शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कुणी करत असेल तर...; सांगलीत संजय राऊत कडाडले, सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 18:26 IST

Lok sabha Election 2024: सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा असताना आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सांगली दौऱ्यावर गेले. तिथे चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगलीचा वाद १-२ दिवसांत मिटेल असा दावा राऊतांनी केला.

सांगली - Sanjay Raut on Congress ( Marathi News ) महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून अद्याप तिढा आहे. सांगलीतून काँग्रेसचे विशाल पाटील लढण्यास इच्छुक आहेत. परंतु त्याठिकाणी ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला असून ही जागा आम्हालाच मिळावी यासाठी स्थानिक काँग्रेस नेते प्रयत्नशील आहेत. त्यात ठाकरे गटाकडूनही उमेदवार मागे घेण्यास ठाम नकार दिला आहे. त्यामुळे या जागेवर काँग्रेसकडून मैत्रीपूर्ण लढत होईल अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावरच सांगलीत संजय राऊत यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे.

संजय राऊतांनी म्हटलं की, मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कुणी करत असेल तर त्याला राजकीय परिपक्वता म्हणत नाही. हे मैत्रीपूर्ण लढतीचं लोण पसरलं तर राज्यातील ४८ जागांवर तशा लढती होईल. आघाडी किंवा युती असो कधीही मैत्रीपूर्ण लढत होत नाही. एकतर मैत्री होते किंवा लढत होते असा सूचक इशारा त्यांनी काँग्रेसला दिला आहे. संजय राऊत हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराचा ते आढावा घेत आहेत.

त्याचसोबत चंद्रहार पाटील हे दिल्लीत जाणार आहे. महाविकास आघाडी राज्यात ३ पक्षांनी स्थापन केली. अडीच वर्ष सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उत्तम चालवलं. ज्यारितीने हे सरकार पाडलं त्याचा जनतेमध्ये रोष आहे. २०२४ च्या निवडणुकीत जो अबकी बार ४०० पार नारा दिला आहे. तो किती भंपक, फसवा आहे हे निकालानंतर कळेल. नरेंद्र मोदी कुठल्याही परिस्थितीत देशात पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत आणि त्यांचा पक्ष सरकारमध्ये येणार नाही हे जनमानस आहे असं संजय राऊतांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. गेमचेंजिंगची जबाबदारी महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि दिल्ली ही राज्ये निर्णयाक ठरतील. त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल. राज्यातील ४८ पैकी किमान ३५ हून अधिक जागा जिंकण्याच्या मार्गावर आहोत. लोकसभेच्या जागावाटपात तिन्ही पक्षांनी काळजीपूर्वक भूमिका बजावली आहे. आघाडी, युती म्हटली की एकादुसऱ्या जागेवर वाद होतो. प्रत्येक कार्यकर्त्याला हा मतदारसंघ आपल्यालाच सुटावा असं वाटतं. कार्यकर्त्यांच्या भावनेचा मान राखला पाहिजे. मुंबईत आमची ताकद आहे. तिथे ४-५ जागा आम्ही लढतोय. सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावनेचा राजकीय नेता म्हणून आदर करतो असं संजय राऊतांनी म्हटलं.

सांगलीचा वाद १-२ दिवसांत मिटेल 

कोल्हापूर, रामटेक या जागा आम्ही काँग्रेसला सोडल्यात. अमरावती जागा लढतो आणि जिंकतोय तीही जागा आम्ही काँग्रेसला दिली. देवाणघेवाण आघाडीत होत असते, त्यानुसार सांगली आम्ही लढावी अशी पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका होती. त्यानुसार वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला. १-२ दिवसांत सांगलीतील काँग्रेसची भूमिका शांत होईल. विशाल पाटील, विश्वजित कदम हे दोघेही महत्त्वाचे राजकीय कार्यकर्ते आहेत. उद्याच्या राजकारणात विशाल पाटलांना नक्कीच महत्त्वाची भूमिका मिळेल त्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल. आम्ही एक प्रस्ताव दिल्लीत काँग्रेस वरिष्ठांकडे पाठवला आहे. त्यानुसार चर्चा होईल आणि १-२ दिवसांत सांगलीतील वाद शांत होईल 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेस