शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! तुफान गर्दी, प्रचंड उत्साह, वरळी डोममध्ये काय घडतंय?
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
4
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
5
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
6
"मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
7
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
8
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
9
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला भक्तिरंगात न्हाऊन निघा; प्रियजनांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!
10
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
11
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
12
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
13
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
14
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
15
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
16
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
17
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
18
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
19
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
20
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!

“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 13:36 IST

Sanjay Raut News: सर्वपक्षीय शिष्टमंडळावरून संजय राऊतांनी केंद्र सरकारवर टीका केली.

Sanjay Raut News: सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा विषय भाजपाने राजकीय केला आहे. उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव शिष्टमंडळात आहेत. हे महाशय काय मांडणार? इतक्या घाईघाईने हे करायची गरज नव्हती. विरोधी पक्षाची मागणी विशेष अधिवेशन घ्यावे आणि चर्चा करावी, ट्रम्प यांच्या सोबत काय चर्चा झाली हे सांगावे, अशी होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटापेक्षा आमचे जास्त खासदार आहेत. हे वऱ्हाड पाठवायची गरज नव्हती. INDIA ब्लॉकच्या सदस्यांनी यावर बहिष्कार टाकावा, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. 

संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरमध्ये न्या. युक्रेन आणि रशियात युद्ध झाल्यावर त्यांच्या प्रमुखांनी भारतात शिष्टमंडळ पाठवले नाहीत. इस्रायलच्या नेतन्याहू यांनीही शिष्टमंडळ पाठवले नाही.  तुम्हाला कळत नाही पण तुम्ही काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयकरण करत आहात. जगात तुम्ही हा प्रश्न घेऊ जात आहात. याचा अर्थ पंतप्रधान कमजोर आहेत. २०० देश फिरले, पण एकही देश पाठिशी उभा राहिला नाही, म्हणून तुमच्यावर ही नौंटकी करण्याची वेळ आली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली

सरकारच्या पापाची वकिली करायला जात आहेत, देशाची नाही

दहशतवादाचा पूर्ण बिमोड करण्याची क्षमता निर्माण झालेली असताना ट्रम्प यांनी एकतर्फी सीझफायर जाहीर करून पाकिस्तानच्या दहशतवादाला मोकाट सोडले. ट्रम्प यांना मध्यस्थी करण्याची गरज का भासली हा प्रश्न तुम्ही वॉश्गिंटनला जाऊन विचारणार असाल तर जा. तुम्ही सरकारच्या ट्रॅपमध्ये अडकत आहात. सरकारने जे गुन्हे आणि पाप केले, त्याची वकिली करायला तुम्ही चालला आहात, देशाची वकिली करायला जात नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, शिवसेनेचा प्रतिनिधी पाठवताना आम्हाला विचारले का, या डेलिगेशनमध्ये तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, आरजेडीचे कोणी दिसते का ? मग सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाते हे ते कोणत्या आधारावर सांगता.  लोकसभेत शिवसेनेचे नऊ सदस्य आहेत. शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी आम्हालाही मिळायला पाहिजे, आमचे सदस्य जास्त आहेत, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. 

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीCentral Governmentकेंद्र सरकार