शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

ठाकरेंची मुलाखत म्हणजे अस्सल मऱ्हाठमोळा ठेचा, त्यामुळे ठसका लागणारच; शिवसेनेचा फडणवीसांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 07:25 IST

फडणवीस हे किमान बोलावे व लिहावे असे व्यक्तिमत्त्व, बाकी सगळे पादरे पावटेच; शिवसेनेचा टोला.

उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचे दोन भाग नुकतेच प्रदर्शित करण्यात आले होते. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांनी त्यांनी उत्तरं दिली होती. दरम्यान या मुलाखतीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया देत मॅच फिक्सिंग असा उल्लेख केला होता. त्यावरून आता शिवसेनेने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही फडणवीसांच्या वक्तव्याची दखल घेतली. कारण ज्यांच्यावर किमान बोलावे व लिहावे असे ते व्यक्तिमत्त्व आहे. बाकी सगळे पादरे पावटेच आहेत, असे म्हणत शिवसेनेने टोला लगावला.

ठाकरे यांची मुलाखत चोखून खाण्याची चीज नाहीच. तो अस्सल मऱ्हाठमोळा ठेचा आहे. त्यामुळे ठसका लागणारच! विरोधकांचे तसेच झाले आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हटलेय अग्रलेखात?फडणवीस व त्यांच्या सरकारला नैतिकतेचे कितीही प्रवचन झोडू द्या, खरे काय ते लोकांना माहीत आहे. ‘ठाकरे-राऊत’ मुलाखतीचा भूकंप म्हणजे मॅच फिक्सिंग असा आरोप करणारे फडणवीस हे काही ‘श्रीमान सत्यवादी’ नाहीत. फडणवीस म्हणतात, ठाकऱ्यांची मुलाखत वाचनीय नाही. याचा सरळ अर्थ असा की, अस्सल मराठमोळा ठेचा असलेल्या या मुलाखतीने त्यांना ठसका लागला, जळजळ झाली. त्याला कोणी काय करायचे?, असा सवालही शिवसेनेने केला आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे आहे की, ‘आपण उद्धव ठाकरे यांची मुलाखत वाचली नाही, पाहिली नाही. ठाकरे यांची मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग आहे.’ यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. जर त्यांनी ती वाचली नसेल म्हणजे ते राजकीय पुरुष नाहीत. कारण उद्धव ठाकरे हे काय बोलतात याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते. फडणवीस यांची मानसिक स्थिती समजून घेतली तर त्यांचे बोलणे गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे शिवसेनेने नमूद केले आहे.

असे प्रश्न तरी दिसत नाहीअक्षय कुमार मोदींना विचारतात, ‘‘आदरणीय पंतप्रधानजी, आपण आंबे कापून खाता की चोखून खाता?’’ असे प्रश्न तरी ठाकरे-राऊत मुलाखतीत दिसत नाहीत. ठाकरे यांची मुलाखत चोखून खाण्याची चीज नाहीच. पंतप्रधानांची मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग आहे असे आम्ही म्हणणार नाही, असेही शिवसेनेने म्हटलेय.

मंत्रिमंडळाचा अतापता एक महिन्यानंतरही नाही. इतके फिक्सिंग करून सरकार जन्माला घातले, पण ते रडत नाही की हात-पाय हलवत नाही, हा चिंतेचा विषय आहे. सरकारचा जन्म अनैसर्गिक परिस्थितीत झाला की दुसरे काय व्हायचे?, असा सवालही त्यांनी केला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ