शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

आक्रमक भाषा मुंबईत चालते, इथं सांगलीत नाही; विशाल पाटलांचा संजय राऊतांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 17:23 IST

Sangli Loksabha Election: सांगली लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना-काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. या जागेवरील तिढा सोडवून उद्या मविआची संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती आहे. 

सांगली - Vishal Patil on Sanjay Raut ( Marathi News ) सांगलीत सध्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शिवसेनेच्या विरोधात वातावरण तयार झालं आहे. सांगलीत आक्रमक भाषण चालत नाही. ही भाषा मुंबईत चालते. सांगलीतल्या लोकांना संजय राऊतांची भाषा रुचली नाही असं विधान काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी केले आहे. 

विशाल पाटील म्हणाले की, आक्रमक बोलणं ही शिवसेनेची स्टाईल आहे. पण सांगलीत ही ताकद व्यर्थ घालवायला नको. मुंबईत चर्चा करून दौरा केला असता तर बरे झाले असते. ज्या लोकांच्या जीवावर ही जागा निवडून आणायची त्यांच्यावरच टीका केली गेली. विश्वजित कदम हे पक्षासाठी भांडत होते. त्यांच्यावर आरोप करणे ही चुकीची रणनीती ठरली. हे चुकलं म्हणून मी आज बोलायला पुढे आलो असं त्यांनी सांगितले. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

त्याशिवाय विश्वजित कदम काँग्रेसच्या हक्कांसाठी बोलत होते. आम्ही कुठलेही विधान उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांबाबत केले नाही. आम्ही खूप संयमाने बोलत होतो. पण संजय राऊत सांगलीत आले, स्वाभाविक आमचे कुणीही नेते, कार्यकर्ते गेले नाहीत. त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यातून ते दुखावले गेले असावेत आणि त्यातून टीका केली. संजय राऊत स्वत: बोध घेतील असं विशाल पाटील यांनी म्हटलं. 

दरम्यान, शेवटपर्यंत ही जागा काँग्रेसकडेच राहील यासाठी वरिष्ठ नेतेही आग्रही आहेत. शिवसेनेनं परस्पर निर्णय जाहीर केला. चर्चेतून निर्णय घ्यायला हवा होता. गेल्या ५ वर्षात हे सरकार किती अपयशी ठरलंय हे जनतेला आम्ही दाखवलं आहे. सांगलीत भाजपाला निवडून द्यायचे नाही हे जनतेनं ठरवलंय. शिवसेनेनं आत्मपरिक्षण करायला हवं, लहान मुलगाही आला असता तरी कुणीही सांगेल त्यांनी दिलेला उमेदवार हा भाजपाचा पराभव करू शकत नाही असंही विशाल पाटील म्हणाले. 

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हा विषय मिटावा 

भाजपाला पाडायचं असेल तर सांगलीत काँग्रेसच हवी. पक्षनेतृत्वावर आमचा विश्वास आहे. राज्यात आणि देशात निवडणूक सुरू असताना २-३ दिवस संजय राऊत सांगलीत थांबतात. एवढा काय विषय आहे कळत नाही. संयुक्त पत्रकार परिषद आहे त्यात सांगलीची जागा कुणाला याचा निर्णय होईल. आमचा पक्षनेतृत्वावर विश्वास आहे. ही जागा काँग्रेसकडे राहावी यासाठी विश्वजित कदम प्रयत्न करतायेत. ही जागा कदम खेचून आणतील हा विश्वास आहे. शिवसेना हा निर्णय स्वीकारेल आणि काँग्रेस पक्ष ही जागा लढेल असं वाटतं. गुढीपाडवा मुहुर्तावर हा विषय मिटावा. महाविकास आघाडीतील बिघाडी दिसू नये. उद्या जो काही निर्णय असेल तो होईल असं विशाल पाटील यांनी सांगितले. 

वसंतदादा-बाळासाहेब यांच्यात चांगले संबंध 

उद्धव ठाकरे हे संजय राऊतांवर अवलंबून आहे आणि संजय राऊतांनाही प्रत्यक्षात जमिनीवरील परिस्थिती माहिती नसावी. सांगली जिल्ह्यात ठाकरे कुटुंबाला सहानुभूती आहे. बाळासाहेब ठाकरे आणि वसंतदादांचे चांगले संबंध होते. वसंतदादांचा पुतळा ज्या चौकात आहेत त्या चौकाला बाळासाहेब ठाकरे हे नाव सांगलीनेच दिले. वारसाने चांगल्या गोष्टी मिळतात तशा संघर्षातूनही मिळतात असं सांगत राऊतांच्या घराणेशाहीवरील टीकेवर विशाल पाटलांनी उत्तर दिलं. 

टॅग्स :sangli-pcसांगलीSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४