शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

"त्यांनी मुख्यमंत्र्यांची सभा सुद्धा रद्द केली"; संजय गायकवाडांच्या आरोपांना केंद्रीय मंत्री जाधवांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 11:26 IST

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रताप जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

'प्रताप जाधव यांनी मिलिंद नार्वेकर यांना कॉल करून जयश्री शेळकेंना उमेदवारी मिळवून दिली', असा गंभीर आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला. गायकवाड यांचे आरोप केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांनी फेटाळून लावले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा सुद्धा रद्द केली होती, असे सांगत जाधव यांनी सविस्तर भाष्य केले. 

संजय गायकवाड यांच्या आरोपांवर प्रताप जाधव काय बोलले?

माध्यमांशी बोलताना प्रताप जाधव म्हणाले की, "खरं म्हणजे आमचा उमेदवार इतका सक्षम होता की, त्यांना कुणीच काय, मुख्यमंत्र्यांची सभा सुद्धा त्यांनी स्वतःहून रद्द केली. मोठ्या मताधिक्याने जिंकून येण्याचा त्यांना पूर्ण विश्वास होता. मते कमी पडली, त्यामुळे कदाचित त्यांना तसं वाटत असेल. त्यांनी जे काही आरोप केले, त्याला मी उत्तर देणार नाही. पण, बुलढाणा मतदारसंघ असेल, बुलढाणा जिल्हा असेल, इथली जनता सुज्ञ आहे. कोणी काय केले, हे लोकांना माहिती आहे."  

मिलिंद नार्वेकर यांना सांगून जयश्री शेळके यांना उमेदवारी मिळून दिली, असा आरोप संजय गायकवाड यांनी केला. त्याला उत्तर देताना जाधव म्हणाले, "उद्या राहुल गांधींना फोन करून बुलढाण्याची जागा काँग्रेसऐवजी उबाठाला सोडा, असा आरोप काँग्रेसवाले माझ्यावर करतील. आरोप कोणीही करू शकतं. आरोपात किती तथ्य आहे, हे जनतेला समजत असतं", असं उत्तर प्रताप जाधवांनी आमदार संजय गायकवाड यांना दिले.  

संजय गायकवाड काय म्हणाले?

"ठाकरेंच्या शिवसेनेकडून रविकांत तुपकर यांचा एबी फॉर्म तयार होता. अचानक आमच्या खासदारांचा मिलिंद नार्वेकरांना फोन जातो. मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंशी बोलतात आणि तो एबी फॉर्म थांबवला जातो. नंतर संजय कुटे अनिल परबांना कॉल करतात आणि दोघेही (नार्वेकर-परब) मातोश्रीवर पोहोचतात. दोघेही सांगतात की, उमेदवार बदलून द्या. मला हेच सांगायचं आहे की, आमच्या खासदारांनी किंवा आमच्या संपर्कप्रमुखांनी असं का वागावं?", असा सवाल करत आमदार संजय गायकवाड यांनी गंभीर आरोप केले.  

संजय कुटेंच्या घरी जयश्री यांची बैठक झाली. माझ्याकडे सगळी माहिती आहे. योगेंद्र गोडेंना काम करू नका म्हणून सांगितलं. भाजपचा एकही कार्यकर्ता आमच्या गाडीत कुठे फिरला नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ९९ टक्के लोक आमच्याविरोधात काम करत होते", असा आरोप संजय गायकवाड यांनी केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sanjay Gaikwadसंजय गायकवाडPrataprao Jadhavप्रतावराव जाधवEknath Shindeएकनाथ शिंदे