शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

भाजपच्या काळात मंदावलेले आर.आर. आबांचे 'ते' अभियान पुन्हा कार्यान्वित होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 10:06 IST

2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर तंटामुक्त गाव हे अभियान थंडावले. किंबहुना अनेक गावांत तंटामुक्त समित्या अस्तित्वातही राहिल्या नाही. आता आघाडी सरकारने या समित्या पुनर्जिवीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई - ग्रामीण भागातील तंटे पोलिसांपर्यंत येण्यापूर्वीच सोडविण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सुरू केलेली तंटामुक्त गाव संकल्पना आघाडी सरकार पुन्हा कार्यान्वित करणार आहे. रिक्त पदांमुळे राज्यातील पोलिसांवर वाढलेला ताण कमी करण्यासाठी आर.आर. आबांनी गृहमंत्रीपदी असताना ही योजना प्रत्यक्षात आणली होती.

रिक्त जागांमुळे पोलिस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येतो. हा ताण कमी करण्यासाठी तंटामुक्त समित्या पुनर्जिवीत करण्यात येणार आहे. आघाडी सरकारने यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. ग्रामविकास मंत्र्यांनी अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. त्यामुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. 

दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी 15 ऑगस्ट 2007 रोजी तंटामुक्त अभियानाला सुरुवात केली होती. या संकल्पनेतून ग्रामीण भागातील अनेक तंटे सोडविण्यात आले होते. या अभियानाला मोठ्या प्रमाणात यशही मिळाले होते. गावोगावी तंटामुक्त समित्या स्थापन झाल्या होत्या. तसेच तंटामुक्त गावांना रोख पारितोषिक देखील देण्यात येत होते. या पारितोषिकाच्या रकमेतून गावाचा विकास करण्यास मदत मिळत होती. 

दरम्यान 2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर तंटामुक्त गाव हे अभियान थंडावले. किंबहुना अनेक गावांत तंटामुक्त समित्या अस्तित्वातही राहिल्या नाही. आता आघाडी सरकारने या समित्या पुनर्जिवीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील तंटे सोडविण्यासाठी हा निर्णय फायदेशीर ठरेल असं मत ग्रामीण भागातील ग्रामस्थ व्यक्त करत आहे.