शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

"आंदोलन दडपण्यासाठी बारसूवासियांवर गोळ्या झाडल्या जाऊ शकतात", संजय राऊत यांचा सनसनाटी दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 11:02 IST

Anti-Refinery Movement In Barsu: बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा आंदोलन पेटले आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या आंदोलनावरून सनसनाटी दावा केला आहे.

बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा आंदोलन पेटले आहे. रिफायनरी प्रकल्पासाठी येथील जमिनीचे सर्वेक्षण करण्यात येत असून, त्याविरोधात हजारो ग्रामस्थ बारसूमधील सड्यावर जमले आहेत. तसेच त्यांच्याकडून पोलीस आणि अधिकाऱ्यांची वाट अडवण्यात येत आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या आंदोलनावरून सनसनाटी दावा केला आहे. बारसूमधील रहिवाशांना धमक्या दिल्या जात आहेत. तसेच हे आंदोलक तिथून हटले नाहीत तर त्यांच्यावर गोळ्यासुद्धा झाडल्या जातील आणि जालियनवाला हत्याकांडाप्रमाणे बारसूमध्येही हत्याकांड घडवलं जाईल, अशी मला भीती वाटतेय, असा दावा राऊत यांनी केला आहे. 

या प्रकरणी प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. कालपासून सुमारे ५ ते सहा हजार लोक बारसूच्या माळरानावर जमले आहेत. आम्ही मरू गोळ्या खाऊ पण मागे हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे पोलिसांना हाताशी धरून बारसूमधील रहिवाशांवर ज्याप्रकारे खारघरमध्ये सदोष मनुष्यवध केला, त्या प्रमाणे गोळ्या चालवू, अशा धमक्या दिल्या जात आहेत. आज पाच हे सहा हजार कुटुंबं विरोध करण्यासाठी माळरानावर जमलेली आहेत. अनेक कुटुंब परागंदा झाली आहेत. अनेक कुटुंबांना पोलीस ठाण्यात बोलावून २४ तास बसवून ठेवून धमक्या दिल्या जात आहेत. बारसूमधील हजारो ग्रामस्थांना तडीपारीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. इतकंच नव्हे तर जे बारसूचे रहिवासी मुंबईत राहत आहेत आणि ज्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे त्यांच्या मुंबईतील घरांवर लाथा मारून पोलीस घरात घुसताहेत. त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. मुंबईतील बारसूवासियांना अटक केली जातेय, असा आरोप संजय राऊत यांनी केला. 

यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर बोचरी टीका केली. ते म्हणाले,  हे अत्यंत विकृत मनोवृत्तीचं सरकार आहे. हे दहशतवादी मनोवृत्तीचं सरकार आहे. मला असं वाटतं की, बारसूमधील हे लोक तिथून हटले नाही, तर त्यांच्यावर गोळ्यासुद्धा झाडल्या जातील आणि जालियनवाला हत्याकांडाप्रमाणे बारसूमध्येही हत्याकांड घडवलं जाईल, अशी मला भीती वाटतेय. उद्धव ठाकरे या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. कदाचित मुंबईला तिथे लक्ष घालावं लागेल आणि आम्हाला तिथे जावं लागेल. आम्ही जनतेसोबत आहोत. जनतेने विरोध केलेला आहे. जनता छातीवर गोळ्या झेलण्यास तयार आहे. जनता तुरुंगात जायला तयार आहे, अशावेळी शिवसेना ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. 

शशिकांत वारिसे यांचा मृत्यू झाला. हा मृत्यूनसून हत्या होती. आता तिथे सामुहिक हत्याकांड होऊ शकतं. कारण त्या भागामध्ये महाराष्ट्राबाहेरच्या अनेक परप्रांतियांनी जमिनी घेतल्या आहेत. त्या जमिनीचं मोल कमी होऊ नये म्हणून, त्यांची गुंतवणूक अडचणीत येऊ नये म्हणून धाकदपटशाही करून रिफायनरी करावी हे सरकारचं धोरण आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.    

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRatnagiriरत्नागिरीPoliticsराजकारण