शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

कोणत्याही अडथळ्याविना आता सचिन वाझे प्रकरणाचा तपास होईल: अनिल देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 20:28 IST

Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणाचा तपास आता कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देसचिन वाझे प्रकरणी अनिल देशमुख यांची प्रतिक्रियाविना अडथळा आता तपास पूर्ण होईल - अनिल देशमुखएनआयए आणि एटीएस सचिन वाझे प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करीत आहेत - देशमुख

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू (Mansukh Hiren Death Case) आणि त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक करण्यात आली. या प्रकणी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर उचलबांगडी केल्यानंतर त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली. या पार्श्वभूमीवर, सचिन वाझे प्रकरणाचा तपास आता कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी म्हटले आहे. (anil deshmukh says now sachin vaze case investigation could be done without any obstruction)

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सचिन वाझे प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग यांच्यावर टीका केली जात होती. त्यांच्या बदलीची चर्चा देखील सुरू होती. अखेर राज्य सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश काढले. राष्ट्रीय तपास यंत्रणेने सचिन वाझे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी शोधाशोध केली. रात्रीपर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत पथकाच्या हाती काय लागले याबाबत एनआयएने माहिती दिली नाही, असे सांगितले जात आहे. 

विना अडथळा तपास पूर्ण होईल

एनआयए आणि एटीएस सचिन वाझे प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करीत आहेत. त्यानुसार कारवाई केली जाईल. परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोणत्याही अडथळ्याशिवाय या प्रकरणाचा तपास होईल, असे अनिल देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

गृहमंत्री महोदय... तुम्ही नेमकं केलं काय? भाजपचा अनिल देशमुखांवर जोरदार हल्लाबोल

दरम्यान, मुंबई पोलीस दलाची प्रतिष्ठा खूप मोठी आहे. त्यांची तुलना स्कॉटलँड यार्डशी होते. पण काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कृत्यांचा फटका संपूर्ण पोलीस दलाला बसतो, अशा शब्दांत देशमुख यांनी अँटिलिया प्रकरणावर भाष्य केले होते. इतक्या गंभीर आणि महत्त्वाच्या प्रकरणाचा तपास एपीआय पदावरील वाझेंकडे का सोपवला, या प्रश्नाला गृहमंत्र्यांनी उत्तर दिले. सुरुवातीला सीआययूकडे तपास दिला गेला. वाझे या विभागाचे प्रमुख होते. पण तीन दिवसांतच या घटनेचे गांभीर्य लक्षात आले. त्यानंतर तपास सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवला गेला, असे देशमुख म्हणाले होते.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेAnil Deshmukhअनिल देशमुखNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाAnti Terrorist SquadएटीएसMansukh Hirenमनसुख हिरणPoliticsराजकारण