शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊ खोत यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला; सरकार कोरोनाच्या तिरडीवर झोपलंय, तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 15:57 IST

या सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. शेतकऱ्यांचा पुळका घेऊन बोलणारे नेते आज शेतकऱ्यांसाठी काय करताय? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देदूध उत्पादकांचा आवाज सरकारपर्यंत पोहचला नाही का?राज्यातील केवळ १० तालुक्यातून दूधाचं संकलन केले जाते१ ऑगस्टच्यापूर्वी दूध उत्पादकांच्या प्रश्नांवर सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा राज्यभर आंदोलनशेतीला जोडधंदा म्हणून दूधाचा धंदा केला जातो, पण त्याकडेही सरकारचं दुर्लक्ष

मुंबई - राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक भाषण केली, कोरोनाशी लढा पण शेतात लढणाऱ्या शेतकऱ्यांची मदत का करत नाही? हे सरकार कोरोनाचा बागुलबुवा दाखवत आहे, कोणताही प्रश्न आला तरी कोरोनाचं नाव पुढे केले जाते, सरकार कोरोनाच्या तिरडीवर झोपलय, तर सामान्य माणूस आत्महत्येच्या दरडीवर उभा आहे अशा शब्दात माजी कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकारवर घणाघात केला आहे.

पत्रकारांशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, राज्यात सहकाराच्या माध्यमातून २४ टक्के दूध संकलन केले जाते तर खासगीच्या माध्यमातून ७६ टक्के दूध संकलन होते, या सहा महिन्यात शेतकऱ्यांचा भाजीपाला सडला, आंब्याला फटका बसला, फळांची नासाडी झाली पण सरकारकडून कोणतीही बाजारपेठ उभी राहिली नाही, राज्यात २० टक्क्यापेक्षा जास्त पिककर्ज शेतकऱ्यांना मिळू शकलं नाही. शेतीला जोडधंदा म्हणून दूधाचा धंदा केला जातो, पण त्याकडेही सरकार दुर्लक्ष करत आहे. दूधाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांना समजत नाही किंवा समजूनही ते मुक्या-बहिऱ्यासारखं करत आहेत असा टोला खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला.

तसेच दूधाच्या प्रश्नावर राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. दूध भुकटी परदेशातून आयात केल्यानं उत्पादकांना फटका बसला असा आरोप महाविकास आघाडीचे नेते करतात, पण केंद्राने एक किलो भुकटी परदेशातून आयात केली नाही, दुध भुकटी परदेशातून आणण्यास केंद्राने परवानगी दिली नाही. दूध उत्पादकांचा आवाज सरकारपर्यंत पोहचला नाही का? या सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. शेतकऱ्यांचा पुळका घेऊन बोलणारे नेते आज शेतकऱ्यांसाठी काय करताय? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, राज्यातील केवळ १० तालुक्यातून दूधाचं संकलन केले जाते, उर्वरित तालुक्यातून दूध संकलन केले जात नाही, यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, सुनील केदार यांच्या संघातून दूध खरेदी केली जाते असा आरोप खोत यांनी केला, त्याचसोबत १ ऑगस्टच्यापूर्वी दूध उत्पादकांच्या प्रश्नांवर सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा गावांगावातील दूध डेअरीसमोर हातात बॅनर घेऊन मागण्यांचे बॅनर्स झळकावू, रस्त्यावर दुधाची वाहने आली तर ती परतवून लावू असा इशारा महायुतीच्या माध्यमातून त्यांनी दिला आहे. सोबतच दुधाची नासाडी करु नये, आंदोलनातील दूध रस्त्यावर न फेकता गरिबांना वाटा अशा कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmilkदूधSadabhau Khotसदाभाउ खोत FarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार