शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

काँग्रेस आणि NCP पवार गटाच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी; संजय राऊतांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 15:54 IST

Sangli Loksabha Election 2024: सांगलीतील चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी संजय राऊत जिल्ह्यात फिरत आहेत. याठिकाणी राऊतांनी चंद्रहार पाटलांना विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना खडे बोल सुनावले. 

सांगली - Sanjay Raut on Congress-NCP ( Marathi News ) काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी आणि महाविकास आघाडीच्या परिवर्तन रॅलीत सहभागी व्हावं अन्यथा सांगलीतील जनता तुम्हाला माफ करणार नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. सांगलीत चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी ते बोलत होते. सांगलीतील जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. तिथं काँग्रेसचे विशाल पाटील लढण्यास इच्छुक आहेत. परंतु ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली आणि ती उमेदवारी मागे घेण्यास ठामपणे नकार देत आहेत. 

चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी आलेले संजय राऊत म्हणाले की, सध्या सांगलीतील राजकीय वातावरण तापलं आहे. चंद्रहार पाटील प्रचारात पुढे पुढे जातील तसं इथल्या विरोधकांची डोकी तापतील. शिवसेना सांगलीत कशी हा प्रश्न भाजपासह काँग्रेसला पडलाय. परंतु हा प्रश्न जिल्ह्यातील १-२ लोकांना पडलाय, देश आणि राज्यातील नेत्यांना नाही. सांगली जिल्ह्यातील मक्तेदारी आमच्याकडेच राहावी. विशिष्ट घराण्याकडेच राहावी. ज्यांच्या हातात कारखाने, बँका, शैक्षणिक संस्था आपल्याच ताब्यात राहाव्यात अशी त्यांची इच्छा आहे. सामान्य शेतकऱ्याच्या मुलानं विधानसभेत, संसदेत जाऊ नये. या जनतेनं आमचे गुलाम म्हणून राहायचं असं त्यांना वाटतं. सामान्यातला सामान्य माणूस आमदार, मंत्री, खासदार, जिल्हा परिषदेत गेला पाहिजे यासाठी ही लोकशाही आहे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच पश्चिम महाराष्ट्रात काहींना ही लोकशाही मान्य नाही. ५०-६० वर्षे आपली घराणी चालली पाहिजे. जोपर्यंत ती घराणी आहेत तोपर्यंत लोकशाही आहे. या मक्तेदारीला आव्हान देण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी आणि शिवसेनेनं केलं. शिवसेनेचा इतिहास पाहिला तर सामान्य माणूस, नोकरदार, मजुरी करणाऱ्याला शिवसेनेनं महापौर केला होता. वॉचमॅन, कर्मचारी असे आमदार झाले. मराठवाड्यात साखर कारखान्याच्या गेटवर तिकिट फाडणारे आमदार, मंत्री झाले. एकनाथ शिंदे रिक्षा चालवायचे. आमच्याकडे पैसे आहेत, बापजाद्यांकडे पैसे आहेत. त्यामुळे आमची पोरं खासदार, मंत्री झाले पाहिजे हे मक्तेदारी शिवसेनेनं मोडली असं सांगत संजय राऊतांनी पश्चिम महाराष्ट्रातील घराणेशाहीवर टीका केली. 

दरम्यान, सांगलीत शेतकऱ्याचा मुलगा खासदारकीला उभा केला असेल, जो दोनदा महाराष्ट्र केसरी झाला, सांगलीतील शान वाढवली, क्रिडा क्षेत्रात मान वाढवला आहे. हा तरुण काहीतरी करू शकेल, आमचा आवाज उचलेल हा विश्वास वाटल्याने उद्धव ठाकरेंनी सांगली लढवण्याचं ठरवलं. चंद्रहार पाटील आल्यानंतर सांगली लोकसभा लढवायचीच हे उद्धव ठाकरेंनी ठरवलं. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आवाहन केलंय, तुमची नौटंकी आता बंद करा आणि महाविकास आघाडीच्या परिवर्तन यात्रेत सामील व्हा. नाहीतर लोक तुम्हाला सांगलीत माफ करणार नाहीत. चंद्रहार पाटील यांना मोठ्या संख्येने मेहनत करून मताधिक्य मिळवून द्यायला हवं. कवठे महाकांळ मतदारसंघातून प्रामाणिक नेतृत्व पुढे आले. अशा माणसाच्या मागे उभं राहून आपण बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना दिली पाहिजे असं संजय राऊतांनी म्हटलं. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस