शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

महाराष्ट्र निवडणूक 2019 : सत्तासंघर्षात फडणवीस-ठाकरेंपेक्षा संजय राऊतांची अधिक चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 11:24 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : मातोश्रीचे 'चाणक्य' म्हणून ओळख असलेले संजय राऊत यांच्या शब्दाला शिवसेनेत आणि राजकरणात वजन आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेनेत सत्तासंघर्ष सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने हा तिढा सुटत नसल्याचे दिसत आहे. मात्र भाजप-शिवसेनेत सुरु असलेल्या सत्तासंघर्षात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे या दोन्ही नेत्यांपेक्षा तेच अधिक चर्चेत आले असल्याचे दिसत आहे.

मातोश्रीचे 'चाणक्य' म्हणून ओळख असलेले संजय राऊत यांच्या शब्दाला शिवसेनेत आणि राजकरणात वजन आहे. शिवसेना जेव्हा-जेव्हा अडचणीत सापडली आहे, त्या-त्यावेळी सेनेला त्यातून बाहेर काढण्यासाठी राऊत यांची भूमिका महत्वाची ठरली आहे. सद्या भाजप-शिवसेनेत सुरु असलेल्या सत्तासंघर्षात सुद्धा राऊत आघडीवर आहेत. त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता भाजपवर एकप्रकारे दबाव निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. तर दोन्ही पक्षात सुरु असलेल्या कुस्तीच्या दंगलीत संजय राऊत उस्ताद ठरले आहे.

गेल्या पाच वर्षात सत्तेत सोबत असताना सुद्धा भाजप-शिवसेनेत नेहमीच वाद सुरु असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र या काळात सुद्धा संजय राऊत यांच्या इतके भाजपला कुणीच डिवचले नसेल. त्यात आता सत्तेसाठी सुरु असलेल्या या दोन्ही पक्षाच्या संघर्षात शिवसेनेची भूमिका राऊत आक्रमकतेने माडंत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपेक्षा सुद्धा संजय राऊत अधिक चर्चेत असल्याचे बोलले जात आहे.

निवडणुकीत युतीत जागा-वाटपाचा विषय असो की सत्तास्थापनेचा फॉर्म्युला, प्रत्येकवेळी संजय राऊत यांची भूमिका महत्वाची असते. तर विरोधी पक्षाच्या टीकेला खरखरीत उत्तर देण्यासाठी सुद्धा राऊत नेहमीच पुढे असतात. राज्यात सुरु असलेल्या भाजप-शिवसेनेच्या सत्तासंघर्षात राऊत यांच्या भूमिकेबद्दल सोशल मिडियात मोठ्याप्रमाणावर चर्चा सुरु आहे. त्यामुळे राऊत पुन्हा चर्चेत आले आहेत.

 

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण