शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रश्मी शुक्लांवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नाना पटोलेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 08:31 IST

धारावी पुनर्विकास घोटाळ्याच्या एसआयटी चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अमली पदार्थांच्या व्यापाराशी संबंध लावून तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी माझे फोन टॅप केले. याविरोधात रश्मी शुक्ला यांच्यासह संबंधितांवर ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी जाहीर केले. तसेच, धारावी पुनर्विकास प्रकल्पातील ८०० कोटींच्या घोटाळ्याची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचेही पटोले यांनी सांगितले.

टिळक भवन या काँग्रेस कार्यालयातील एक कार्यक्रमानंतर पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फोन टॅपिंग, धारावी प्रकल्पातील भ्रष्टाचार, ओबीसी आरक्षण आदी विषयांवर भाष्य केले. पटोले म्हणाले की, रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे माझे फोन टॅप केले. त्यासाठी अमली पदार्थांच्या व्यापाराशी माझा संबंध लावून अमजद खान असे मुस्लीम नाव ठेवून फोन टॅप करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  तेव्हा फडणवीस हे मुख्यमंत्री होते आणि गृहखातेही त्यांच्याकडेच होते. या फोन टॅपिंगमध्ये त्यांचा सहभाग असेल तर त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित केला. आता या प्रकरणी रश्मी शुक्ला आणि संबंधित व्यक्तींवर ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार आहे, असे पटोले म्हणाले. 

धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात फडणवीस सरकारच्या काळात मोठा भ्रष्टाचार झाला. प्रकल्पासाठीच्या ४५ एकर जमिनीसाठी फडणवीस सरकारने रेल्वेला ८०० कोटी दिले. परंतु, ना जमीन मिळशी ना ८०० कोटी परत आले. ही जनतेच्या पैशाची लूट आहे, असे सांगतानाच एसआयटी किंवा अगदी ईडी व सीबीआयला या प्रकरणाच्या चौकशीसाठी शिफारस करावी, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे पटोले म्हणाले. 

ओबीसी आरक्षणाबाबत अडवणुकीची भूमिकाओबीसी आरक्षणाच्या बाबतीतही भाजपकडून अडवणुकीची भूमिका घेतली गेली आहे. आरक्षण संपवायचे हा त्यांचा डाव आहे. भाजप मंडल आयोगाच्या शिफारशीच संपवायला निघाले आहे. पण हा डाव आम्ही हाणून पाडू, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Rashmi Shuklaरश्मी शुक्लाNana Patoleनाना पटोले