शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Sanjay Raut : "भावपूर्ण श्रद्धांजली, लोकशाही!"; संजय राऊत यांच्या ट्विटची जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 12:32 IST

Sanjay Raut : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

शिवसेनेत २१ जून २०२२ रोजी दोन गट पडले. सेनेत दोन गट पडल्याचं २२ जूनला निदर्शनास आले. पक्षात पक्षप्रमुखांपेक्षा राष्ट्रीय कार्यकारणी महत्त्वाची असते. पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाही. पक्षप्रमुख कुणालाही पदावरून हटवू शकत नाही. कार्यकारणी ही पक्षात सर्वोच्च असते. त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारणीचा निर्णय अंतिम असेल. त्यामुळे एकनाथ शिंदेंची हकालपट्टी मान्य करता येत नाही. पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार बहुमताला आहे. त्यामुळे केवळ ठाकरे किंवा शिंदे यांचे मत ग्राह्य धरता येणार नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार एकनाथ शिंदेंकडे बहुमत असल्याने शिंदे गटाला पक्ष म्हणून मान्यता देतो. भरत गोगावले यांची नियुक्ती वैध असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.  

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. "भावपूर्ण श्रद्धांजली, लोकशाही. १९५० - २०२३. शोकाकुल :- महाराष्ट्र" असं म्हणत एक फोटो ट्विट केला आहे. यासोबतच त्यांनी आणखी एक ट्विट केलं असून "चश्मदीद अंधा बना, बहरा सुने दलील, झूठों का है दबदबा, सच्चा हुआ जलील... जय महाराष्ट्र!" असं म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राहुल नार्वेकर, गिरिश महाजन यांचा एक फोटो देखील शेअर केला आहे. 

संजय राऊत यांनी काल "हा निर्णय कोणताही न्याय नाही. हे एक षडयंत्र आहे. आम्ही याविरोधात सर्वोच्च न्यायालायत नक्की जाणार आहोत" असं म्हटलं होतं. तसेच दिल्लीतून जे आदेश मिळाले ते आदेश येथे दिले आहेत. संविधान, कायदा, सत्य काय आहे यावर हे आदेश नाहीत. जमिनीवरचे सत्य या आदेशात नाहीत. बाळासाहेब ठाकरेंची शिवेसना ६० वर्षांआधी स्थापना झाली होती. शिवसेनेचे आजचे मालक एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेच्या स्थापनेवेळी किती वय किती होते? त्यांचा तेव्हा जन्म तरी झाला होता का? बाळासाहेब ठाकरेंची शिवेसना इतिहासजमा झाली. भाजपाचे जुनं स्वप्न होते की बाळसाहेबांची शिवसेना एकदिवस संपवणार. पण त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. पण बाळासाहेबांची शिवसेना अशा निर्णयांमुळे, अशा कागदपत्रांमुळे संपणार नाही. तर, शिवसेना जतनतेत आहे. महाराष्ट्रातील रक्ता-रक्तात आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं होतं. 

"हा निर्णय कोणताही न्याय नाही. हे एक षडयंत्र आहे. आम्ही याविरोधात सर्वोच्च न्यायालायत नक्की जाणार. न्यायालयात आम्ही आमची लढाई सुरूच ठेवणार आहोत. राहुल नार्वेकरांना इतिहास लिहायची संधी दिली होती. त्यांनी ती संधी गमावली आहे. या व्यक्तीनेही महाराष्ट्राच्या पाठीत खंजिर खुपसला आहे. संविधानपीठात बसून त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजिर खुपसला. इतिहास त्यांना लक्षात ठेवेल. या निर्णयाविरोधा जे फटाके वाजवत आहेत ते महाराष्ट्राचे गद्दार आणि बेईमान आहे. यांची अवस्था ही इटलीतील मुसोलिनीसारखी होईल" अशी टीका सुद्धा संजय राऊत यांनी केली होती. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRahul Narvekarराहुल नार्वेकरEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना