शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कुणी करत असेल तर...; सांगलीत संजय राऊत कडाडले, सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 18:26 IST

Lok sabha Election 2024: सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा असताना आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सांगली दौऱ्यावर गेले. तिथे चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगलीचा वाद १-२ दिवसांत मिटेल असा दावा राऊतांनी केला.

सांगली - Sanjay Raut on Congress ( Marathi News ) महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून अद्याप तिढा आहे. सांगलीतून काँग्रेसचे विशाल पाटील लढण्यास इच्छुक आहेत. परंतु त्याठिकाणी ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला असून ही जागा आम्हालाच मिळावी यासाठी स्थानिक काँग्रेस नेते प्रयत्नशील आहेत. त्यात ठाकरे गटाकडूनही उमेदवार मागे घेण्यास ठाम नकार दिला आहे. त्यामुळे या जागेवर काँग्रेसकडून मैत्रीपूर्ण लढत होईल अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावरच सांगलीत संजय राऊत यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे.

संजय राऊतांनी म्हटलं की, मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कुणी करत असेल तर त्याला राजकीय परिपक्वता म्हणत नाही. हे मैत्रीपूर्ण लढतीचं लोण पसरलं तर राज्यातील ४८ जागांवर तशा लढती होईल. आघाडी किंवा युती असो कधीही मैत्रीपूर्ण लढत होत नाही. एकतर मैत्री होते किंवा लढत होते असा सूचक इशारा त्यांनी काँग्रेसला दिला आहे. संजय राऊत हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराचा ते आढावा घेत आहेत.

त्याचसोबत चंद्रहार पाटील हे दिल्लीत जाणार आहे. महाविकास आघाडी राज्यात ३ पक्षांनी स्थापन केली. अडीच वर्ष सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उत्तम चालवलं. ज्यारितीने हे सरकार पाडलं त्याचा जनतेमध्ये रोष आहे. २०२४ च्या निवडणुकीत जो अबकी बार ४०० पार नारा दिला आहे. तो किती भंपक, फसवा आहे हे निकालानंतर कळेल. नरेंद्र मोदी कुठल्याही परिस्थितीत देशात पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत आणि त्यांचा पक्ष सरकारमध्ये येणार नाही हे जनमानस आहे असं संजय राऊतांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. गेमचेंजिंगची जबाबदारी महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि दिल्ली ही राज्ये निर्णयाक ठरतील. त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल. राज्यातील ४८ पैकी किमान ३५ हून अधिक जागा जिंकण्याच्या मार्गावर आहोत. लोकसभेच्या जागावाटपात तिन्ही पक्षांनी काळजीपूर्वक भूमिका बजावली आहे. आघाडी, युती म्हटली की एकादुसऱ्या जागेवर वाद होतो. प्रत्येक कार्यकर्त्याला हा मतदारसंघ आपल्यालाच सुटावा असं वाटतं. कार्यकर्त्यांच्या भावनेचा मान राखला पाहिजे. मुंबईत आमची ताकद आहे. तिथे ४-५ जागा आम्ही लढतोय. सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावनेचा राजकीय नेता म्हणून आदर करतो असं संजय राऊतांनी म्हटलं.

सांगलीचा वाद १-२ दिवसांत मिटेल 

कोल्हापूर, रामटेक या जागा आम्ही काँग्रेसला सोडल्यात. अमरावती जागा लढतो आणि जिंकतोय तीही जागा आम्ही काँग्रेसला दिली. देवाणघेवाण आघाडीत होत असते, त्यानुसार सांगली आम्ही लढावी अशी पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका होती. त्यानुसार वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला. १-२ दिवसांत सांगलीतील काँग्रेसची भूमिका शांत होईल. विशाल पाटील, विश्वजित कदम हे दोघेही महत्त्वाचे राजकीय कार्यकर्ते आहेत. उद्याच्या राजकारणात विशाल पाटलांना नक्कीच महत्त्वाची भूमिका मिळेल त्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल. आम्ही एक प्रस्ताव दिल्लीत काँग्रेस वरिष्ठांकडे पाठवला आहे. त्यानुसार चर्चा होईल आणि १-२ दिवसांत सांगलीतील वाद शांत होईल 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेस