शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Sambhajinagar Violence : 'NCP नेत्याने छ. संभाजीनगरमध्ये हिंसाचार घडवून आणला', भाजप खासदार अनिल बोंडेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 15:42 IST

'खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीच्या नेत्यामधील वादामुळे राम नवमीच्या मध्यरात्री ती घटना घडली.'

Chhatrapati Sambhajinagar Violence : राम नवमीच्या आदल्या रात्री छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात मोठा तणाव निर्माण झाला होता. या परिसरात असलेल्या राम मंदिराजवळ दोन गटात वाद पेटला आणि या वादाचे रुपांतर दगडफेक आणि जाळपोळीत झाले. यावेळी अनेक गाड्या जाळण्यात आल्या. तसेच, दुकानांची तोडफोडही झाली. या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, भाजपचे राज्यसभा खासदार अनेल बोंडे यांनी या दंगलीमागे राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप केला आहे.

एका वृत्त वाहिनीशी संवाद साधताना भाजप खासदार अनिल बोंडे म्हणाले, 'छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या आदल्या रात्री घडलेल्या घटनेमागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हात आहे. ज्या भागात ही दंगल पेटली, त्या भागात हिंदू राहत नाही. त्यामुळे या घटनेला हिंदू-मुस्लिम रंग देण्याचा काहीच अर्थ नाही. राष्ट्रवादीचा स्थानिक नेता आणि एमआयएमच्या नेत्यातील भांडणामुळे ही घटना घडली. देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीपद सांभळण्यात सक्षम असल्यामुळे प्रकरण तात्काळ शांत झाले,' असे अनिल बोंडे म्हणाले.

ते पुढे म्हणतात, 'रामनवमीच्या आदल्या दिवशी खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीचा नेता मौलाना कादीर याचा मुलगा रियाजुद्दीन याचे भांडण झाले. इम्तियाज जलील यांना मारहाण करण्यासाठी तिथे रियाजुद्दीनचे लोक आले होते. त्यामुळे जलील यांनी बचावासाठी राम मंदिराचा आसरा घेतला. जलील मंदिरातून बाहेर येत नव्हते, त्यामुळे रियाजुद्दीनच्या लोकांनी मंदिरासमोर असलेल्या मुस्लिम समाजातील लोकांच्या दुकानांवर दगडफेक केली. त्यानंतर इम्तियाज जलील यांचे लोक तिथे आले आण हा हिंसाचार घडला.'

'इम्तियाज जलील आणि मौलाना अब्दुल कादिर यांच्यामधील भांडणामुळे ही एवढी मोठी घटना घडली. याची सुरुवात मौलाना अब्दुल कादिर याचा मुलगा रियाजुद्दीने केली. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी मौलाना कादिर आणि रियाजुद्दीचे फोन कॉल चेक करावे. कोणाच्या सांगण्यावरुन ही दंगल भडकवली, याची चौकशी करावी. हा वाद दोन मुस्लिम गटामध्ये झाला. पण, राष्ट्रवादी काँग्रेसने याला वेगळा रंग दिला. या घटनेच्या मागे मोठा हात आहे. कारण दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप होतात. फक्त एवढ्यासाठीच दंगल भडकवण्यात आली,' असा आरोप बोंडे यांनी केला आहे. 

टॅग्स :Anil Bondeअनिल बोंडेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबाद