शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:ला मराठा समजणारे मुख्यमंत्री...; आरक्षणावरून संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 11:47 IST

हा लढा गरीब मराठ्यांचा आहे. ज्यांच्याकडे शेती नाही, नोकरी नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ मराठा समाजासाठी मनोज जरांगेंनी लढा उभारला आहे

मुंबई – सरकारला आरक्षण द्यायचंय की नाही हे स्वत:ला मराठा समजणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समोर येऊन सांगायला हवं. आरक्षणासाठी आज तिसरी आत्महत्या झाली. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला १ महिन्याची मुदत दिली होती. त्यात सरकारने प्रक्रिया करावी आणि आम्हाला आरक्षण द्यावे असं त्यांनी म्हटलं. ही मुदत आता संपतेय. १ महिन्याच्या काळात गरीब मराठा युवकांनी आत्महत्या केल्या पण सरकारच्या डोळ्याची पापणीही हलली नाही. मराठा चेहरा आणि मतांसाठी तुम्हाला मुख्यमंत्री पदावर बसवलंय, मग तुम्ही काय करताय अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

खासदार संजय राऊत म्हणाले की, शिंदे भाजपाला दिलेला शब्द पाळतात, पक्षात फूट पाडणे, बिल्डरांना दिलेला शब्द पाळतात. मराठा समाजाला दिलेला शब्द पाळत नाही. नरेंद्र मोदींसोबत त्यांचा फोटो आहे. मोदींना जाऊन भेटा, कायद्यात दुरुस्ती करा असं सांगा, लाडके आहात ना, मग दिल्लीत जा त्यांच्या दारात बसा. मनोज जरांगे पाटील यांना घेऊन मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी मोदींकडे जावे आणि येताना कायद्यात दुरुस्ती झाल्याचे कागदपत्रे घेऊन यावेत. मराठा समाजातील तरुणांचे आणखी किती बळी घेणार आहात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच महाराष्ट्राचे नागरीक आहेत, मराठी मुले आहेत, जातनंतर...ही मुले मरतायेत हे आम्हाला पाहवत नाही. जाहिरातबाजीवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातायेत. जाहिरातीसाठी तुम्हाला सरकारमध्ये बसवलं नाही. फोटोबाजी तुमच्याकडे ठेवा. मराठा आरक्षणाचा मुद्दा वेगळा आहे. तुमच्या सरकारमधले काही लोकं जे वेगळ्याच दिशेने भूमिका घेऊन चाललेत, राज्यात दिवाळी आधी वातावरण बिघडू शकते. छगन भुजबळ हुलकावण्यात देतायेत, लोकांना भडकवायेत. शिंदे गटातील काही आम्ही कुणबी नाही, ९६ कुळी मराठा आहे. असं बोलतायेत. काँग्रेसमधील काही नेते त्यांची वेगळी भाषा आहे. मराठा समाजाच्या आंदोलनात फूट पाडण्यासाठी सधन मराठ्यांनी रणनीती आखलीय का? हा लढा गरीब मराठ्यांचा आहे. ज्यांच्याकडे शेती नाही, नोकरी नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ मराठा समाजासाठी मनोज जरांगेंनी लढा उभारला आहे. त्यात बाधा आणली जातेय त्यामुळे मराठा तरुण वैफल्यग्रस्त होतायेत आणि आत्महत्या करतायेत. याला जबाबदार राज्य सरकार आहे. आज ३ आत्महत्या झाल्यात, उद्या चौथी झाली तर मराठा समाजाने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAjit Pawarअजित पवार