शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
4
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
5
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
6
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
8
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
10
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
11
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
12
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
13
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
14
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
15
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
16
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
17
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
18
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
19
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
20
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी

“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 15:35 IST

Sanjay Raut News: “भारत-पाकिस्तान सामना खेळला गेला, हा आपल्या सैन्याचा, शहीदांचा आणि महिलांचा अपमान आहे.’’

Sanjay Raut on IND-PAK Asia Cup 2025: दुबईत खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरुन भारतात राजकीय वादळ उठले आहे. सामान्य नागरिकांसह अनेक नेत्यांनी सामना रद्द करण्याची मागणी केली होती. अशातच आता, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या सामन्याबाबत एक मोठा दावा केला आहे. हा सामना पूर्णपणे फिक्स होता आणि यातून पाकिस्तानला 50,000 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचे राऊतांचे म्हणने आहे.

निर्लज्ज सरकार...

शिवसेना (उबाठा)चे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (15 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, “भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना होणे ही सरकारची निर्लज्जता आहे. दुबई, अबूधाबी किंवा कुठल्याही मैदानावर सामना झाला असो...भारत-पाकिस्तान सामना खेळला गेला, हा आपल्या शूर सैनिकांचा, शहीदांचा आणि महिलांचा अपमान आहे. सामना खेळून सिंदूर परत येणार आहे का?’’ असा सवाल त्यांनी यावेळी केला.

पाकिस्तानला 50 हजार कोटी रुपये मिळाले

राऊत पुढे म्हणतात, “हा सामना फिक्स होता.  पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला 1000 कोटी मिळाले. सामन्यावर दीड लाख कोटी रुपयांचा सट्टा लागला होता, त्यातील 50 हजार कोटी पाकिस्तानात गेले. एकीकडे केंद्र सरकार आयएमएफ आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेला सांगते की, पाकिस्तानला कर्ज देऊ नका, ते पैसे दहशतवादी कारवायांमध्ये वापरले जातील. पण काल भारताच्या मदतीने पाकिस्तानला मिळालेल्या पैशांचे काय? अमित शाह यांचा मुलगा जय शाह यांनी पाकिस्तानला हे पैसे दिले. हे पैसे दहशतवादासाठीच वापरले जाणार आहेत. पाकिस्तानला त्यांच्या दहशतवादाला 'बळकट' करण्यासाठी निधी देण्याची त्यांची रणनीती आहे, जेणेकरुन ते आपल्यावर हल्ला करतील आणि याचा त्यांनाच राजकीय फायदा मिळेल,’’ असा गंभीर आरोपही संजय राऊतांनी केला.

शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

या सामन्याविरोधात शिवसेना (उबाठा)ने आधीच आंदोलनाचा इशारा दिला होता. सिंदूर रक्षा आंदोलन शिवसेनेने चालवले. विरोधकांचा आरोप होता की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होऊ नये. दरम्यान, रविवारी (14 सप्टेंबर) झालेल्या आशिया चषकातील या चर्चित सामन्यात भारताने पाकिस्तानवर सात गडी राखून मात केली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची संघ 20 षटकांत 9 गडी गमावून फक्त 127 धावा करू शकला. प्रत्युत्तरात भारताने 15.5 षटकांत 3 गडी गमावून 131 धावा करत सामना सहज जिंकला.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडIndiaभारतPakistanपाकिस्तानAsia Cup 2025आशिया कप २०२५BJPभाजपाPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला