शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

बारावीच्या निकालाचे सूत्र अद्याप ठरेना, शिक्षण विभागाच्या अध्यादेशाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 7:24 AM

राज्यातील सुमारे १३ लाख विद्यार्थ्यांचे इयत्ता बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. सीबीएसई व आयसीएसई बोर्डाने सुद्धा बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. परंतु, कोणत्याही बोर्डाने बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे सूत्र जाहीर केले नाही.

पुणे : कोरोनामुळे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, बारावीचा निकाल कोणत्या सूत्रानुसार जाहीर करावा, हे अद्याप ठरलेले नाहीत. राज्य शासनाकडून अध्यादेश प्रसिद्ध केल्यानंतरच शिक्षण विभागाकडून निकालाची पुढील कार्यवाही सुरू होणार आहे. त्यामुळे शिक्षण विभाग अध्यादेशाची वाट पाहत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

राज्यातील सुमारे १३ लाख विद्यार्थ्यांचे इयत्ता बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. सीबीएसई व आयसीएसई बोर्डाने सुद्धा बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. परंतु, कोणत्याही बोर्डाने बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे सूत्र जाहीर केले नाही. सीबीएसई बोर्डाकडून जाहीर केल्या जाणाऱ्या सूत्राचा अवलंब राज्य मंडळाकडून केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, केवळ अंतर्गत मूल्यमापनावर बारावीचा निकाल जाहीर करणे उचित ठरणार नाही. बारावीच्या गुणांवर पदवी व इतर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अवलंबून असते. त्यामुळे बारावीसाठी कोणत्या मूल्यमापनाचा अवलंब केला जातो, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

राज्य मंडळाने इयत्ता दहावीच्या निकालाचा आराखडा व वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात मुख्याध्यापकांची कर्तव्ये तसेच नियमित, खासगी, पुनर्परीक्षार्थी परीक्षार्थी आदी विद्यार्थ्यांचे निकाल कोणत्या पद्धतीने तयार करावेत, यासंदर्भातील सविस्तर सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. दहावीचा निकाल प्रसिद्ध करण्यासाठी राज्य मंडळाला बरीच तयारी करावी लागली. बारावीचा निकाल तयार करण्यासाठीसुद्धा याच पद्धतीने आराखडा तयार करावा लागणार आहे. त्यामुळे इयत्ता बारावीचा निकाल ऑगस्ट महिन्यात जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.

टॅग्स :examपरीक्षाEducationशिक्षण