शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

स्वत:ला मराठा समजणारे मुख्यमंत्री...; आरक्षणावरून संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 11:47 IST

हा लढा गरीब मराठ्यांचा आहे. ज्यांच्याकडे शेती नाही, नोकरी नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ मराठा समाजासाठी मनोज जरांगेंनी लढा उभारला आहे

मुंबई – सरकारला आरक्षण द्यायचंय की नाही हे स्वत:ला मराठा समजणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समोर येऊन सांगायला हवं. आरक्षणासाठी आज तिसरी आत्महत्या झाली. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला १ महिन्याची मुदत दिली होती. त्यात सरकारने प्रक्रिया करावी आणि आम्हाला आरक्षण द्यावे असं त्यांनी म्हटलं. ही मुदत आता संपतेय. १ महिन्याच्या काळात गरीब मराठा युवकांनी आत्महत्या केल्या पण सरकारच्या डोळ्याची पापणीही हलली नाही. मराठा चेहरा आणि मतांसाठी तुम्हाला मुख्यमंत्री पदावर बसवलंय, मग तुम्ही काय करताय अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

खासदार संजय राऊत म्हणाले की, शिंदे भाजपाला दिलेला शब्द पाळतात, पक्षात फूट पाडणे, बिल्डरांना दिलेला शब्द पाळतात. मराठा समाजाला दिलेला शब्द पाळत नाही. नरेंद्र मोदींसोबत त्यांचा फोटो आहे. मोदींना जाऊन भेटा, कायद्यात दुरुस्ती करा असं सांगा, लाडके आहात ना, मग दिल्लीत जा त्यांच्या दारात बसा. मनोज जरांगे पाटील यांना घेऊन मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी मोदींकडे जावे आणि येताना कायद्यात दुरुस्ती झाल्याचे कागदपत्रे घेऊन यावेत. मराठा समाजातील तरुणांचे आणखी किती बळी घेणार आहात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच महाराष्ट्राचे नागरीक आहेत, मराठी मुले आहेत, जातनंतर...ही मुले मरतायेत हे आम्हाला पाहवत नाही. जाहिरातबाजीवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातायेत. जाहिरातीसाठी तुम्हाला सरकारमध्ये बसवलं नाही. फोटोबाजी तुमच्याकडे ठेवा. मराठा आरक्षणाचा मुद्दा वेगळा आहे. तुमच्या सरकारमधले काही लोकं जे वेगळ्याच दिशेने भूमिका घेऊन चाललेत, राज्यात दिवाळी आधी वातावरण बिघडू शकते. छगन भुजबळ हुलकावण्यात देतायेत, लोकांना भडकवायेत. शिंदे गटातील काही आम्ही कुणबी नाही, ९६ कुळी मराठा आहे. असं बोलतायेत. काँग्रेसमधील काही नेते त्यांची वेगळी भाषा आहे. मराठा समाजाच्या आंदोलनात फूट पाडण्यासाठी सधन मराठ्यांनी रणनीती आखलीय का? हा लढा गरीब मराठ्यांचा आहे. ज्यांच्याकडे शेती नाही, नोकरी नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ मराठा समाजासाठी मनोज जरांगेंनी लढा उभारला आहे. त्यात बाधा आणली जातेय त्यामुळे मराठा तरुण वैफल्यग्रस्त होतायेत आणि आत्महत्या करतायेत. याला जबाबदार राज्य सरकार आहे. आज ३ आत्महत्या झाल्यात, उद्या चौथी झाली तर मराठा समाजाने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAjit Pawarअजित पवार