शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

स्वत:ला मराठा समजणारे मुख्यमंत्री...; आरक्षणावरून संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 11:47 IST

हा लढा गरीब मराठ्यांचा आहे. ज्यांच्याकडे शेती नाही, नोकरी नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ मराठा समाजासाठी मनोज जरांगेंनी लढा उभारला आहे

मुंबई – सरकारला आरक्षण द्यायचंय की नाही हे स्वत:ला मराठा समजणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समोर येऊन सांगायला हवं. आरक्षणासाठी आज तिसरी आत्महत्या झाली. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला १ महिन्याची मुदत दिली होती. त्यात सरकारने प्रक्रिया करावी आणि आम्हाला आरक्षण द्यावे असं त्यांनी म्हटलं. ही मुदत आता संपतेय. १ महिन्याच्या काळात गरीब मराठा युवकांनी आत्महत्या केल्या पण सरकारच्या डोळ्याची पापणीही हलली नाही. मराठा चेहरा आणि मतांसाठी तुम्हाला मुख्यमंत्री पदावर बसवलंय, मग तुम्ही काय करताय अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

खासदार संजय राऊत म्हणाले की, शिंदे भाजपाला दिलेला शब्द पाळतात, पक्षात फूट पाडणे, बिल्डरांना दिलेला शब्द पाळतात. मराठा समाजाला दिलेला शब्द पाळत नाही. नरेंद्र मोदींसोबत त्यांचा फोटो आहे. मोदींना जाऊन भेटा, कायद्यात दुरुस्ती करा असं सांगा, लाडके आहात ना, मग दिल्लीत जा त्यांच्या दारात बसा. मनोज जरांगे पाटील यांना घेऊन मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी मोदींकडे जावे आणि येताना कायद्यात दुरुस्ती झाल्याचे कागदपत्रे घेऊन यावेत. मराठा समाजातील तरुणांचे आणखी किती बळी घेणार आहात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच महाराष्ट्राचे नागरीक आहेत, मराठी मुले आहेत, जातनंतर...ही मुले मरतायेत हे आम्हाला पाहवत नाही. जाहिरातबाजीवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातायेत. जाहिरातीसाठी तुम्हाला सरकारमध्ये बसवलं नाही. फोटोबाजी तुमच्याकडे ठेवा. मराठा आरक्षणाचा मुद्दा वेगळा आहे. तुमच्या सरकारमधले काही लोकं जे वेगळ्याच दिशेने भूमिका घेऊन चाललेत, राज्यात दिवाळी आधी वातावरण बिघडू शकते. छगन भुजबळ हुलकावण्यात देतायेत, लोकांना भडकवायेत. शिंदे गटातील काही आम्ही कुणबी नाही, ९६ कुळी मराठा आहे. असं बोलतायेत. काँग्रेसमधील काही नेते त्यांची वेगळी भाषा आहे. मराठा समाजाच्या आंदोलनात फूट पाडण्यासाठी सधन मराठ्यांनी रणनीती आखलीय का? हा लढा गरीब मराठ्यांचा आहे. ज्यांच्याकडे शेती नाही, नोकरी नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ मराठा समाजासाठी मनोज जरांगेंनी लढा उभारला आहे. त्यात बाधा आणली जातेय त्यामुळे मराठा तरुण वैफल्यग्रस्त होतायेत आणि आत्महत्या करतायेत. याला जबाबदार राज्य सरकार आहे. आज ३ आत्महत्या झाल्यात, उद्या चौथी झाली तर मराठा समाजाने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAjit Pawarअजित पवार