कमिटीच्या प्रमुख विश्वस्तांची विशेष बैठक पार पडली. याप्रसंगी प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, विश्वस्त अजित कुलकर्णी, विश्वस्त डॉ. अभय टिळक, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी उपस्थित होते. भाविकांच्या तसेच वारक?्यांच्या आरोग्य संबंधी खबरदारीचा उपाय म्हणून देवस्थानच्या वतीने प्रमुख विश्वस्थ अ‍ॅड. विकास ढगे पाटील यांनी ३१ मार्च पर्यंत मंदिर व परिसर भाविकांसाठी बंद ठेवण्याची तारीख जाहिर केली. तर शासन निर्णय आल्यानंतरच भाविकांच्या देवदर्शनासाठी मंदिर व परिसर पुन्हा खुले केला जाईल असे जाहीर केले. 

देहूतील विठ्ठल मंदिर देखील दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय... 

देहूगाव- कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यासह देशभरात उद्भवलेल्या आपतकालीन परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने दि.17 मार्च ते 23 मार्च या पुढील सहा दिवसांसाठी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे.पुढील 31 मार्च पर्यंतचे संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेले सर्व धार्मिक कार्यक्रमही रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय संस्थानच्या विश्वस्त मंडळाने घेतला असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांनी दिली. यावेळी संस्थानचे विश्वस्त विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे, काशिनाथ महाराज मोरे आदी उपस्थित होते.आज (मंगळवार) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संस्थानच्या विश्वस्त मंडळाने कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता त्याला अटकाव घालण्यासाठी राज्यातील संस्थानांनी मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी बंद करावीत असे राज्यशासनाने अवाहन केले होते, या अवाहनाला प्रतिसात देत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानने दि. 17 मार्च ते 23 मार्च या सहा दिवसांच्या कालावधीत मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहेत. मात्र सदर कालावधीत मंदिरातील नित्यपूजा सुरू राहणार आहेत.पिंपरी चिंचवड शहरात कोरोना चा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे उपाययोजना करण्यात आल्या आहेत. देहूतील मंदिरात नित्य पुजा फक्त होतील. कोरोना वायरसचा प्रभाव लक्षात घेता हा निर्णय घेत आहे, असे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र देहूच्या अध्यक्षांनी कळविले आहे. 

         येत्या शुक्रवारी (दि.२०) पापमोचनी भागवत एकादशी आहे; मात्र या दिवशी भाविकांनी संस्थांनच्या निर्णयाची अंमलबजावणी करत दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन आळंदी व देहू संस्थांनच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे.                 

गजानन महाराज मंदिरही बंद... कोरोनो व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील श्री गजानन महाराज मंदिरही ३१ मार्चपर्यंत भाविकांच्या देवदर्शनासाठी बंद करण्यात आहे. या काळात 'श्री'चे दैनंदिन महापूजा व इतर धार्मिक विधी संस्थांनच्या वतीने घेण्यात येईल अशी माहिती संबंधितांनी दिली.

टॅग्स :Alandiआळंदीdehuदेहूsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरsant tukaramसंत तुकारामCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस