शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

"भाजप तुमचा पक्ष शिल्लक ठेवतो का हे..."; संजय राऊतांचे गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 11:01 IST

उद्धव ठाकरेंचे आमदार साथ सोडतील म्हणणाऱ्या गुलाबराव पाटलांना संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Sanjay Raut on Gulabrao Patil : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय होऊनही, सरकार स्थापनेबाबत तिन्ही पक्षांमध्ये गोंधळ अद्याप कायम आहे. महायुतीत भारतीय जनता पक्ष (भाजप), एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची यांचा समावेश आहे. शिवसेनेने एकसंध राहून त्यांच्यासोबत निवडणूक लढवली असती तर महायुतीला मोठा विजय मिळाला असता, असेही भाजप नेते सांगत आहेत. तर दुसरीकडे शिंद गटाच्या नेत्यांनी शिवसेना फुटल्याचा ठपका संजय राऊत यांच्यावर ठेवला आहे. तसेच माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे १० आमदार आमच्याकडे येण्याच्या तयारीत असल्याचे म्हटलं आहे.

शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा भाग नसता तर विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला ९०-१०० जागा जिंकता आल्या असत्या असं म्हटलं. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला होता. शिवसेना फुटल्याचा ठपका त्यांनी संजय राऊत यांच्यावर ठेवला. तसेच १० आमदार आमच्याकडे येण्याच्या तयारीत असल्याचेही ते म्हणाले. गुलाबराव पाटलांनी केलेल्या दाव्यावर संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.

"गुलाबराब पाटील तुम्ही थोडे दिवस थांबा तुमचा पक्ष शिल्लक राहतो का आणि भाजप तो शिल्लक ठेवतो का हे तुम्हाला कळेल. आता आमच्याकडे जे राहिलेले आहेत ते निष्ठावंत आहेत. तुमच्यासारखा पालापाचोळा उडून गेला आहे. ईडी, सीबीआयने फुंकर मारताच तुमच्यासारखे लोक उडून गेले. आता आमचा निष्ठावतांचा मेळा उरला आहे," असं संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदेंप्रमाणे उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्रीपदाबाबत लवचीकता दाखवायला हवी होती का असा सवाल माध्यमांनी विचारला. "तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं. त्यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे. तेव्हा जर ते मूळ शिवसेनेला दिलं असतं तर आज ही वेळ आली नसती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना जो भाजप पक्ष मुख्यमंत्रीपद देऊ शकतो तो उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला द्यायला तयार नव्हता. कारण त्यांना मूळ शिवसेना नष्ट करुन या राज्यामध्ये डुप्लिकेट शिवसेना उभी करायची होती," असं संजय राऊतांनी म्हटलं.  

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

“त्यांच्या (उद्धव ठाकरे) महालामध्ये आमच्या सारख्यांची देखील एक वीट आहे. मात्र, त्या विटांना विसरले म्हणून संजय राऊत यांच्यासारखा एक दगड घेऊन आले आणि त्या दगडाने त्यांच्या महालाचा पूर्ण सत्यानाश करून टाकला. ते जळगाव जिल्ह्यात येऊन आमच्या पाच जागा पाडणार होते. दोन-दोन दिवस जिल्ह्यात येऊन बसले, पण साधा एक उमेदवार ते वाचू शकले नाहीत. त्यामुळे संजय राऊतांना आतातरी हे ओळखावं आणि उद्धव ठाकरे यांनीही संजय राऊतांना ओळखावं. अन्यथा जे २० आमदार आहेत ना? त्यातील १० आमदार आमच्याकडे येण्याच्या तयारीत आहेत. आगे-आगे देखिए होता है क्या”, असं गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sanjay Rautसंजय राऊतGulabrao Patilगुलाबराव पाटील