शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 

By यदू जोशी | Updated: August 7, 2025 10:01 IST

...सोबतच वह्याही परत कराव्यात. त्याच वह्या-पुस्तकांवर पुनर्प्रकिया करून नवीन वह्या-पुस्तकांचे मोफत वाटप विद्यार्थ्यांना करण्याचा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविला जाणार आहे. शालेय शिक्षण विभाग त्यासाठी ‘मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना’ राबवेल.   

यदु जोशी - 

मुंबई : शाळांमधील मुला-मुलींना राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दरवर्षी मोफत पुस्तक वाटप केले जाते. शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर ती त्यांनी शाळेला परत करावीत. सोबतच वह्याही परत कराव्यात. त्याच वह्या-पुस्तकांवर पुनर्प्रकिया करून नवीन वह्या-पुस्तकांचे मोफत वाटप विद्यार्थ्यांना करण्याचा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविला जाणार आहे. शालेय शिक्षण विभाग त्यासाठी ‘मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना’ राबवेल.   

 ‘पुनर्वापरातून परिवर्तनाकडे’ अशी या योजनेची टॅगलाइन असेल. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ते म्हणाले की, या निमित्ताने आपण वर्षभर जी वह्या-पुस्तके वापरतो, ती पुढच्या वर्षी प्रक्रिया होऊन इतर विद्यार्थ्यांना नवीन स्वरूपात मिळतील याची जाणीव विद्यार्थ्यांना होईल आणि बांधीलकी म्हणून ही पुस्तके आपल्याला परत करायची आहेत, याचीही जाणीव त्यांना असेल. सोबतच विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांच्या पैशांतून खरेदी केलेल्या वह्याही शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर त्यांनी परत केल्या तर त्यावर पुनर्प्रक्रिया करून भविष्यात वह्यांचे वाटपही मोफत करण्याचा विचार सरकारला करता येऊ शकणार आहे. विद्यार्थ्यांना तसेही आवाहन केले जाणार आहे. 

१,००,९४,००० - विद्यार्थ्यांना यंदा मोफत पुस्तक ८९,१९६ - शाळांमध्ये पुस्तक वाटप

ज्या जिल्ह्यांमध्ये अशा शाळांची संख्या सर्वाधिक आहे त्यात अहिल्यानगर ४,६३९, नाशिक ४,७३१, पुणे ५,५१९ या जिल्ह्यांचा समावेश आहे. 

मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजनेमुळे मुला-मुलींमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होईल. कागदाची बचत होईल आणि पर्यावरण रक्षणाचा हेतूही साध्य होईल. सरकारवरील आर्थिक भार कमी होईलच, पण त्यापेक्षाही या उपक्रमामागील सामाजिक-पर्यावरणविषयक हेतू अतिशय महत्त्वाचा आहे. डॉ. पंकज भोयर, शालेय शिक्षण राज्यमंत्री

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस