शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

रामजन्मभूमी व बाबरी मशीदचा प्रश्न सर्वोच न्यायालयातून सोडवावा, निवृत्त केंद्रीय गृह सचिव डॉ. माधव गोडबोले यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 11:27 IST

रामजन्मभूमी व बाबरी मशीदचा प्रश्न सोडवण्यासाठी जरी श्री श्री रविशंकर व अन्य काही पुढाकार घेत असले तरी हा प्रश्न सर्वोच न्यायालयातूनच सोडवला गेला पाहिजे आणि सर्वोच न्यायालयाचा निकाल सर्वांनी मान्य करायला पाहिजे असे ठाम प्रतिपादन निवृत्त केंद्रीय गृह सचिव डॉ. माधव गोडबोले यांनी नुकतेच पार्ल्यात केले.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - रामजन्मभूमी व बाबरी मशीदचा प्रश्न सोडवण्यासाठी जरी श्री श्री रविशंकर व अन्य काही पुढाकार घेत असले तरी हा प्रश्न सर्वोच न्यायालयातूनच सोडवला गेला पाहिजे आणि सर्वोच न्यायालयाचा निकाल सर्वांनी मान्य करायला पाहिजे असे ठाम प्रतिपादन निवृत्त केंद्रीय गृह सचिव डॉ. माधव गोडबोले यांनी नुकतेच पार्ल्यात केले.6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद कार सेवकांनी पाडली त्यावेळी गोडबोले हे केंद्रात गृहसचिव होते.

प्रबोधन मंच आयोजित ‘ नक्की कोण चालवत हा देश? ‘ या विषयावर प्रबोधन मंचचे सदस्य मृगांक परांजपे यांनी गोडबोले यांच्याशी मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रश्न विचारले त्याला सडेतोड उत्तरे देत पार्लेकरांशी सुमारे दीड तास मुक्त संवाद साधला.

प्रसिद्धी माध्यमांचा सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी नागरिकांच्या समस्यांचा सातत्याने उहापोह होणे गरजेचे आहे.यासाठी प्रबोधन मंच सारख्या अशासकीय संस्था वाढीस लागून निवडणुकांपूर्वी नागरिकांच्या राजकीय पक्षांकडून काय अपेक्षा आहेत यावर भाष्य करणारा आपला निवडुक जाहिरनामा तयार करावा अशी भूमिका त्यांनी मांडली.

सरकार, हे ,सरकार चालवत नसून सरकार जेव्हा कमी चालते तेव्हा देश चालतो.आपण सर्व देशवासीय कसा देश चालवतो यावर देश चालतो असे भाष्य त्यांनी केले. 2019 च्या निवडणुका नजरे समोर ठेऊन लोकाभिमुख निर्णय व घोषणा होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

यावेळी त्यांनी राज्य व केंद्रात 34 वर्षे प्रशासकीय सेवेतील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवांवर आधारित अनेक विषयांवर मोकळेपणाने भाष्य केले.सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी प्रसिद्धी माध्यमांकडे जाऊन पत्रकार परिषद घेणे योग्य नव्हते असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी घेतलेला नोटा बंदीचा निर्णय योग्य होता,मात्र याची अंमलबजावणी करण्यात रिझर्व्ह बँक कमी  पडली अशी टिका त्यांनी केली.नोटबंदी व देशातील सर्व राज्यात गेल्या 1 जुलै पासून सुरू केलेला जीएसटी मुळे जगात आपल्या देशाची प्रतिमा उंचवली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्राला चांगले मुख्यमंत्री व मंत्री लाभले,यात राज्याचे अनेक वर्षे मुख्यमंत्री असलेले माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक व हेडमास्तर म्हणून प्रसिद्ध असलेले माजी मुख्यमंत्री दिवंगत शकरराव चव्हाण यांची कारकीर्द आपल्याला आवडली असल्याचे त्यांनी सांगितले. वसंतराव नाईक यांना विषयांची चांगली जाण होती,आणि सर्वाना एकत्र घेऊन ते राज्यकारभार करत असत,तर शंकरराव चव्हाण कडक होते.मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेला येणारा विषयावर त्या त्या मंत्र्यांनी अभ्यास केलेला असावा,आणि त्यांनीच उत्तर दिले पाहिजे,जर त्यांना उत्तर देता येत नसेल तर मग सचिवांनी उत्तर द्यावे असा त्यांचा दंडक असायचा हा किस्सा त्यांनी सांगितला.

माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांच्यात जरी काही मतभेद असले तरी,अनेकवेळा ते एकत्र चर्चा करून निर्णय घेत असत.पाकव्याप्त काश्मीर मध्ये सैन्य नेले पाहिजे असे पटेल यांचे ठाम मत होते,मात्र नेहरू यांनी तिकडे सैन्य पाठवण्यास लॉर्ड माऊंटबेटन यांच्या सांगण्यावरून विरोध दर्शविला.जर वल्लभभाई पटेल देशाचे पंतप्रधान झाले असते तर आपल्या देशाचे चित्र वेगळे असते असे मत त्यांनी व्यक्त केले.

भारताच्या लोकसंख्येत महिलांचा वाटा ५०% आहे तेव्हा लोकसभेत सुद्धा 50 टक्के जागा या महिलांसाठी राखीव ठेवाव्यात असे मत त्यांनी व्यक्त केले.विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचे साध्य ठप्प होते हे गंभीर आहे ,ते पूर्वी देखिल होत होते अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशSupreme Courtसर्वोच्च न्यायालय