शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई सुरुच राहणार : साखर आयुक्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 20:10 IST

साखर आयुक्तालयाने आरआरसीची कारवाई पुढे सुुरुच ठेवल्याने एफअरपीचा भरणा वाढलेला असल्याचे साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्दे पुणे, सोलापूर, अहमदनगरमधील कारखान्यांवर कारवाईराज्यात १५ जानेवारी अखेरीस ५४२ लाख ४३ हजार ९८७ टन ऊस गाळपएफआरपीच्या बदल्यात साखर बारगळणार 

पुणे : उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम थकविणाºया कारखान्यांवर रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टीफिकेट (आरआरसी) बजावण्याची कारवाई सुरुच राहणार आहे. पुणे, सोलापूर आणि अहमदनगर मधील नीचांकी एफआरपी देणाऱ्या कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी बुधवारी दिली. एकरकमी एफआरपी मिळावी आणि थकबाकीदार कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करावी या मागणीसाठी बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर आयुक्तालयांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. स्वाभिमानीचे प्रवक्ते योगेश पांडे, पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण पाटील, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष महमूद पटेल, अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, पंढरपूरचे समाधान फाटे यांसह शेतकरी उपस्थित होते. वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरणाऱ्या कारखान्यांवर आरआरसीची कारवाई या पुढे सुरुच ठेवण्याचे आश्वासन साखर आयुक्तांनी आंदोलकांना दिले.  राज्यात १५ जानेवारी अखेरीस ५४२ लाख ४३ हजार ९८७ टन ऊस गाळप झाले होते. त्या गाळपानुसार ३१ जानेवारी अखेरीस १३ हजार ३०५ कोटी ६२ लाख रुपयांची एफआरपी शेतकऱ्यांना देणे आवश्यक होते. त्यापैकी ८ हजार ४६४ कोटी ४७ लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. साखर आयुक्तालयाने आरआरसीची कारवाई पुढे सुुरुच ठेवल्याने एफअरपीचा भरणा वाढलेला असल्याचे साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. आरआरसी कारवाईपूर्वी केवळ ११ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिली होती. त्यात १८ पर्यंत वाढ झाली आहे. बुधवारी सांगलीच्या दत्त इंडिया सहकारी कारखान्याने संपूर्ण एकरकमी एफआरपी दिली. कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील काही कारखान्यांनी संपूर्ण एफआरपी देण्यासाठी पावले उचलली आहेत. साखर कारखान्यांकडून नियमबाह्य केली जाणारी कपात, मागील आणि चालू हंगामातील एफआरपीची थकबाकी, थकबाकीदार कारखान्यांवर करण्यात येणारी कारवाई अशा विविध तक्रारींचा दर पंधरा दिवसांनी आढावा घेण्याची सूचना साखर आयुक्तांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिली. तसेच, पुणे, सोलापूर आणि अहमदनगर येथील नीचांकी एफआरपी देणाऱ्या प्रत्येकी ३ कारखान्यांना आरआरसी बजावण्याचा आदेशही त्यांनी या वेळी दिला. -------------------------------

एफआरपीच्या बदल्यात साखर बारगळणार शेतकऱ्यांच्या मागणीनंतर एफआरपीच्या बदल्यात साखर देण्याच्या निर्णयात अनेक कायदेशीर आणि व्यवहारीक अडचणी येत असल्याने, ही योजना बारगळणार आहे. साखर आयुक्तालयाने शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपी पैकी २० टक्के रक्कमेची साखर देण्याची तयारी केली होती. जीएसटीच्या रक्कमेची साखरही कारखान्यांनी द्यावी असे बजावले होते. मात्र, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या साखरेचे नक्की करायचे काय असा प्रश्न निर्माण झाल्याने, हा निर्णय रद्द करण्यात आला. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी