शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

भाजपच्या काळात मंदावलेले आर.आर. आबांचे 'ते' अभियान पुन्हा कार्यान्वित होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 10:06 IST

2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर तंटामुक्त गाव हे अभियान थंडावले. किंबहुना अनेक गावांत तंटामुक्त समित्या अस्तित्वातही राहिल्या नाही. आता आघाडी सरकारने या समित्या पुनर्जिवीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई - ग्रामीण भागातील तंटे पोलिसांपर्यंत येण्यापूर्वीच सोडविण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सुरू केलेली तंटामुक्त गाव संकल्पना आघाडी सरकार पुन्हा कार्यान्वित करणार आहे. रिक्त पदांमुळे राज्यातील पोलिसांवर वाढलेला ताण कमी करण्यासाठी आर.आर. आबांनी गृहमंत्रीपदी असताना ही योजना प्रत्यक्षात आणली होती.

रिक्त जागांमुळे पोलिस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येतो. हा ताण कमी करण्यासाठी तंटामुक्त समित्या पुनर्जिवीत करण्यात येणार आहे. आघाडी सरकारने यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. ग्रामविकास मंत्र्यांनी अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. त्यामुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. 

दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी 15 ऑगस्ट 2007 रोजी तंटामुक्त अभियानाला सुरुवात केली होती. या संकल्पनेतून ग्रामीण भागातील अनेक तंटे सोडविण्यात आले होते. या अभियानाला मोठ्या प्रमाणात यशही मिळाले होते. गावोगावी तंटामुक्त समित्या स्थापन झाल्या होत्या. तसेच तंटामुक्त गावांना रोख पारितोषिक देखील देण्यात येत होते. या पारितोषिकाच्या रकमेतून गावाचा विकास करण्यास मदत मिळत होती. 

दरम्यान 2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर तंटामुक्त गाव हे अभियान थंडावले. किंबहुना अनेक गावांत तंटामुक्त समित्या अस्तित्वातही राहिल्या नाही. आता आघाडी सरकारने या समित्या पुनर्जिवीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील तंटे सोडविण्यासाठी हा निर्णय फायदेशीर ठरेल असं मत ग्रामीण भागातील ग्रामस्थ व्यक्त करत आहे.