शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

Women's Day 2019 : मराठवाड्यातल्या ग्रामीण महिला लिहिणार स्वतःच त्यांच्या यशकथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 08:11 IST

अल्पशिक्षित ग्रामीण महिलांना लिहित्या करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि स्वयम शिक्षण प्रयोगचा अभिनव उपक्रम

मुंबई: दुष्काळ म्हटला की, जमिनीला गेलेले तडे, आकाशाकडे डोळे लावून बसलेले शेतकरी आणि डोक्यावरून तीन-चार हंडे घेऊन मैलच्या मैल चालणाऱ्या बायका, असेच काहीसे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. मात्र दुष्काळाच्या काळात जिथे पुरुष हतबल होताना दिसतात तिथे स्त्रिया मात्र ताकदीने उभ्या राहाताना दिसतात. आजही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नी नेटाने आपले संसार चालवतात, परिस्थिती काहीही असली तरी. या दुष्काळाने मराठवाड्यातील अनेक स्त्रियांना कर्तृत्वाने फुलवण्यास मदत केली आहे. याच स्त्रियांना त्यांचं यशोगाथांविषयी लिहिते करण्याचा उपक्रम शासन आणि स्वयम शिक्षण प्रयोग या सेवाभावी संस्थेने हाती घेतला आहे. यासाठीचे पहिले पाऊल म्हणजे लातूर,उस्मानाबाद व साेलापूर जिल्ह्यातल्या महिलांसाठी एका 'लेखन संवाद कार्यशाळे'चे आयोजन लातूर येथे अलीकडेच करण्यात आले होते. या दोन दिवसीय कार्यशाळेत ४० हून अधिक महिलांनी भाग घेतला. 

 

दुष्काळाचा सामना करत मराठवाड्यातल्या ग्रामीण महिला प्रतिकूल पर्यावरणाशी झगडत अनेक महिला सेंद्रिय शेती -अन्नसुरक्षा, शेतीपूरक आणि इतर व्यवसाय, स्वच्छ ऊर्जा,पाणी, स्वच्छता आणि आरोग्य तसेच ग्रामीण विकासाच्या अनेक योजना आपापल्या परिसरात राबवण्यासाठी पुढे येत असून स्वतःचे आणि इतरांचे आयुष्य उजळून टाकत आहेत. आपल्या आणि आपल्या सख्यांच्या कथा आणि व्यथा या महिलांनी स्वतःच सांगाव्यात,लिहाव्यात आणि अनेक माध्यमातून समाजापर्यंत पोचवाव्यात या हेतूने आयोजित केलेल्या या प्रशिक्षणात महिला बचत गट, कृषी गट, लीडर, उद्योजक महिलांना शब्दात व्यक्त होण्याचे तंत्र, संवाद, वाचनाचे महत्व , स्वानुभवाच्या आधारे लिखाण, मुलाखतीचे तंत्र ,डिजिटल तसेच सोशल मीडियाचे महत्त्व अशा अनेक गोष्टीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेला लातूरच्या विभागीय माहिती कार्यालयाच्या सहाय्यक संचालक मीरा ढास, दूरदर्शनचे पत्रकार दीपरत्न निलंगेकर, माजी कृषी अधिकारी रमेश चिल्ले आणि लेखिका यशोधरा काटकर यांनी मार्गदर्शन केले. स्वयम् शिक्षण प्रयोगचे विकास कांबळे,लक्ष्मीकांत माळवदकर आणि अंबिका मुंढे यांचा या कार्यशाळेच्या आयोजनात मोलाचा वाटा होता.

कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या पेलण्यासाठी सदैव सज्ज राहावे लागणाऱ्या आपल्या अल्पशिक्षित ,ग्रामीण महिलांना लिहित्या करण्यासाठी आयोजित केलेल्या या पहिल्या-वहिल्या कार्यशाळेत सहभागी झालेल्या महिलांचा उत्साह बघण्यासारखा होता अशी माहिती यशोधरा काटकर यांनी दिली. कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेल्या महिला त्यांच्या परिसरातील महिलांच्या यशकथा तसेच सेंद्रिय शेतीचे प्रयोग, उद्योजकतेतली आघाडी , पाणी व स्वच्छता यातील अनेक उत्तम उपक्रम, महिलांना मिळालेले सन्मान,-पुरस्कार अशा अनेक गोष्टींवर प्रकाशझोत टाकणारे लिखाण आता या महिला स्वतःच लिहितील आणि त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या परिवर्तनाचे अनेक पैलू उलगडून विविध माध्यमातून ते समाजापर्यंत पोहचवणार आहेत. सुरुवातीला स्वयम शिक्षण प्रयोगचे वार्तापत्र 'आम्ही सखी' मधून हे लिखाण प्रसिद्ध होत जाईल आणि पुढे विविध प्रसारमाध्यमातून विकसित होत सकारात्मक परिणाम घडवत समाजाच्या तळागाळापर्यंत झिरपत जाईल अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने वर्षभरात करण्याच्या कामाची आखणीही या कार्यशाळेच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती काटकर यांनी दिली.  

माझी पाटी कोरी होती व लिखाण बाल्यावस्थेत होते पण लेखन संवाद कार्यशाळेमुळे लिखाणाला सुरुवात करण्याचा आत्मविश्वास मिळाला. चुकतमाकत का होईन आता आम्ही लिहू लागलो आणि हे आमचे पहिले पाऊल आहे ,पण आम्ही एवढ्यावरच थांबणार नाही. आमच्या यशकथा आता आम्हीच लिहिणार आणि इतरांपर्यंत पोचवणारसुरेख आलुरे, कार्यशाळेत सहभागी महिला

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनMarathwadaमराठवाडा