मुंबई: राज्यभरात जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या नऊ महिन्यांच्या कालावधीत १० हजार ७२० रस्ते अपघात झाले. यात ११ हजार ५३२ जणांचा मृत्यू झाला. अपघातांच्या सर्वाधिक घटना मुंबईमध्ये झाल्या, तर पुणे ग्रामीण भागात सर्वाधिक जणांचा मृत्यू झाल्याचे परिवहन विभागाने जारी केलेल्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.
राजधानी मुंबईत अपघातांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. २०२४ च्या जानेवारी सप्टेंबर कालावधीच्या तुलनेत २०२५ मध्ये अपघातांची संख्या वाढली आहे. मुंबईमध्ये नऊ महिन्यांत १ हजार ८७८ अपघात आणि २६२ मृत्यू नोंदविले गेले, तर राज्यातील सर्वाधिक अपघातात मृत्यूंची नोंद पुणे ग्रामीण झाली असून, मृतांची संख्या ७६४ इतकी आहे.
मुंबई पुणे महामार्गावरील वाहनांचा वेग कमी करण्यासाठी, कॅमेऱ्यांसह इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम स्थापित करण्यात आली. परंतु समृद्धी महामार्गावर मात्र कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही. वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच सुरक्षा उपाययोजनांमध्ये उणिवा राहिल्याचे या आकडेवारीतून समोर येते. मुंबईसारख्या घनदाट वाहतूक असलेल्या शहरात अपघातांची वाढ किती गंभीर आहे हे दिसून येते.
कुठे घट अन् कुठे वाढ?
जानेवारी ते सप्टेंबर २०२४ या गेल्या वर्षीच्या तुलनेत याच कालावधीत चालू वर्षांमध्ये समृद्धी महामार्गावरील मृतांमध्ये १६ टक्के वाढ झाली आहे. तर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर २९ टक्के घट झाली आहे.
Web Summary : Maharashtra witnessed over 10,720 accidents resulting in 11,532 deaths in nine months. Mumbai recorded the most accidents, while Pune rural areas reported the highest fatalities. Mumbai-Pune Expressway fatalities decreased, but increased on Samruddhi Mahamarg, highlighting safety concerns.
Web Summary : महाराष्ट्र में नौ महीनों में 10,720 से अधिक दुर्घटनाएँ हुईं, जिनमें 11,532 लोगों की मौत हो गई। मुंबई में सबसे अधिक दुर्घटनाएँ दर्ज की गईं, जबकि पुणे ग्रामीण क्षेत्रों में सबसे अधिक मौतें हुईं। मुंबई-पुणे एक्सप्रेसवे पर दुर्घटनाओं में कमी आई, लेकिन समृद्धि महामार्ग पर बढ़ी, जो सुरक्षा चिंताओं को उजागर करती है।