शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कुणी करत असेल तर...; सांगलीत संजय राऊत कडाडले, सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 18:26 IST

Lok sabha Election 2024: सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा असताना आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सांगली दौऱ्यावर गेले. तिथे चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगलीचा वाद १-२ दिवसांत मिटेल असा दावा राऊतांनी केला.

सांगली - Sanjay Raut on Congress ( Marathi News ) महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून अद्याप तिढा आहे. सांगलीतून काँग्रेसचे विशाल पाटील लढण्यास इच्छुक आहेत. परंतु त्याठिकाणी ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला असून ही जागा आम्हालाच मिळावी यासाठी स्थानिक काँग्रेस नेते प्रयत्नशील आहेत. त्यात ठाकरे गटाकडूनही उमेदवार मागे घेण्यास ठाम नकार दिला आहे. त्यामुळे या जागेवर काँग्रेसकडून मैत्रीपूर्ण लढत होईल अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावरच सांगलीत संजय राऊत यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे.

संजय राऊतांनी म्हटलं की, मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कुणी करत असेल तर त्याला राजकीय परिपक्वता म्हणत नाही. हे मैत्रीपूर्ण लढतीचं लोण पसरलं तर राज्यातील ४८ जागांवर तशा लढती होईल. आघाडी किंवा युती असो कधीही मैत्रीपूर्ण लढत होत नाही. एकतर मैत्री होते किंवा लढत होते असा सूचक इशारा त्यांनी काँग्रेसला दिला आहे. संजय राऊत हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराचा ते आढावा घेत आहेत.

त्याचसोबत चंद्रहार पाटील हे दिल्लीत जाणार आहे. महाविकास आघाडी राज्यात ३ पक्षांनी स्थापन केली. अडीच वर्ष सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उत्तम चालवलं. ज्यारितीने हे सरकार पाडलं त्याचा जनतेमध्ये रोष आहे. २०२४ च्या निवडणुकीत जो अबकी बार ४०० पार नारा दिला आहे. तो किती भंपक, फसवा आहे हे निकालानंतर कळेल. नरेंद्र मोदी कुठल्याही परिस्थितीत देशात पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत आणि त्यांचा पक्ष सरकारमध्ये येणार नाही हे जनमानस आहे असं संजय राऊतांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. गेमचेंजिंगची जबाबदारी महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि दिल्ली ही राज्ये निर्णयाक ठरतील. त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल. राज्यातील ४८ पैकी किमान ३५ हून अधिक जागा जिंकण्याच्या मार्गावर आहोत. लोकसभेच्या जागावाटपात तिन्ही पक्षांनी काळजीपूर्वक भूमिका बजावली आहे. आघाडी, युती म्हटली की एकादुसऱ्या जागेवर वाद होतो. प्रत्येक कार्यकर्त्याला हा मतदारसंघ आपल्यालाच सुटावा असं वाटतं. कार्यकर्त्यांच्या भावनेचा मान राखला पाहिजे. मुंबईत आमची ताकद आहे. तिथे ४-५ जागा आम्ही लढतोय. सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावनेचा राजकीय नेता म्हणून आदर करतो असं संजय राऊतांनी म्हटलं.

सांगलीचा वाद १-२ दिवसांत मिटेल 

कोल्हापूर, रामटेक या जागा आम्ही काँग्रेसला सोडल्यात. अमरावती जागा लढतो आणि जिंकतोय तीही जागा आम्ही काँग्रेसला दिली. देवाणघेवाण आघाडीत होत असते, त्यानुसार सांगली आम्ही लढावी अशी पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका होती. त्यानुसार वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला. १-२ दिवसांत सांगलीतील काँग्रेसची भूमिका शांत होईल. विशाल पाटील, विश्वजित कदम हे दोघेही महत्त्वाचे राजकीय कार्यकर्ते आहेत. उद्याच्या राजकारणात विशाल पाटलांना नक्कीच महत्त्वाची भूमिका मिळेल त्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल. आम्ही एक प्रस्ताव दिल्लीत काँग्रेस वरिष्ठांकडे पाठवला आहे. त्यानुसार चर्चा होईल आणि १-२ दिवसांत सांगलीतील वाद शांत होईल 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेस