शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

“ठाकरे व पवार पाठीत खंजीर खुपसणारे राजकारणी, हे चंद्रकांत पाटलांचे वास्तववादी भाष्य”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 16:01 IST

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाशी सहमत असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले.

नांदेड: गेल्या अनेक कालावधीपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात विविध विषयांवरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. कोरोना निर्बंधांपासून ते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पाठीत खंजीर खुपसणारा एकच चेहरा होता, आता दोन चेहरे झालेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यावर, चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेशरद पवार यांच्यावर केलेले भाष्य हे वास्तववादी असून, आपण समहमत असल्याचे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. (sadabhau khot gave support to statement of chandrakant patil on uddhav thackeray and sharad pawar)

“केवळ महिला घरात असताना CBI ने कारवाई करणे चुकीचे”; सुप्रिया सुळेंची टीका

भाजपची स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी तयारी सुरू आहे. युतीत निवडणूक लढणार नाही. फक्त जे प्रामाणिकपणे आपल्यासोबत आहे, ज्यांच्यासोबत निवडणूक लढवणार. पण नाव मोठे लक्षण खोटे आपल्याला नको. पाठीत खंजीर खोपसणारे आपल्याला नको अशी टीका करत  पाठीत खंजीर खुपसणारे एकच नाव आधी होते, पण आता दुसरा चेहरा दिसतोय, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी थेट शिवसेनेवर घणाघात केला. याला सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दर्शवला आहे. 

“यात काडीमात्र तथ्य नाही, हा फक्त शिळ्या कढीला उत आणायचा प्रयत्न”; भुजबळांचे प्रत्युत्तर

अनेकांना सत्तेसाठी चकवा दिला

शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल कुठेही विकता आला पाहिजे. परंतु ज्यावेळी कृषी विषयक सभागृहात आले, त्यावेळी मात्र त्यास मूक संमती दिली. त्यांनी सत्तेसाठी काँग्रेस पक्षासोबत हातमिळवणी केली. अनेकांना सत्तेसाठी चकवा दिला. त्यांची जी कुटणीती आहे ही महाराष्ट्राला परिचित आहे. म्हणून देशपातळीवरील राजकारणात शरद पवारांना अथवा त्यांच्या एखाद्या घोषणेला फारसे महत्व दिले जात नाही, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला. 

केंद्रातील मोदी सरकार म्हणजे सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’; काँग्रेसचा घणाघात

शरद पवारांची चाल महाराष्ट्राला माहितीय

शरद पवार हे चकवा देणारे राजकारणी आहेत, हे देशपातळीवरील राजकारण्यांना माहिती झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे व शरद पवारांची चाल महाराष्ट्राला माहित झाली आहे. म्हणून चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानाशी सहमत असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. 

“आता जितेंद्र आव्हाड यांचा नंबर; लिस्टमधील १२वा खेळाडू!”; किरीट सोमय्यांचा दावा

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी मार्ग खुले असल्याचे सांगत आमच्या पाठीत खंजीरच खुपसला होता. विधानसभा निकालावेळी ४ वाजता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होती. त्यावेळी मी पुण्यातून येत होतो. पण, उद्धव ठाकरेंनी ४ वाजताची पत्रकार परिषद तुमची तुम्ही करा आणि माझी मी करतो असे म्हटले. तिथेच गडबड झाल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी सर्व मार्ग मोकळे आहेत असे म्हटले. त्यांना वेगळाच मार्ग निवडायचा होता, तर आधी युती का केली? सेनेने विश्वासघात केला, विश्वासघाताचेच नाव पाठित खंजीर खुपसणे आहे, असे पाटील म्हणाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणSadabhau Khotसदाभाउ खोत chandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना