शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Sambhajinagar Violence : 'NCP नेत्याने छ. संभाजीनगरमध्ये हिंसाचार घडवून आणला', भाजप खासदार अनिल बोंडेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 15:42 IST

'खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीच्या नेत्यामधील वादामुळे राम नवमीच्या मध्यरात्री ती घटना घडली.'

Chhatrapati Sambhajinagar Violence : राम नवमीच्या आदल्या रात्री छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात मोठा तणाव निर्माण झाला होता. या परिसरात असलेल्या राम मंदिराजवळ दोन गटात वाद पेटला आणि या वादाचे रुपांतर दगडफेक आणि जाळपोळीत झाले. यावेळी अनेक गाड्या जाळण्यात आल्या. तसेच, दुकानांची तोडफोडही झाली. या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, भाजपचे राज्यसभा खासदार अनेल बोंडे यांनी या दंगलीमागे राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप केला आहे.

एका वृत्त वाहिनीशी संवाद साधताना भाजप खासदार अनिल बोंडे म्हणाले, 'छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या आदल्या रात्री घडलेल्या घटनेमागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हात आहे. ज्या भागात ही दंगल पेटली, त्या भागात हिंदू राहत नाही. त्यामुळे या घटनेला हिंदू-मुस्लिम रंग देण्याचा काहीच अर्थ नाही. राष्ट्रवादीचा स्थानिक नेता आणि एमआयएमच्या नेत्यातील भांडणामुळे ही घटना घडली. देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीपद सांभळण्यात सक्षम असल्यामुळे प्रकरण तात्काळ शांत झाले,' असे अनिल बोंडे म्हणाले.

ते पुढे म्हणतात, 'रामनवमीच्या आदल्या दिवशी खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीचा नेता मौलाना कादीर याचा मुलगा रियाजुद्दीन याचे भांडण झाले. इम्तियाज जलील यांना मारहाण करण्यासाठी तिथे रियाजुद्दीनचे लोक आले होते. त्यामुळे जलील यांनी बचावासाठी राम मंदिराचा आसरा घेतला. जलील मंदिरातून बाहेर येत नव्हते, त्यामुळे रियाजुद्दीनच्या लोकांनी मंदिरासमोर असलेल्या मुस्लिम समाजातील लोकांच्या दुकानांवर दगडफेक केली. त्यानंतर इम्तियाज जलील यांचे लोक तिथे आले आण हा हिंसाचार घडला.'

'इम्तियाज जलील आणि मौलाना अब्दुल कादिर यांच्यामधील भांडणामुळे ही एवढी मोठी घटना घडली. याची सुरुवात मौलाना अब्दुल कादिर याचा मुलगा रियाजुद्दीने केली. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी मौलाना कादिर आणि रियाजुद्दीचे फोन कॉल चेक करावे. कोणाच्या सांगण्यावरुन ही दंगल भडकवली, याची चौकशी करावी. हा वाद दोन मुस्लिम गटामध्ये झाला. पण, राष्ट्रवादी काँग्रेसने याला वेगळा रंग दिला. या घटनेच्या मागे मोठा हात आहे. कारण दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप होतात. फक्त एवढ्यासाठीच दंगल भडकवण्यात आली,' असा आरोप बोंडे यांनी केला आहे. 

टॅग्स :Anil Bondeअनिल बोंडेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबाद