शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

भाजपच्या काळात मंदावलेले आर.आर. आबांचे 'ते' अभियान पुन्हा कार्यान्वित होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 10:06 IST

2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर तंटामुक्त गाव हे अभियान थंडावले. किंबहुना अनेक गावांत तंटामुक्त समित्या अस्तित्वातही राहिल्या नाही. आता आघाडी सरकारने या समित्या पुनर्जिवीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई - ग्रामीण भागातील तंटे पोलिसांपर्यंत येण्यापूर्वीच सोडविण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सुरू केलेली तंटामुक्त गाव संकल्पना आघाडी सरकार पुन्हा कार्यान्वित करणार आहे. रिक्त पदांमुळे राज्यातील पोलिसांवर वाढलेला ताण कमी करण्यासाठी आर.आर. आबांनी गृहमंत्रीपदी असताना ही योजना प्रत्यक्षात आणली होती.

रिक्त जागांमुळे पोलिस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येतो. हा ताण कमी करण्यासाठी तंटामुक्त समित्या पुनर्जिवीत करण्यात येणार आहे. आघाडी सरकारने यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. ग्रामविकास मंत्र्यांनी अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. त्यामुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. 

दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी 15 ऑगस्ट 2007 रोजी तंटामुक्त अभियानाला सुरुवात केली होती. या संकल्पनेतून ग्रामीण भागातील अनेक तंटे सोडविण्यात आले होते. या अभियानाला मोठ्या प्रमाणात यशही मिळाले होते. गावोगावी तंटामुक्त समित्या स्थापन झाल्या होत्या. तसेच तंटामुक्त गावांना रोख पारितोषिक देखील देण्यात येत होते. या पारितोषिकाच्या रकमेतून गावाचा विकास करण्यास मदत मिळत होती. 

दरम्यान 2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर तंटामुक्त गाव हे अभियान थंडावले. किंबहुना अनेक गावांत तंटामुक्त समित्या अस्तित्वातही राहिल्या नाही. आता आघाडी सरकारने या समित्या पुनर्जिवीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील तंटे सोडविण्यासाठी हा निर्णय फायदेशीर ठरेल असं मत ग्रामीण भागातील ग्रामस्थ व्यक्त करत आहे.