शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

आधी मुख्यमंत्री, मग शरद पवार.. संजय राऊतांच्या भेटी-गाठी, पण मुद्दा सरकार वाचवण्याऐवजी दुसराच?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 18:11 IST

सध्या सरकार वाचवण्याच्या विषयावर चर्चा सुरू असताना राऊतांनी वेगळ्या विषयावर चर्चा केल्याची माहिती

CM Uddhav Thackeray Sharad Pawar Sanjay Raut: राज्यातील सत्तासंघर्ष आता शिगेला पोहोचला असून उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडी सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governer Bhagat Singh Koshyari) यांनी महाविकास आघाडी सरकारला (Maha Vikas Aghadi) गुरूवारी बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावायला सांगितले आहे. राज्यपालांच्या या निर्णया विरोधात सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेची सुनावणी सुरू असली तरी शिवसेना खासदार यांच्या महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांशी बैठकीचे सत्र सुरूच आहे. आज संजय राऊत यांनी आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा केली. पण विशेष बाब म्हणजे, यावेळी सरकार वाचवण्यासाठी नव्हे तर वेगळ्याच मुद्द्यावर चर्चा झाल्याची चर्चा आहे.

शिवसेनेच्या सुमारे ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आहे. अशा परिस्थितीत आता सरकार वाचविणे हा सर्वात महत्त्वाचा आणि प्राधान्यक्रमाचा विषय आहे. असे असूनही संजय राऊत यांनी आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी तर नंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्याशी वेगळ्याच विषयावर चर्चा केल्याचे बोलले जात आहे. हा विषय नक्की कोणता असावा, असा सवाल साऱ्यांनाच पडला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की औरंगाबादचे नामांतरण संभाजीनगर करावे, या मुद्द्यावर ही चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. औरंगाबादचे नामांतरण संभाजीनगर तर उस्मानाबादचे नामांतरण धाराशिव करावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहेत. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संजय राऊतांनी या गाठी-भेटी घेतल्याचे सांगितले जात आहे.

औरंगाबादचे नामांतरण संभाजीनगर करण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव आहे. मंगळवारी संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यां संदर्भातील मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित केला होता. औरंगाबादच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी देण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे. हा प्रस्ताव मंजूर करून केंद्राला अडचणीत आणण्याची शिवसेनेची रणनिती असल्याचं सांगितलं जात आहे. अखेर केंद्र सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे लक्ष विचलित करण्याची त्यांची स्ट्रॅटेजी असल्याचं सांगितलं जात आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार