शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 17:11 IST

Congress Sangram Thopte News: संग्राम थोपटे यांनी मनातील खंत बोलून दाखवत, भाजपामध्ये का प्रवेश करणार, याची कारणेही सांगितली.

Congress Sangram Thopte News: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता काँग्रेसतूनही अनेक नेते, पदाधिकारी पक्षाला रामराम करताना पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात खिंडार पडल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे नेते तथा भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना, काँग्रेस सोडायची वेळ का आली, याची यादीच वाचून दाखवताना भाजपामध्ये कधी प्रवेश करणार, याची तारीखही जाहीर केली आहे.

काही दिवसांपूर्वी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता संग्राम थोपटे हे काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्यामुळे राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तसेच  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व सरचिटणीस पदाचा राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे. यामुळे काँग्रेसला एकामागून एक धक्के बसताना दिसत आहेत. यानंतर आता आपली सविस्तर भूमिका संग्राम थोपटे यांनी स्पष्ट केली.

काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली

काँग्रेस सोडताना मनात दुःख आहे. ही वेळ पक्षानेच आणली आहे. पक्षाने मला संधीच दिली नाही. अनेक वेळा डावलण्यात आले. कार्याध्यक्षपद दिले नाही, विरोधी पक्षनेतेपदाची अपेक्षा होती, तीही पूर्ण झाली नाही. नाना पटोले यांनी राजीनामा दिला त्यावेळी विधानसभा अध्यक्षपद मिळेल, असे वाटले; पण, तिथे ही संधी मिळाली नाही. राजकीय दृष्टिकोनातून पक्ष ताकद देत नव्हता, म्हणूनच मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना वाटत होते की, भाजपामध्ये आपल्याला न्याय मिळू शकेल. सलग तीन वेळा निवडून आलो, पण पक्षाने ताकद द्यायला पाहिजे, ती दिली नाही. पश्चिम महाराष्ट्रात जर ताकद दिली असती तर विधानसभा निवडणुकीत चित्र वेगळे पाहायला मिळाले असते. मला पक्ष प्रवेश करताना कोणते आश्वासन दिले नाही. मी कोणत्याही पदासाठी गेलो नाही. २०१९ पासून नाराजीला सुरुवात झाली. पुणे जिल्ह्यात वजन वाढवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. फॉर्म भरायला पक्षश्रेष्ठींना बोलावले, कुणी वेळ दिला नाही. मी पडल्यावर पण मला फोन केला नाही. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये आश्वासक चेहरा नाही. अनेक प्रकल्प आहेत. त्याला केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी मिळाला नाही. अनेकदा कात्री लागली. सत्ता असताना काही कामे झाली नाहीत. मुळशी तालुक्यात लोकसभेला मतदान झाले ते विधानसभाला झाले नाही. कार्यकर्त्यांनी कामे केले नाही, अशी खंत संग्राम थोपटे यांनी व्यक्त केली. 

विकासकामांना  गती द्यायची असेल तर भाजपात प्रवेश केला पाहिजे

आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणे आहे की, तुम्ही अनेक वर्ष काँग्रेसचे काम करत आहात. मात्र, प्रामाणिकपणे काम करत असतानाही पक्षाने तुम्हाला कायम डावलण्याचे काम केले. शेवटी तुम्हाला मतदारसंघात जनतेनी तीन वेळा संधी दिली. मतदारसंघात तुम्ही विकासाची कामे केली. पण मतदारसंघात अजून विकासाच्या कामांना गती द्यायची असेल तर आपल्याला दुसऱ्या पक्षात जावे लागेल. त्यामुळे अशा पद्धतीचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला आहे. देशात किंवा राज्यात भाजपाचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मत आहे की आपल्या मतदारसंघात विकासकामांना जर गती द्यायची असेल तर भाजपामध्ये प्रवेश केला पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. आता माझी वैयक्तिक भूमिका आधीच सांगितली होती की, कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर ठरवेन. आता कार्यकर्त्यांचे मत आहे की, मी भारतीय जनता पक्षाची राजकीय भूमिका घेतली पाहिजे. तेथेच आपल्याला न्याय मिळेल, असे थोपटे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भाजपामध्ये कधी प्रवेश होणार, याबाबत बोलताना संग्राम थोपटे म्हणाले की, येणाऱ्या २२ एप्रिल रोजी भाजपामध्ये पक्ष प्रवेश होईल. या पक्ष प्रवेशाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष प्रवेश होणार आहे. माझ्याबरोबर अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती संग्राम थोपटे यांनी दिली.

 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाPuneपुणे