शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत?
3
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
4
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
5
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
6
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
7
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
8
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
9
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
10
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
11
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
12
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
13
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
14
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
15
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
16
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
17
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
18
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
19
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
20
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Sambhajinagar Violence : 'NCP नेत्याने छ. संभाजीनगरमध्ये हिंसाचार घडवून आणला', भाजप खासदार अनिल बोंडेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 15:42 IST

'खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीच्या नेत्यामधील वादामुळे राम नवमीच्या मध्यरात्री ती घटना घडली.'

Chhatrapati Sambhajinagar Violence : राम नवमीच्या आदल्या रात्री छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात मोठा तणाव निर्माण झाला होता. या परिसरात असलेल्या राम मंदिराजवळ दोन गटात वाद पेटला आणि या वादाचे रुपांतर दगडफेक आणि जाळपोळीत झाले. यावेळी अनेक गाड्या जाळण्यात आल्या. तसेच, दुकानांची तोडफोडही झाली. या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, भाजपचे राज्यसभा खासदार अनेल बोंडे यांनी या दंगलीमागे राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप केला आहे.

एका वृत्त वाहिनीशी संवाद साधताना भाजप खासदार अनिल बोंडे म्हणाले, 'छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या आदल्या रात्री घडलेल्या घटनेमागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हात आहे. ज्या भागात ही दंगल पेटली, त्या भागात हिंदू राहत नाही. त्यामुळे या घटनेला हिंदू-मुस्लिम रंग देण्याचा काहीच अर्थ नाही. राष्ट्रवादीचा स्थानिक नेता आणि एमआयएमच्या नेत्यातील भांडणामुळे ही घटना घडली. देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीपद सांभळण्यात सक्षम असल्यामुळे प्रकरण तात्काळ शांत झाले,' असे अनिल बोंडे म्हणाले.

ते पुढे म्हणतात, 'रामनवमीच्या आदल्या दिवशी खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीचा नेता मौलाना कादीर याचा मुलगा रियाजुद्दीन याचे भांडण झाले. इम्तियाज जलील यांना मारहाण करण्यासाठी तिथे रियाजुद्दीनचे लोक आले होते. त्यामुळे जलील यांनी बचावासाठी राम मंदिराचा आसरा घेतला. जलील मंदिरातून बाहेर येत नव्हते, त्यामुळे रियाजुद्दीनच्या लोकांनी मंदिरासमोर असलेल्या मुस्लिम समाजातील लोकांच्या दुकानांवर दगडफेक केली. त्यानंतर इम्तियाज जलील यांचे लोक तिथे आले आण हा हिंसाचार घडला.'

'इम्तियाज जलील आणि मौलाना अब्दुल कादिर यांच्यामधील भांडणामुळे ही एवढी मोठी घटना घडली. याची सुरुवात मौलाना अब्दुल कादिर याचा मुलगा रियाजुद्दीने केली. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी मौलाना कादिर आणि रियाजुद्दीचे फोन कॉल चेक करावे. कोणाच्या सांगण्यावरुन ही दंगल भडकवली, याची चौकशी करावी. हा वाद दोन मुस्लिम गटामध्ये झाला. पण, राष्ट्रवादी काँग्रेसने याला वेगळा रंग दिला. या घटनेच्या मागे मोठा हात आहे. कारण दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप होतात. फक्त एवढ्यासाठीच दंगल भडकवण्यात आली,' असा आरोप बोंडे यांनी केला आहे. 

टॅग्स :Anil Bondeअनिल बोंडेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबाद