शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"भाजप तुमचा पक्ष शिल्लक ठेवतो का हे..."; संजय राऊतांचे गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 11:01 IST

उद्धव ठाकरेंचे आमदार साथ सोडतील म्हणणाऱ्या गुलाबराव पाटलांना संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Sanjay Raut on Gulabrao Patil : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय होऊनही, सरकार स्थापनेबाबत तिन्ही पक्षांमध्ये गोंधळ अद्याप कायम आहे. महायुतीत भारतीय जनता पक्ष (भाजप), एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची यांचा समावेश आहे. शिवसेनेने एकसंध राहून त्यांच्यासोबत निवडणूक लढवली असती तर महायुतीला मोठा विजय मिळाला असता, असेही भाजप नेते सांगत आहेत. तर दुसरीकडे शिंद गटाच्या नेत्यांनी शिवसेना फुटल्याचा ठपका संजय राऊत यांच्यावर ठेवला आहे. तसेच माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे १० आमदार आमच्याकडे येण्याच्या तयारीत असल्याचे म्हटलं आहे.

शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा भाग नसता तर विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला ९०-१०० जागा जिंकता आल्या असत्या असं म्हटलं. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला होता. शिवसेना फुटल्याचा ठपका त्यांनी संजय राऊत यांच्यावर ठेवला. तसेच १० आमदार आमच्याकडे येण्याच्या तयारीत असल्याचेही ते म्हणाले. गुलाबराव पाटलांनी केलेल्या दाव्यावर संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.

"गुलाबराब पाटील तुम्ही थोडे दिवस थांबा तुमचा पक्ष शिल्लक राहतो का आणि भाजप तो शिल्लक ठेवतो का हे तुम्हाला कळेल. आता आमच्याकडे जे राहिलेले आहेत ते निष्ठावंत आहेत. तुमच्यासारखा पालापाचोळा उडून गेला आहे. ईडी, सीबीआयने फुंकर मारताच तुमच्यासारखे लोक उडून गेले. आता आमचा निष्ठावतांचा मेळा उरला आहे," असं संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदेंप्रमाणे उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्रीपदाबाबत लवचीकता दाखवायला हवी होती का असा सवाल माध्यमांनी विचारला. "तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं. त्यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे. तेव्हा जर ते मूळ शिवसेनेला दिलं असतं तर आज ही वेळ आली नसती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना जो भाजप पक्ष मुख्यमंत्रीपद देऊ शकतो तो उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला द्यायला तयार नव्हता. कारण त्यांना मूळ शिवसेना नष्ट करुन या राज्यामध्ये डुप्लिकेट शिवसेना उभी करायची होती," असं संजय राऊतांनी म्हटलं.  

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

“त्यांच्या (उद्धव ठाकरे) महालामध्ये आमच्या सारख्यांची देखील एक वीट आहे. मात्र, त्या विटांना विसरले म्हणून संजय राऊत यांच्यासारखा एक दगड घेऊन आले आणि त्या दगडाने त्यांच्या महालाचा पूर्ण सत्यानाश करून टाकला. ते जळगाव जिल्ह्यात येऊन आमच्या पाच जागा पाडणार होते. दोन-दोन दिवस जिल्ह्यात येऊन बसले, पण साधा एक उमेदवार ते वाचू शकले नाहीत. त्यामुळे संजय राऊतांना आतातरी हे ओळखावं आणि उद्धव ठाकरे यांनीही संजय राऊतांना ओळखावं. अन्यथा जे २० आमदार आहेत ना? त्यातील १० आमदार आमच्याकडे येण्याच्या तयारीत आहेत. आगे-आगे देखिए होता है क्या”, असं गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sanjay Rautसंजय राऊतGulabrao Patilगुलाबराव पाटील